Skip to main content

कवडसा 16

कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु …१६……


इकडे हॉस्पिटल मधे  शीतल आणि आई आहेत, म्हणून तिकडे शीतलच्या घरी शेजारच्या काकू शर्वरी जवळ बसून अविची वाट बघत असतात . शर्वरीला फ़क्त इतकेच माहीत आहे की आईला पडल्यामुळे दवाखान्यात नेलय.  तीला अश्या वेळेला आपल्या बाबाची खुप आठवण येत होती आणि ती एकटीच आपल्या बाबाचा विचार करत असते.  ख़रच अन्दाजच येत नव्हता की तिच्या मनात नककी काय चालल असेल  ……. … ….

मला बाबा बददल काय वाटत ते कुणीच कधीही का विचारत नाही  मी कधीच विसरु शकणार नाही  बाबाने मला जे प्रेम दिल आणि एक आठवण कधीच न विसरण्यासाठी. बाबा का गेलाय कुठे गेलाय आणि कधीच का येणार नाहिये हे का सत्य आहे आणि आम्ही ते का स्विकारायच हे मला कस कळेल.
बाबा माझ्यासाठी काय आहे की होता कस सांगू आणि कुणाला,  कारण आई स्वत:च अजुन सावरली   नाहिये.   पण बाबाच्या  आठवणीने तिला गलबलुन येत,  मी अजुन माझ मनातल सांगून तिला  कसा त्रास देऊ.
पण माझी आतली घालमेल बेचैनी मी कुणाजवळ मांडू आणि प्रत्येक जण मलाच समजावतो. खरच बाबा आज असता तर मी खूप खूप बोलले असते अगदी मनातल सर्व , मला पण आई विरुद्ध तक्रार् करायला हक्काच माणूस मिळाल असत तिच्या मनाची घालमेल होते,  तो राग अनेकदा ती माझ्यावरच काढ़ते आणि अनेकदा ओरड़ा आणि मार मीच खाते.  वर शेजारच्या काकू,   दोन्ही आज्या आणि सगळ जग मलाच का समजावत की आईला तू समजून घे.  मला ती कधी समजून घेईल का.  सतत  मीच तिला बाबाची आठवण येईल ही भीति बाळगायची. 
मला खूप आठवण येते तूझी बाबा.  का असा मधेच गेलास मला एकटीला सोडून. जेंव्हा इतर मुली त्यांच्या बाबा बद्दल सांगतात, मी खूप मनापासून प्रयत्न करते,  पण तूझी  आठवण कशी विसरु आणि कितीदा तरी मी एकटीच पांघरुणाच्या आत रडल्ये   रे बाबा. आधी मला वाटल होत की तू जस गावाला जातात तसा गेलायस आणि येणारेस कधीतरी.  खरच तू का गेलास.  मी आता माझा आनंद,  राग,  रुसवा, हट्ट कोणाजवळ सांगू.  निदान हे सांगण्या साठी तरी ये ना रे.  निदान एकदा तरी ये ना. मी सांगीन देवाला तूला एक सुट्टी द्यायला मग परत गेलास तरि...........
पण एकदा ये ना रे बाबा ...........

क्रमशः

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...