कवडसा
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)
कहाणी एका संघर्षाची सुरु …१६……
इकडे हॉस्पिटल मधे शीतल आणि आई आहेत, म्हणून तिकडे शीतलच्या घरी शेजारच्या
काकू शर्वरी जवळ बसून अविची वाट बघत असतात . शर्वरीला फ़क्त इतकेच माहीत आहे
की आईला पडल्यामुळे दवाखान्यात नेलय. तीला अश्या वेळेला आपल्या बाबाची खुप
आठवण येत होती आणि ती एकटीच आपल्या बाबाचा विचार करत असते. ख़रच अन्दाजच येत
नव्हता की तिच्या मनात नककी काय चालल असेल ……. … ….
मला बाबा बददल काय वाटत ते कुणीच कधीही का विचारत नाही मी कधीच विसरु शकणार नाही बाबाने मला जे प्रेम दिल आणि एक आठवण कधीच न विसरण्यासाठी. बाबा का गेलाय कुठे गेलाय आणि कधीच का येणार नाहिये हे का सत्य आहे आणि आम्ही ते का स्विकारायच हे मला कस कळेल.
बाबा माझ्यासाठी काय आहे की होता कस सांगू आणि कुणाला, कारण आई स्वत:च अजुन सावरली नाहिये. पण बाबाच्या आठवणीने तिला गलबलुन येत, मी अजुन माझ मनातल सांगून तिला कसा त्रास देऊ.
पण माझी आतली घालमेल बेचैनी मी कुणाजवळ मांडू आणि प्रत्येक जण मलाच समजावतो. खरच बाबा आज असता तर मी खूप खूप बोलले असते अगदी मनातल सर्व , मला पण आई विरुद्ध तक्रार् करायला हक्काच माणूस मिळाल असत तिच्या मनाची घालमेल होते, तो राग अनेकदा ती माझ्यावरच काढ़ते आणि अनेकदा ओरड़ा आणि मार मीच खाते. वर शेजारच्या काकू, दोन्ही आज्या आणि सगळ जग मलाच का समजावत की आईला तू समजून घे. मला ती कधी समजून घेईल का. सतत मीच तिला बाबाची आठवण येईल ही भीति बाळगायची.
मला खूप आठवण येते तूझी बाबा. का असा मधेच गेलास मला एकटीला सोडून. जेंव्हा इतर मुली त्यांच्या बाबा बद्दल सांगतात, मी खूप मनापासून प्रयत्न करते, पण तूझी आठवण कशी विसरु आणि कितीदा तरी मी एकटीच पांघरुणाच्या आत रडल्ये रे बाबा. आधी मला वाटल होत की तू जस गावाला जातात तसा गेलायस आणि येणारेस कधीतरी. खरच तू का गेलास. मी आता माझा आनंद, राग, रुसवा, हट्ट कोणाजवळ सांगू. निदान हे सांगण्या साठी तरी ये ना रे. निदान एकदा तरी ये ना. मी सांगीन देवाला तूला एक सुट्टी द्यायला मग परत गेलास तरि...........
पण एकदा ये ना रे बाबा ...........
मला बाबा बददल काय वाटत ते कुणीच कधीही का विचारत नाही मी कधीच विसरु शकणार नाही बाबाने मला जे प्रेम दिल आणि एक आठवण कधीच न विसरण्यासाठी. बाबा का गेलाय कुठे गेलाय आणि कधीच का येणार नाहिये हे का सत्य आहे आणि आम्ही ते का स्विकारायच हे मला कस कळेल.
बाबा माझ्यासाठी काय आहे की होता कस सांगू आणि कुणाला, कारण आई स्वत:च अजुन सावरली नाहिये. पण बाबाच्या आठवणीने तिला गलबलुन येत, मी अजुन माझ मनातल सांगून तिला कसा त्रास देऊ.
पण माझी आतली घालमेल बेचैनी मी कुणाजवळ मांडू आणि प्रत्येक जण मलाच समजावतो. खरच बाबा आज असता तर मी खूप खूप बोलले असते अगदी मनातल सर्व , मला पण आई विरुद्ध तक्रार् करायला हक्काच माणूस मिळाल असत तिच्या मनाची घालमेल होते, तो राग अनेकदा ती माझ्यावरच काढ़ते आणि अनेकदा ओरड़ा आणि मार मीच खाते. वर शेजारच्या काकू, दोन्ही आज्या आणि सगळ जग मलाच का समजावत की आईला तू समजून घे. मला ती कधी समजून घेईल का. सतत मीच तिला बाबाची आठवण येईल ही भीति बाळगायची.
मला खूप आठवण येते तूझी बाबा. का असा मधेच गेलास मला एकटीला सोडून. जेंव्हा इतर मुली त्यांच्या बाबा बद्दल सांगतात, मी खूप मनापासून प्रयत्न करते, पण तूझी आठवण कशी विसरु आणि कितीदा तरी मी एकटीच पांघरुणाच्या आत रडल्ये रे बाबा. आधी मला वाटल होत की तू जस गावाला जातात तसा गेलायस आणि येणारेस कधीतरी. खरच तू का गेलास. मी आता माझा आनंद, राग, रुसवा, हट्ट कोणाजवळ सांगू. निदान हे सांगण्या साठी तरी ये ना रे. निदान एकदा तरी ये ना. मी सांगीन देवाला तूला एक सुट्टी द्यायला मग परत गेलास तरि...........
पण एकदा ये ना रे बाबा ...........
क्रमशः
Comments
Post a Comment