जाण
मनात नसता का हे घडते
कधी तरी हे उमजूदे
फूल कोवळे नाजुक साजुक
पहा दुरून हे समजूदे
कुठे कुणाला खरचटले तर
ओरखडा हृदयात असावा
जेणे करुनि स्मृतित सदा तो
जाण जागती ठेवावा
क्षितिजामधुनि अलगद यावी
एक ओळ ती ओलती अन
त्या ओळीच्या दुख़द जखमा
मनी तरी त्या जगाव्या अन
पुन्हा कधी नच व्हावे हातून
ओरखड्याचे काम पुन्हा
काळोखातहि कधी न सुटावा
शब्दवेधी तो बाण पुन्हा
शब्दवेधी ............ पुन्हा
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment