उगाच का रे सोडशी मुला तू हात हा मायेचा
मातृभूमीला वंदन करण्या शीर भेट देण्या
अनेक असतील आईला या लेकरे तरीही
मी जर ना केले इति तर मग करे न कोणीही
तुझे पाय तर सोडून जातो संकटात खुशीने
तुला पहाया अनेक असती दिधली देवाने
म्हणून आई जातो म्हणणे मला प्राप्त आहे
नसे नशिबी येतो म्हणणे हा खल मज नाही
उगाच केले नाही मी तर शीर हे अर्पणी
तुमचा दिस हा गोड कराया सोडली साजणी
पाठी माझ्या रडू नका मज अश्रू नाही प्रिय
माझी शेवट ठेवा तुम्ही एकवार सय
प्रसन्न आठवले
अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते. हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...
Comments
Post a Comment