#श्रीकृष्णनीती #भाग२६ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! पांडवांवर झालेल्या अन्यायाने संतप्त झालेले आणि त्यांच्याविषयी सहानुभूती असलेले ,त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचं महत्व व स्थान जाणणारे सर्व पांडवांच्या बाजूने होते आणि ज्यावेळी युद्धस्थितीपर्यंत गोष्टी गेली त्यावेळी प्रत्येक राजाने याचा निर्णय सहज केला. कारण तोपर्यंत हि ध्रुवीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. यात दोनच घटना घडल्या. एक म्हणजे मद्रनरेश शल्य जे नात्याने माद्रीचे बंधू अर्थात नकुल आणि सहदेव यांचे मामा , यांना कपटाने आपल्याकडे वळवून वास्तविक नियमभंगाची खरी सुरवात कौरवांनी तिथेच केली आणि धृतराष्ट्राचा दासीपुत्र युयुत्सु जो युद्धापूर्वी पांडवांच्या बाजूने आला. त्याहीआधी द्वारकेला जाऊन कृष्णाची मदत मागण्यास गेलेल्या दुर्योधन आणि अर्जुन यांच्यात पहिला अधिकार कृष्णाने अर्जुनाला दिला. अर्थातच अर्जुनाने श्रीकृष्णाला मागून, सैन्य मागण्यासाठी आलेल्या दुर्योधनाला सैन्य देऊन, श्रीकृष्णाचं महत्व विशद केलं. परंतु बाह्य गुणधर्माला महत्व देणाऱ्या दुर्योधनाला, श्रीकृष्णाचं महत्व वाटलंच नाही. कारण गुणांपेक्षा संख्येला महत्व...