Skip to main content

खट्याळ मैत्री



खट्याळ मैत्री 


रोज तुझ खोड़कर पणे काही बोलण
आता ठरवलय पक्क मनाशी ।।
सोडत नाहीस जोपर्यंत खट्याळ पणा
बोलणारच नाही तोपर्यंत तुझ्याशी  ।।
मी इतकी साधी सरळ नेहमीच वागते
किती वेळ  कौतुकाने बोलते तुझ्या
शी।।
  मुद्दामच काही बोलून मधेच तिरकस
नेहमीच करतोस व्रात्यपणा माझ्याशी।।
पुन्हा तुझ ते रोज भेटंण गप्पांमधून
काम टाकून तरी बोलते तुझ्या
शी ।।
  आणि तरी पुन्हा तक्रार तुझीच
फारच कमी बोलतेस माझ्याशी ।।
म्हणजे वेळ घालवून मी माझा
म्हणतोस बोल अजून माझ्याशी ।।
आता ठरवल तर आहे मी की
 नाहीच बोलणार नाही तुझ्या
शी ।।
  पण मग लगेच मनात येतो विचार
करार आहे बुवा मैत्रीचा तुझ्या
शी ।।
  आणि खरच मनातल सांगूका माझ्या 
मलासुद्धा सवय झाल्ये गप्पांची  तुझ्याशी।।
ठरवतेच आंता चार दिवस बोलणार नाहि
मुद्दामच भांडण करींन तुझ्या
शी ।।
पण भीती हीच कि   कदाचित हां अबोलाच
वळून बोलायला लावेल तुझ्या
शी ।।

कवी : मेदिनी

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...