Skip to main content

प्रतिभा


प्रतिभा

दूरवरुन एक चेहरा पाहतोय रागावून माझ्याकडे
फ़क्त तिन शब्द का नाही म्हणालास
हात  घेऊन सुद्धा हातात माझा 
कारे इतके जड़ होते तीन शब्द म्हणायला
 जीभ नाही वळली तुझी
डोळ्यात पाहुन सुद्धा प्रेमाची माझ्या  भाषा
 कधीच नाही कारे तुला कळली
कधीतरी करशील जेंव्हा ताळेबन्द आयुष्याचा
प्रेमाच्या मिळकत खात्यात शून्य तरी लिहीशील का
सुखाच्या तुझ्या गंगाजळीत माझ्या प्रेमाच मोल आहे का रे 
 दाखवत नसशील कुणाला पण एकांतात तरी आठवत असशील
मला आठवतय तू बघायचास चोरुन डोळ्यात माझ्या
वाट बघायचे मी बोलशील एकदा तरी जे होत मनात तुझ्या माझ्या
जवळ जवळ एक वर्ष होतोच की रे साथ साथ
विचारशील अस वाटल होत घेतलास जेंव्हा हातात हात
कधीतरी कुठेतरी कुणाकडेतरी बोलालास बर वाटल
चोवीस वर्षानंतर नाव घेतलस खरच सांगते  बर वाटल
आता मला चिंता नाही माझा मार्ग मोकळा झाला
पुढील जन्मी नक्की विचारशील हां विश्वास खरा झाला
चल आता निघते मी पुढच्याच् टप्प्यावर आहे मी
नवीकोरि साडी नेसून वाट पाहीन तुझी मी
नक्की येशील नारे वाट पाहीन तुझी मी

कवी : मेदिनी

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...