मनात सुर जुळला की येत आपोआप
शब्दशृंखला जुळल्या की मग जमते गाठ
तार तार जोड़लि जाते पाकळ्या जुळतात
लिहित जात मन नावापुरती असतात बोट
स्मरत नसेल तरीही लिहिल जातच हाताने
नाळ त्याची जुळलेली असते आधीच मनात
कुठुनसे शब्द येतात हात जोडून उभे
खरच कुणीतरी अस वाटत सांगतय कानात
शब्दाना मग पंख फुटतात वाटेत येत सर्व
अनेक मैल जात मन वाटेत भेटत काव्य
कधीही वाट न बघताही जमत सर्व छान
काहीही न करताहि मन लिहित भव्य
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment