Skip to main content

कवीस पत्र


कवीस पत्र


मेदिनीस पत्रात मायन्यात मीत लिहू
की रागा व्यक्ताया मायना मी रिक्त वहू ।।
बोलतोस  सहजच
तू  भाव तुझ्या ते  मनीचे 
अंतरात परी  आमूच्या घाव हाचि   बसतसे।।
बोलुनिया विसरसि तू विनोदेन समजुनि रे
परी हृदयी आमुच्या रे रेषा ही उमतटसे ।।
तू कवी तूज ठावे रे  भाव कसा प्रकटावा
मी नच कवी कोणी मग  भाव कसा प्रकटावा।।
कधीतरी तूज उमजे ही आशा मज आहे रे
राग व्यक्त करण्याची रीत तीच ठाव नसे।।
स्त्रीची ती रीत नसे बोलुनिया दावू कसे
तुज कळेल आकळेल आशा ही वाटतसे ।।
कळले जर कधीतरी ते उत्तर दे मज तू  कवी
बोलण्याची उपरति हि कधीतरी तूज हो व्हावी
उत्तर :
हे माझ्या मित्रां रे जरी कवी असलो मी तरी
मानवास नियम असे तो  मज  लागू  तरी ।।
माझ्या या प्रकटाने दुखावलीस   जर तू  कधी 
स्पष्टपणे बोलावे कळेल तरी कैसे  कधी।।
मैत्रीचा अन्वयार्थ स्पष्टता ती असण्याची
तरी माझी नच मनीषा तूज कधीच दुखाविण्याची।।
कधी नकळतची दुःखविले असेल जरी मी तूज
तरी  उन्नत 
मन कर आणिक माफ़  करी तू  मज।।
नच पुन्हा चुकूनियाची दुखविणार नाही मी
वचन तुवा दिधले हे सिद्धपणे पाळीन मी।।

कवी: मेदिनी

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...