कोंडमारा
(लघू कथा )
लहानपणा पासून दोघ एकमेकांना ओळखत होते, शेजारिच राहात असल्यामुळे. पुढे शाळा झाली. एसएससी झाले दोघ. तोपर्यंत सर्व व्यवस्थित होत. कॉलेज मधे गेल्या नंतर काय बिनसल कोणालाच कळल नाही. पण ती दोघ एकमेकांशी बोलायची बंद झाली.
पुढे कॉलेज संपल. दोघे कामधंद्याला लागले. वर वर सर्व व्यवस्थित वाटत होत. दोघेही आपल्या व्यापात होते. छान चालल होत तस, पण जेंव्हा जेंव्हा ती दोघ् समोर येत असत एक प्रकारचा संकोच दोघांच्याही चेहऱ्यावर जाणवत होता. काय घडल होत कोणालाही माहीत नव्हतं
नाही म्हणायला दोघांचाहि एक मित्र होता, त्याने खुप प्रयत्न करून पाहिले होते. पण एक गोष्ट जी फक्त त्यालाच माहित होती ती कालौघात त्याला सांगावी लागली होती की, त्याने तीला काहीतरी विचारले होते आणि ती जे काही म्हणाली होती त्याला अनुसरुनच त्यांच्या वर्तनात फरक पडला होता.
होता होता वर्ष गेली. दोघांचही लग्नाच वय झाल , ते हि सरुनं गेल. दोघेही तसेच राहतात. पुढे वय वाढत, प्रौढत्व येत, यथावकाश वृद्धत्वाच्या खुणा दोघांच्याही चेहऱ्यावर दिसायला लागतात. कालानुरूप त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात .
दिवस वर्ष हळू हळू सरतात आणि एक दिवशी ती वेळ येते जेंव्हा ती शेवटच्या क्षणांची वाट बघत असते. ती अखेर त्याला निरोप पाठवते त्याच मित्रा करवी. तो मित्र याला बोलवायला येतो आणि हां कोणतेही आढे वेढे न घेता त्याच्या मागून निघतो मुकाट्याने. मित्र त्याला घेऊन त्याच शेजारच्याच् बिल्डिंग मधे शिरतो.
तीच घर आजही तसाच टाप टिप असत
मित्र याला घेऊन बेड रूम मधे शिरतो ती शेवटच्या घटका मोजत असते. डोळे जणू फक्त याच्या भेटीची वाट बघत असतात. मित्र त्याला तिच्या बाजूला बसवतो, ती हात पुढे करते, तो हात धरतो. घट्ट
50 वर्षांची ताटातूट त्याच्या स्पर्शात जाणवते. दोघांच्याही डोळ्यातुंन फक्त धारा संतत चालू असतात थोड्यावेळाने.
ती : का नाही आलास परत
तो : तूच म्हणालीस की माझा नंबर दूसरा आहे
टी: अरे वेड्या किती गैर अर्थ काढलास तू. विचार यालाच काय निरोप दिला होता मी याच्या जवळ तुझ्या प्रश्नाला. तू विचारलस की मी तुला आवडतो का आणि मला तूला विचारायच आहे. त्यावर मी याला इतकेच म्हणाले की अजुन पर्यन्त तू दोन वर आहेस, जेंव्हा एक वर येशिल तेंव्हा मी हो म्हणेन. अरे याचा अर्थ मला वाटल तुला कळेल की, तू दुसऱ्या कडून निरोप पाठवतोस,… स्वताच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या निर्णया बाबत म्हणजे तुझी इच्छा स्वता:च्या मनात दूसऱ्या नम्बर वर आहे. माझ स्थान जेंव्हा मी तूझ्या मनात एक नम्बरला येइन, त्या वेळी मी हो म्हणेन. म्हणजेच अरे तू स्वतः यावस अस माझ्या मनाला वाटत होत, आणि तू येशिल असा विश्वास वाटत होता. अरे कारण तू माझाच होतास. पण तू फिरुन हे विचारायला सुद्धा आला नाहीस की मी जर मी दूसरा तर पहिला कोण. एवढा हक्क आणि जवळीक होती आपली.
