Skip to main content

पहिला पाऊस




पहिला पाऊस 

ग्रीष्म तापला लाही झाली
वर्षावचि आस लागली
लगबग करुनि या मेघानो
वसुंधराही आतुर झाली ।।१।।
रविकिरणानो जा रे आता
तुमची सद्दी  संपुदे रे
वर्षावाने  भिजवून टाका
संपाताची वेळ जाहली।।२।।
झाडे वेली पाने सारि
तगमग तगमग करत राहिली 

त्याना  आता तृप्तीदेण्या
मेघांची ही दाटी  जाहली।।३।।
सोडा आता तिमीर संपला
उषा पुनः ही होऊंनी जागी
जणू भूमिवर नवरस देऊन
तृप्त लोचने करती झाली।।४।।

आलिंगन हे मेघानो द्या 
वसुंधरेला पुन्हा एकदा 
मृद्गंधाची होवो उधळण 
नभी मेघांची दाटी झाली ।।५।।
कड कड कड कड वर आकाशी 
बिजली आली लख लख करुनी 
तड तड तड तड ताशा जणू की 
नभो मंडळी बडवत आली ।।६।।
नक्षत्रांचा राजा बघ तो 
आला आला आला आला मृग तो 
आगमनाने त्याच्या आता 
 नैरुत्या आरक्तीत झाली ।।७।।
आता तांडव सुरु होऊ दे 
दाही दिशा या दुमवून टाका 
चातक पाहे वाट जयाची 
वर्षा राणी सर सर आली ।।
वर्षा राणी सर सर आली ।।
वर्षा राणी सर सर आली ।।८।।


कवी : मेदिनी 



Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...