Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

#श्रीकृष्णनीती #भाग२६

#श्रीकृष्णनीती #भाग२६ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! पांडवांवर झालेल्या अन्यायाने संतप्त झालेले  आणि त्यांच्याविषयी सहानुभूती असलेले ,त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचं महत्व व स्थान जाणणारे सर्व पांडवांच्या बाजूने होते आणि ज्यावेळी युद्धस्थितीपर्यंत गोष्टी गेली त्यावेळी प्रत्येक राजाने याचा निर्णय सहज केला. कारण तोपर्यंत हि ध्रुवीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. यात दोनच घटना घडल्या. एक म्हणजे मद्रनरेश शल्य जे नात्याने माद्रीचे बंधू अर्थात नकुल आणि सहदेव यांचे मामा , यांना कपटाने आपल्याकडे वळवून वास्तविक नियमभंगाची खरी सुरवात कौरवांनी तिथेच केली आणि धृतराष्ट्राचा दासीपुत्र युयुत्सु जो युद्धापूर्वी पांडवांच्या बाजूने आला.  त्याहीआधी द्वारकेला जाऊन कृष्णाची मदत मागण्यास गेलेल्या दुर्योधन आणि अर्जुन यांच्यात पहिला अधिकार कृष्णाने अर्जुनाला दिला. अर्थातच अर्जुनाने श्रीकृष्णाला मागून, सैन्य मागण्यासाठी आलेल्या दुर्योधनाला सैन्य देऊन, श्रीकृष्णाचं महत्व विशद केलं. परंतु बाह्य गुणधर्माला महत्व देणाऱ्या दुर्योधनाला, श्रीकृष्णाचं महत्व वाटलंच नाही. कारण गुणांपेक्षा संख्येला महत्व...

#श्रीकृष्णनीती #भाग२५

#श्रीकृष्णनीती #भाग२५ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! आतापर्यंत आपण महाभारतातील अनेक व्यक्तिरेखा, विशेषतः नकारात्मक, विस्ताराने पाहिल्या. त्या व्यक्तींचा आलेख , मानसिकता, काहींची अपरिहार्यता, काहींची दंभ, द्वेष याने भरलेली मानसिकता, काहींची उद्दाम वृत्ती आणि सत्तालोलुपता, महत्त्वाकांक्षा या सर्वांचा आपण अभ्यास केला.  आता हे चित्र सार्वत्रिक स्तरावर कसं होतं आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम काय आणि कसा कसा होत गेला, त्याप्रमाणे हे युद्ध व्हायला कोणाची मानसिकता विशेषत्वाने कारणीभूत झाली याचा विचार करू. मुळात त्यावेळची राजकीय पार्श्वभूमी दोन स्तरात विभागता येईल. एक म्हणजे धृतराष्ट्राच्या आधीचा काळ आणि धृतराष्ट्राचा काळ.  धृतराष्ट्राच्या आधीचा काळ मुख्यता जरासंध , कंस,नरकासुर या असुर शक्तींनी व्यापलेला काळ होता. त्यातील बऱ्याचश्या शक्ती श्रीकृष्णाने नष्ट केल्या वा करवून घेतल्या. त्याच काळातील भीष्मांच्या सारख्या महारथींनी सर्वसामान्य जनतेवर अन्याय व अत्याचार कधी केला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे एका वेगळ्या आदराने पाहिलं जातं होतं. त्यातही कुरु वंशाचा एक खंदा आधारस्तंभ म्हणून भ...

गीत विश्लेषण

गीत विश्लेषण !!! "तू प्यार का सागर है" चित्रपट : सीमा (1955) संगीतकार : शंकर-जयकिशन गीतकार : शैलेन्द्र गायक : मन्ना डे पटकथा आणि दिग्दर्शन : अमिया चक्रवर्ती तू प्यार का सागर है तेरी इक बूँद के प्यासे हम लौटा जो दिया तुमने चले जायेंगे जहां से हम तू प्यार का सागर... घायल मन का पागल पंछी उड़ने को बेक़रार पंख हैं कोमल, आँख है धुँधली, जाना है सागर पार अब तू ही इसे समझा, राह भूले थे कहाँ से हम तू प्यार का सागर... इधर झूम के गाये ज़िंदगी, उधर है मौत खड़ी कोई क्या जाने कहाँ है सीमा, उलझन आन पड़ी कानों में ज़रा कह दे, कि आएँ कौन दिशा से हम तू प्यार का सागर... एखादं गाणं का आवडतं, याचं कारण प्रत्येक वेळी सांगता येईल असं नाही. पण ते गाणं, मनात कुठेतरी घर करून राहतं. कुठेतरी त्याच्या अर्थाचा वेध मी घेत असतो. हे गाणं तसच डोक्यात होतं खूप काळापासून. पण त्याचं सूत्र सापडत नव्हतं.  आज अचानक सकाळी ते पुन्हा पाहताना सर्व चित्र स्पष्ट झालं आणि एक अत्युच्च आनंद मिळाला. मुळात एका अन्याय झालेल्या मुलीची सीमाची ही कथा आहे. खोट्या आरोपात अडकवून पोलिसांनी तिचाच काका काशीनाथ याला तिची बारा महिने पोलिस...

#श्रीकृष्णनीती #भाग२४

#श्रीकृष्णनीती #भाग२४ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! धृतराष्ट्र हा अंध असल्याकारणाने प्रथमपासून नकारात्मक विचाराने प्रभावित होता. अंधत्व हे फक्त त्याचं शारीरिक नव्हतं तर ते मानसिक आणि आत्मिकदेखील होतं. अन्यथा  आपल्याच सुनेचं वस्त्रहरण होत असताना खरा राजा असता तर त्याने त्या आरोपीला देहदंड नक्कीच दिला असता. परंतु  ते पुत्रप्रेमाने शक्य नसलं तरी निदान ती घटना आपल्या दरबारात आपल्याच मंत्रिमंडळासमोर होत असताना आणि दुर्योधनाचे बंधू आणि मित्र व शकुनी त्यात साथ देत असताना, एक मानव म्हणून आणि एक सर्वश्रेष्ठ कुरु राजा म्हणून हि गोष्ट थांबवणं नक्कीच धृतराष्ट्राच्या हाती होतं. या घटनेचं नुसतं साक्षित्वच धृतराष्ट्राने केलं नाही तर अप्रत्यक्षपणे त्यात साथच दिली, आपल्या हतबलतेचं जाहीर प्रदर्शन करून.  यदाकदाचित दुर्योधन ऐकत नाही हे गृहीत धरलं तरी भीष्म पितामह यांच्या सारख्या समर्थ व्यक्तीस अधिकार देऊन हि घटना तिथल्या तिथे थांबवण्याची आज्ञा तर निश्चितच देता आली असती. पितामह भीष्म त्या सभेत हजर असलेल्या सर्व वीरांना एका क्षणात ठार करण्यास समर्थ होते हे तर धृतराष्ट्रास नि...

पहिला पाऊस आणि प्रेम

पहिला पाऊस आणि प्रेम  मनाशी बांधले मन  जुळला हा प्रेमबंध  जसा मेघांचा खेळ  अन अवनीचा गंध  नभी जमले मेघ   आभाळ ये भरून  तितकेच माझ्याही  भरले प्रेमात मन  पान पान जागे होई  मेघ जमता आकाशी  तुझ्या एका नजरेने  घायाळ रे मी मानसी  तुझ्या ओढीने आता  मन न लागते कशात  चोहीकडे दिसतोस   गंध तुझाच श्वासात  आली वीज कडाडून  आता भिजेल धरणी  साक्ष तुझ्या प्रेमाची मन पाहिलं नयनी आता व्हावे हे आकाश  मोकळे मोकळे सारे  लागले तसेच सख्या   वाटेकडे डोळे माझे  कवी : प्रसन्न आठवले  २८/०५/२०२० ०७:५८ 

#श्रीकृष्णनीती #भाग२३

#श्रीकृष्णनीती #भाग२३ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! मुळातच धृतराष्ट्राचा जन्म हा अंबिकेच्या पोटी अंध म्हणून नियोग पद्धतीने झाला. (जसा बाकीच्या दोन्ही बंधूंचा म्हणजे पांडू आणि विदुर यांचाही याच पद्धतीने झाला). जन्मतः अंधत्व असल्याकारणाने, जी गोष्ट इतर डोळस व्यक्ती विशेषतः पांडू करत असे वा करू शकत असे त्या करण्यात धृतराष्ट्राला काही बंधनं  नक्कीच होती. महर्षी व्यासांच्या कृपेने अचाट शक्ती (दश सहस्त्र हत्तीची शक्ती) धृतराष्ट्राच्या अंगात होती. तो  पोलादाचं एका क्षणात चूर्ण करू शकत होता, ज्याचा प्रत्यय युद्धानंतर त्याने (कृष्णाच्या चातुर्याने) भीमाऐवजी भीमाच्या आकाराचा आणि वजनाचा पूर्ण पोलादाचा पुतळा क्षणात चूर्ण करून, दिला. मुळात  असलेल्या अंधत्वाने, शरीराने पूर्ण सशक्त असलेल्या धृतराष्ट्राला राज्य पदावरून त्यावेळच्या प्रचलित नियमांनुसार बेदखल केलं.  या गोष्टीचा अत्यंत नकारात्मक परिणाम त्याच्या मानसिकतेवर झाला. प्रारब्धाचा इतका मोठा फटका त्याच्या महत्वाकांक्षेला जबर धक्का देऊन गेला. कारण अंधत्व सोडलं तर बाकी कोणत्याही बाबतीत तो पांडूपेक्षा श्रेष्ठ होत...

#श्रीकृष्णनीती #भाग२२

#श्रीकृष्णनीती #भाग२२ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! धृतराष्ट्राकडे वळण्याआधी थोडी पार्श्वभूमी बघू. कृष्णाने कंस, नरकासुर यांसह जरासंध (भीमामार्फत) , कालयवन या व अश्या मायावी शत्रूंचा निःपात करून असुरी व मायावी  शक्ती संपवल्या. खरतर असुरी शक्तींचा विनाश झाला की सर्व स्थिरस्थावर होणं क्रमप्राप्त होतं. परंतु असं झालं नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे हा द्वापारयुगाचा अंतकाळ होता. कारण कृष्णावतार द्वापारहुगाच्या अंताला झाला आहे. यातून कलियुगाचा संदेश जो श्रीकृष्णांनी महर्षी व्यास यांच्यामार्फत जगाला कलियुगाच्या अंतापर्यंतच्या काळासाठी दिला आहे, तो म्हणजे इथून पुढे असुरांचं अस्तित्व हे प्रत्यक्षात नसेल, आता त्यांना वा उरलेल्या असुरांना मी नष्ट केलंय . परंतु आता ते अस्तित्व रूप बदलून अहंकार, गर्व, क्रोध, दंभ, द्वेष, मत्सर, काम, मोह, लोभ, अनीती, कुसंस्कार अश्या रिपूंच्या माध्यमातून मनात घर करून असतील.  म्हणूनच त्यांचा सामना करणं हे रोजचं  नव्हे क्षणाक्षणांचं महाभारत असेल. जे प्रत्येक व्यक्तीला सामान्य वा असामान्य सर्वांनाच लढावं लागेल. यातून आत्मरुपी कृष्ण ...

#श्रीकृष्णनीती #भाग२१

#श्रीकृष्णनीती #भाग२१ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! महाभारत , जे मुख्यत्वे असत्य, दंभ, दुराचार, अन्याय, लोभ,अनीती,अत्याचार,टोकाचा अभिमान आणि गर्व, यांविरुद्धची सभ्यता,सुसंस्कृतपणा,निकोप व्यवहार, नीती, निगर्वीपणा,न्याय याच्याशी असलेली लढाई वा युद्ध यांची महागाथा. मुळात यातील काही संघर्घ जो स्वतः श्रीकृष्ण यांचा. त्यांनी अनेक असुर शक्तींशी संघर्ष केला ज्यात स्वतः कंस, चाणूर, नरकासुर,  शिशुपाल इत्यादी ज्या सर्वांना त्याने मारलं. काही शक्ती ज्यांचा ते वध करू शकत नव्हते त्यांना त्यानी परस्पर वा दुसर्यांकरवी वध करवून संपवलं.  उदाहरणार्थ यवनासूर, जरासंध इत्यादी. श्रीकृष्णाने आपलं दैवत्व अनेक प्रसंगात सिद्ध केलं आहे. जे जन्मतः कंसाच्या कारागृहातून गोकुळला वसुदेवाच्या माध्यमातून झालेला प्रवास येथेच सिद्ध होतं . तरीही वयाच्या काही महिन्यात पुतना, तृणासुर,  वृषभासुर आणि बकासुर, आठव्या वर्षी कंस आणि चाणूर यांचा वध इत्यादी घटनांमधून दर्शवून दिलं.   श्रीकृष्णाचं अस्तित्व वा नियंत्रण देखील अनेक प्रसंगात दिसून येतं . त्यावेळच्या काही मोजक्या मुसद्दी व्यक्तिमत्वात श्रीकृष्ण ...

#श्रीकृष्णनीती #भाग२०

#श्रीकृष्णनीती #भाग२० श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! दुर्योधनाचं खरं  भांडण वा वादाचं कारण हे पांडवांचा राज्यावरचा हक्क हा होता. मुळात त्याचं म्हणणं कि, त्याचे पिताश्री , धृतराष्ट्र हे अंध असल्याकारणाने राज्यावर बसू शकले नाहीत. याकारणे ते राज्य अनुज पांडू यांना मिळालं  अन्यथा त्यांचा व पर्यायाने पांडवांचा काहीही हक्क राज्यावर नाही. याशिवाय धृतराष्ट्र हे अंध म्हणून अपात्र ठरत असले तरी त्यांचा वारस म्हणून मी पात्र आणि लायक आहे. याकारणे देखील हे राज्य कौरवांच्या हक्कात येतं . या दोन्ही कारणाने पांडव अपात्र ठरतात.  यात एक राजकीय नीतिमत्ता वा नियम जो त्याकाळी प्रचलित होता , त्या नियमानुसार एकदा एखादा राजा अपात्र ठरला आणि त्याचा हक्क दुसऱ्याला दिला कि त्या अपात्र राजाचा वंशज आपोआप बाद झाला. याचं  उत्तम उदाहरण म्हणजे पेशवाई. पहिले बाजीराव पेशवे यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब यांना हि गादी वारसाहक्काने मिळाली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे हयात चिरंजीव थोरले माधवराव यांना मिळाली (रघुनाथराव पेशवे जे नानासाहेबांचे बंधू हयात होते तरी त्यांना हा हक्क मिळ...

#श्रीकृष्णनीती #भाग१९

#श्रीकृष्णनीती #भाग१९ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! महाभारताचं पूर्ण युद्ध ज्या व्यक्तित्वामुळे घडलं. इतके रथी, महारथी, अतिरथी, दोन्हीकडचं मिळून अठरा अक्षौहिणी सैन्य ज्याच्यामुळे लढलं, ज्याच्यासाठी द्वारकेचा राणा, स्वयं नारायण रणांगणात सारथी झाला ते व्यक्तित्व नक्कीच विलक्षण , तितकंच ताकदीचं, तितकंच कठोर आणि जबरदस्त असलंच पाहिजे. अन्यथा इतकं सर्व महाभारत घडलंच नसतं. अर्थातच त्या व्यक्तिविशेषांचं नाव , जे आपण सर्वांनी जाणलं ते  म्हणजे, दुर्योधन.  महाभारत युद्धाचा कर्ता करविता. मुळात याचा जन्मच एका विचित्र परिस्थितीत झाला. गांधारीला दिवस जाऊन नैसर्गिक कालावधीपेक्षा जास्त काळ गेला. त्यातच तिला भविष्यवाणी समजली होती की, तिच्या पोटी कुलविनाशक संतती जन्माला येणार आहे. या सर्वाने वैतागून तिने आपला गर्भ काढून जमिनीवर पाडला आणि उद्वेगाने व्यास महर्षींचं स्मरण केलं. साक्षात महर्षी समोर उपस्थित झाले. गांधारीने त्यांना नमस्कार करून विचारलं की, आपण तर मला शतपुत्रांचा आशीर्वाद दिला होता. व्यासऋषी म्हणाले अर्थातच.  त्यांनी तो जमिनीवरील गर्भाचा अंश गोळा करून त्याचे एकशे एक भाग क...

#श्रीकृष्णनीती #भाग१८

#श्रीकृष्णनीती #भाग१८ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! अश्वत्थामाच्या स्वभावातील पाशवीपणा, जो त्याने रणभूमीवर काही प्रमाणात दाखवला अवेळी नारायणास्त्र वापरून, तो बहुदा त्याच्या लहानपणच्या गरिबी आणि अपमानकारक वागणुकीमध्ये असावा. कारण लहानपणी इतर मुलं दूध पिऊन यायची त्यावेळी माता कृपी त्याला पाण्यात पीठ कालवून हेच दूध आहे म्हणून द्यायची. परंतु खरी परिस्थिती समजल्यावर त्याला आपल्या आईची अगतिकता आणि वडिलांचा नाईलाज समजला. त्याच्यावर त्या परिस्थितीत कदाचित एकूणच नियतीचा , परिस्थितीचा आणि द्रुपद दरबारात द्रोणांच्या झालेल्या अपमानाचा खोलवर परिणाम झाला असावा. त्याकारणाने त्याचा स्वभाव टोकाचा झाला असेल.  याविरुद्ध स्थिती हस्तिनापूरला आल्यावर झाली. तिथे वास्तविक भीष्मांच्या कृपेने, पण सकृतदर्शनी धृतराष्ट्रांच्या कृपेने, सर्व साध्य झालं. दुःख दैन्य दूर झालं. परंतु त्याचा सरळसरळ संबंध सत्ताधीशांशी हातमिळवणी व त्यांची पाठराखण यात परिवर्तित झाली. म्हणजेच जर दुर्योधनाची मर्जी राखली की अगदी पितामह भीष्म यांचीसुद्धा तमा बाळगायचं कारण  नाही हे दोघांनी चांगलं हेरलं होतं. एक कर्ण आणि दुसरा अ...

श्रीकृष्णानिती १७

#श्रीकृष्णनीती #भाग१७ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! पितामह भीष्म , गुरु द्रोण आणि महारथी कर्ण यांच्या नंतर  कौरव सैन्यातील महारथी होता दुर्योधन. परंतु त्याच्याकडे वळण्याआधी आपण अजून एका महारथीचा विचार करू. अश्वत्थामा. गुरू द्रोण आणि माता कृपी यांचा पुत्र आणि महर्षी भारद्वाज यांचा पौत्र. . महाभारतातील अत्यंत निर्दयी व्यक्तित्व.  द्रोणाचार्यांनी पराक्रमी आणि शिवअंशाच्या पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवाची अत्यंत उग्र तपस्या केली.  त्या तपस्येने प्रसन्न होऊन द्रोण आणि कृपी यांना तेजस्वी पुत्र , जो शिवाचा अंश अर्थात ११ रुद्रांपैकी एक असेल , होईल असा आशीर्वाद भगवान शिवांनी दिला. या वरप्राप्तीनंतर अश्वत्थामा याचा जन्म झाला. महारुद्राचा अंश म्हणून त्याच्या कपाळावर एक दिव्य मणी जन्मतः विराजित होता. हा मणी त्याला मानवेतर सर्व जीव जसे देव, दानव, असुर, यक्ष किन्नर, इंद्र, वरुण यांपासून आणि कोणत्याही अस्त्र शस्त्र यांपासून अभयदान देत असे. म्हणजेच यांपैकी कोणीही अश्वत्थामाला मारू शकत नव्हते. अश्वत्थामाच्या जन्मानंतर द्रोणांची परिस्थिती अजूनच खालावली. इतकी की ते मुलाला गायीचं दुधसु...

श्रीकृष्णनिती १६

#श्रीकृष्णनीती #भाग१६ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! असंगाशी संग म्हणजे प्रणाशी गाठ ही म्हण आपण ऐकली आहे आणि वाचली आहेच. मुळात प्रणाशी गाठ म्हणजे जे असंगाच्या संगतीत नाहीत ते अमर आणि असंगाशी संग करणारे मरणार इतका सोप्पा अर्थ अभिप्रेत नाही , हे नक्की. याचा जो अधोरेखित आणि गूढार्थ असा आहे तो हा  की, असंगाच्या संगतीत राहिलात तर जो शेवट त्या असंगाला त्याच्या कर्माने येणार आहे वा येणे प्राप्त आहे, तोच वा तसाच शेवट हा त्याच्या संगतीने तुम्हाला प्राप्त होतो.  फक्त संगतीचा परिणाम इतका भयानक आहे, तर मग त्याच्या कृत्यातील तुमचा सहभाग किती भयानक आणि निष्ठुर मृत्यू पदरात देईल, याचा विचार केलेला बरा. नियती जेंव्हा फिरते तेंव्हा देव व दैव यातील काहीही कामाला येत नाही. तर आपल्या विहित कर्मानेच ते ठरतं. पण त्याआधी तीच नियती सावरण्याची संधी देतेच देते. जशी तिने कर्णालासुद्धा दिली होती. दहा दिवस युद्ध असून नुसतं बसवून ठेवून आणि आदल्या रात्री कुंतीरूपात समोर येऊन.  पण माणसाची मानसिक स्थिती ढासळली की त्याची विचार करण्याची शक्ती क्षीण होते आणि नीती अनीती यातील भेद करण्याचा विवेक हरवला...

#श्रीकृष्णनीती #भाग१५

#श्रीकृष्णनीती #भाग१५ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! काल आपण कर्णाची एक बाजू पाहिली. वास्तविक ती बाजू मांडून कर्णाचं कोणत्याही प्रकारे समर्थन करण्याचा उद्देश नव्हता. उद्देश फक्त कर्णाची गुणवत्ता प्रस्थापित करणं . त्या पार्श्वभूमीवर आज खरी परिस्थिती काय होती हे पाहूया.  मुळात कर्ण दुखावला गेला तो त्याच्या जन्माचं रहस्य त्याला माहित नव्हतं म्हणून.  पण त्याला हे समजत होतं कि, ज्या मातापित्यांनी आपल्याला सांभाळलं, आपण  त्यांचं अपत्य नक्की नाही. याच द्वैताच्या शोधात त्याने पूर्ण आयुष्य घालवलं. प्रस्थापित समाजव्यवस्थेत पांडव आणि कौरव दोघांनाही जन्मतः काही मार्ग उपलब्ध झाले होते,राजपरिवारात जन्म झाल्यामुळे. परंतु याचा पांडवांना कधीही माज वा गर्व वा मस्ती चढली नाही. किंबहुना त्यांची पावलं कायम जमिनीवर राहिली. अगदी महाभारत युद्धातील विजयानंतरसुद्धा.  तुमच्या कर्मावर तुमचं प्रारब्ध ठरतं  हे वैश्विक सत्य आहे. कौरवांनी प्रथमपासून पांडवांचा दुस्वास आणि रागराग केला. त्यांना नामोहरम करण्याकरता सर्व आयुष्य घालवलं. त्यांच्या मृत्यूसाठी अनेक सापळे रचले. अगदी भीमाला लहान अ...

श्रीकृष्ण नीति १३

श्रीकृष्ण नीति १३ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! काल पितामह भीष्म यांचा विचार केला. आज गुरू द्रोणाचार्य यांच्याबद्दल बघण्याचा प्रयत्न करूया. वास्तविक महाभारत हे चुकांची मोठी थैली आहे. ज्यातून पुढच्या कित्येक पिढ्याना नव्हे कित्येक युगांना पुरेल इतकी देणगी या एका महाकाव्याने जगताला दिली आहे. आचार्य द्रोण एका गरीब कुटुंबातून आलेले होते. महर्षी भारद्वाज यांचे पुत्र असलेले आचार्य द्रोण सर्व प्रकारच्या अस्त्र व शस्त्र कलेसह शास्त्रांचे देखील उत्तम अभ्यासक होते. पांचालनरेश राजा द्रुपद याच्यशी असलेल्या  वैरामुळे आणि परिस्थितीमुळे सुरवातीला अत्यंत हलाखीत काढलेले दिवस गुरु द्रोण कधीही विसरले नाहीत. म्हणूनच अश्याकाळात भीष्मांनी पांडव आणि कौरव पुत्रांच्या शिक्षणासाठी दिलेलं गुरुपद हे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत हे त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवलं. परंतु यात ते हे विसरले कि, त्या उपकाराच्या ओझ्याखाली ते पूर्ण दबून कौरव विशेषतः दुर्योधन आणि शकुनी यांच्या प्रत्येक गैरकृत्यावर ते गप्प राहून एकप्रकारे साथ देत आले. यात विशेष बाब म्हणजे ते महाराज धृतराष्ट्र यांच्या खास मर्जीतील व भीष्मांन...

"आत्मनिर्भर भारत"

आत्मनिर्भर भारत  करोनाच्या सकारात्मक बाजूचा विचार करूया.  ज्यावेळी देशामागून देश या कोविड -१९ या आजाराने धाड धाड कोसळायला लागले, त्यावेळी या देशातील  तमाम देशद्रोह्यांनी (तथाकथित पुरोगामी), मनात विचार केला कि, आता भारत संपला.  त्यांनी विचार केला बहुसंख्य भारत हा अजूनही गरीब आहे. इथे पुरेशी हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर वैद्यकीय सुविधा नाहीत. (जसे काही यांना देशाची , या आधी फार चिंता होती) त्यांनी विचार केला कि, मोदी या विपत्तीच्या काळात उपचारासाठी व्हेंटीलेटर्स , हॉस्पिटल्स , वैद्यकीय सुविधा , औषधं हे सर्व कुठून आणणार.  एक वॉशिंग्टन मधून शिकून आल्याचा आव आणणारा , स्वघोषित तज्ज्ञ , प्रत्यक्षात इडियट असलेला   (व्हाट्सअप तज्ञहि आले यात) टीव्ही आणि इतर प्रसार माध्यमांवर सांगायला लागला कि, आता भारतीयांनी त्सुनामी साठी तयार राहावे. कमीतकमी ३० करोड भारतीय बाधित होतील आणि १ करोड च्या वर जीव गमावतील .  बीबीसी , एन डी टीव्ही , न्यूयॉर्क टाइम्स , वॉशिंग्टन पोस्ट सर्व म्हणायला लागले, कि, जर अमेरिकेची हि हालत होत आहे, तर भारत संपलाच....

श्रीकृष्ण नीति १२

श्रीकृष्ण नीति १२ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! श्रीकृष्ण नीती युद्धापर्यंत संपत नाही. इतक्या कपटातून जाऊन ,इतक्या राजकीय डावपेचांचा सामना करूनही आणि युद्धात बहुतेक सर्व महारथींना कृष्णनीतीनेच परास्त करूनही, पिताश्री धृतराष्ट्र भेटीला कोणतीही काळजी न घेता सरळ भेट घेणाऱ्या भोळ्या पांडवांना, विशेषतः भीमाला, कृष्णानेच वाचवलं, पुतळा पुढे करायला सांगून. इतके धडे मिळूनही इतके बेसावध कसे राहू शकतात याचं व्यक्तिशः मलाही आश्चर्य वाटतं. कारण मागील प्रत्येक कपटात धृतराष्ट्र मूकपणे नक्कीच सहभागी होता, हे गत इतिहास सांगत होता.  सर्व आयुष्य ज्या कौरव  कुटुंबाने फक्त कट , कपट आणि कारस्थानं हेच दिलं त्या कुटुंबाशी व्यवहार करताना वा वागताना इतका बेसावधपणा अकल्पनीय आहे. अर्थात यातून ही पण एक गोष्ट शिकायला मिळते की,  अश्या व्यक्तीशी बोलताना वा त्यांच्यासमोर वावरतानासुद्धा अत्यंत काळजी पूर्वक वागलं वा बोललं पाहिजे. यात कृष्णाने शिकवलेली ही गोष्ट पण महत्वाची आहे की, नातं हे एकाच बाजूने टिकू शकत नाही आणि टिकवता उपयोगी नाही.  श्रीकृष्ण चरित्रातून अजून एक गोष्ट सिद्ध होते की, आपल्य...

अंतिम भाग - अहिरावण महिरावण चित्रसेना, मकरध्वज संक्षिप्त कथा - ४

अंतिम भाग - अहिरावण महिरावण चित्रसेना, मकरध्वज संक्षिप्त कथा - ४ हनुमंत पुनः मूळ श्रीवीरहनुमान रुपात प्रकट होऊन,  मंदिरा बाहेर येऊन भुंग्याचा शोध सुरू करतात.  काही क्षणातच भुंगे असलेलं ठिकाण सापडतं. हनुमंत  सर्व भ्रमारांना संपवून टाकतात. एक भ्रमर जिवंत राहतो, तो हनुमंताच्या पाया पडतो आणि दयेची याचना करतो. हनुमंत त्याला म्हणतात " एकाच अटीवर तुला जीवनदान देतो. चित्रसेनेच्या महालात जाऊन तिच्या शयनकक्षातील पलंगाचे चारही पाय, विना विलंब पोखरून ठेव, ज्यायोगे त्यावर कोणीही बसलं की तो पलंग मोडून पडला पाहिजे आणि हे काम अतिशीघ्र गतीने कर, समय खूप कमी आहे."  जीव वाचलेला भ्रमर त्वरित आपल्या कार्याला निघून जातो. हनुमंत अत्यंत वायूवेगात दोन्ही असुर जिथे युद्ध करत होते तिथे पोहोचले. मकरध्वजाने आपल्या पित्याप्रमाणेच वीरश्री दाखवत दोन्ही असुरांना युद्धात गुंगवून ठेवलेलं असतं. हनुमंत येताच, त्याच्या अंगी बळ शतपटीने वाढतं आणि दोघे मिळून अहिरावण आणि महिरावण यांना यमसदनी पाठवतात. यावेळी पाचही दीप  विझले आहेत आणि भुंगे मृत्यू पावल्यामुळे तेही येत नाहीत, त्यामुळे असुरांचा अंत होतो. दो...

पंचमुखी हनुमान प्रकटन, अहिरावण महिरावण, चित्रसेना मकरध्वज संक्षिप्त कथा भाग ३

पंचमुखी हनुमान प्रकटन,  अहिरावण महिरावण चित्रसेना, मकरध्वज संक्षिप्त कथा - ३ मकरध्वज हनुमंतांना नमस्कार करून, यशस्वी होण्याचा आशीर्वाद घेतो आणि हनुमंत अहिरावणाच्या महालाच्या दिशेने वायूवेगे जातो, अर्थातच भुंग्याचं रूप घेऊन. अहिरावणाच्या महालात पोचल्यावर तिथे एक रूपवान स्त्री असते. मूळ रुपात पकटून, तिला प्रणाम करून हनुमंत म्हणतात " हे देवी आपल्याला माझा प्रणाम. आपण  कोण आहात, आपला अहिरावणाशी काय संबंध आहे. मी श्रीरामभक्त हनुमान. माझ्या स्वामीना दोन्ही असुरांनी येथे पळवून आणले होते, यास्तव  त्यांच्या मुक्ततेसाठी मी आलो आहे." " आपण श्रीरामभक्त म्हणजेच श्रीविष्णूअवतारी श्रीराम यांचे भक्त आहात, हे जाणून अत्यंत हर्ष झाला. मी नागकन्या चित्रसेना. मी नागराजाची पुत्री. परंतु माझ्या सौन्दर्यावर लुब्ध होऊन अहिरावणाने मला बळजबरीने येथे आणून माझ्याशी लग्न केले आहे. परंतु ते मला मान्य नाही. मी स्वतः त्या असुरांचा तिरस्कार करते. मी स्वतः श्रीविष्णूची भक्त आहे."  " हे देवी आपल्याला भेटून मलाही हर्ष झाला. आपण मला, त्या असुरांना मारण्याच्या कार्यात सहाय्य करावं अशी मी आपल्याला वि...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - २

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - २ पुत्राच्या या कथनानंतर हनुमंतांनी त्याला आलिंगन दिले आणि येथेच प्रतीक्षा कर असे सांगून आपण मंदिरात प्रवेश करते झाले. मंदिरात पाच भिन्न दिशांना पाच मोठे दिवे सर्वकाळ तेवत आहेत हे जाणवत होतं . मंदिरात प्रवेश करताच हनुमंत माता कामाक्षीचं  स्मरण करतात. काही क्षणात माता हनुमंताच्या समोर प्रकट होते. हनुमंत मातेला नमस्कार करतात.  "हे माते, मी आपल्या दर्शनाने कृतार्थ झालो. आपल्या समोर आता माझे स्वामी श्रीराम आणि त्यांचे बंधू लक्ष्मण यांना बळी दिलं जाईल. आपली याला मान्यता आहे का. मी माझ्या स्वामी आणि त्यांचे बंधू यांच्या सुटकेकरता आलो आहे. " "हे हनुमान मी प्रभू श्रीराम आणि बंधू लक्ष्मण यांना ओळखलंय. मला स्वतःला अहिरावण व महिरावण यांचा बळी हवाय. परंतु हे अहिरावण आणि महिरावण  अत्यंत दुष्ट आहेत ते येथे यज्ञकार्य करून नित्य माझ्या भक्तांचे बळी देत असतात. परंतु मी काहीच करू शकत नाही, कारण त्यांचा मृत्यू माझ्या हाती नाही. परंतु जर तू त्या दोहोंच्या सुटकेकरता आला असलास तर तुला तुझ्या कार्यात यश मिळो हा आशीर्वाद मी नक्की तुला देऊ शक...