तो : ( पूर्ण बाँध फुटून रडत असतो त्यातच स्वतःला थोड़ा सावरतो आणि ) काय बोलू आज पन्नास वर्षानि. या गोष्टी उलगडल्यात किती आणि काय काय घडल आणि काय घडल असत...
ती: अरे पण तू जर कन्फ्यूज्ड होतास, तर एकदाहि का विचारायला देखील आला नाहीस काय कारण ते तरी सांग.
तो : आता इतक्या वर्षानि बोलून काय फ़ायदा
ती: अरे पण .... (इतक्या वेळ बोलून तीला खोकल्याची ढ़ास लागते तो उठतो भांड्यात थोड़ पाणी देतो तीला, ती घोटभर घेते आणि ढ़ास थांबते)
पण… … ( पुन्हा खोकला अस तीन चार वेळेला होत
थोड बर वाटल्यावर ती पुन्हा बोलते ) पण इतके वर्षात का… … …… (पुन्हा ढ़ास तो तीला थांबवतो पण ती म्हणते ) आता तरी अडवू नकोस मी पण बोलते आणि तू पण बोल एकदा तरी. का असा जळतोस आतल्या आत तुझी (खोकला………… ) घूसमट बघवत नाहिये बोल आता, मी पण शेवटच्या वाटेवर आहे.
तो : ( तिच्या तोंडावर हात ठेवून तीला आडवतो )
टी : तूला (खुप मोठी ढ़ास…… ……… …… ) शपथ आहे माझी…. ( पुन्हा खोकल्याची उबळ )
तो : (खुप रडतो बांध सोडून आणि थांबून…. … … ) खर तर हे मी रहस्य मी माझ्या बरोबरच नेणार होतो. पण आता तू शपथ घातल्या मुळे सांगतो ऐक. ज्या दिवशी पन्नास वर्षांपूर्वी तुझा निरोप मिळाला त्या दिवशी मी धावतच तुझ्या कड़े यायला निघालो होतो. वाटेत याच्या एका मित्राने याची एक वही माझ्याकड़े परत करण्यासाठी दिली होती. ती घेऊन मी तुझ्याकड़ेच निघालो होतो तूझ्या घराच्या बाहेर असताना वही माझ्या हातून पडली आणि त्यातून तूझा एक सुन्दर फ़ोटो पडला. त्या मागे याने एक प्रेमपत्र लिहिल होत आणि त्या खाली लिहिल होत की मला माहीत आहे की हे पत्र मी तुला कधीच देऊ शकणार नाही तुझा आणि फक्त तुझाच
हे वाचल्यावर मी तसाच माघारी फिरलो आणि परत तुझ्याशी कधीही न बोलण्याची शपथ घेतली.
ती : ( त्या मित्रा कड़े वळून… … ) पण मग तू का नाही विचारलस, जर तुझ्या मनात होत, तू पण बोल आता.
मित्र आढेवेढ घेत असतो.
ती : अरे नका दोघ मिळून या वेळेला तरी माझी परीक्षा घेउ. बोल प्लीज बोल .
मित्र : मला जेंव्हा तू हां निरोप दिलास तेंव्हा माझा असा समज झाला की पहिल्या नम्बर वर नक्की मीच आहे. मी जर विचारल आणि तू हो म्हणालीस तर याच्या प्रेमाला पायदळी तूडवून मला माझ प्रेम नव्हतं मिळवायच.
या त्याच्या वाक्यावर एक शांतता भीषण आणि त्याला छेद देणारा तिचा खोकल्याचा शेवटचा उबाळा……………………… आणि तीने मान टाकून दिली. आणि दोघेही मित्र फक्त एकमेकांकडे हताश पणे पाहात असतात आणि बाजूला ती निपचित पडलेली.
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment