Skip to main content

कवडसा - 18



कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु …१८……



आशाताई परत आल्या तेंव्हा शीतल झोपलेली होती. 
आशाताई आवाज न करता त्या बेडच्या बाजूला बसल्या.  
तेवढ्यात दोन तीन वार्ड बॉयज आले आणि नर्सला सांगून गेले की मैडम या पेशंटला  तयार करा याला हलवायचय शेजारच्या रूम मध्ये . नर्स हो म्हणून तयारीला लागते. चला आता हां पेशंट हलणार म्हणून आशाताई पण थोड्या खूश झाल्या. 
साधारण अर्ध्या तासाने पेशंटला तिथून हलवल जात. सर्व सामसूम झाल्यावर पुन्हा शीतल पूर्ण जागी होते.  आता तिलाबरच फ्रेश वाटत असत. अचानक काही आठवल्यासारख ती आईला विचारते 
शीतल : अगआई तो पेशंट i mean योगेन्द्र पुरोहित कुठे आहे ग 
आशाताई : त्याची सोय केली दुसरीकडे त्याला रूम मिळाली सेपरेट. पण तू का विचारतेस.  ओळखतेस का नाव कस लक्षात इतके आणि तेहि तू अर्धवट झोपेत होतीस तेंव्हा जाता जाता बोलले होते मी . 
शीतल : अग नाव कुठेतरी ऐकल्या सारख वाटतंय. लक्षात येत नाहीये.   
कदाचित चेहरा पाहिल्यावर आठवेल..  बर माझा फोन कूठे आहे देशील का ज़रा
आशाताई : शीतल अग केवढ़या मोठ्या दुखण्यातून जात्येस खेळ वाटतोय का आता पूर्ण बरी होइ पर्यन्त फोन वगैरे काही नाही कळल.  
शीतल : काही नाही अग शर्वरीची  आठवण येत्ये.  तिच्याशी बोलले असते.  
आशाताई एकदम ओशाळून म्हणाल्या 
आशाताई : अग या गडबड़ित तिचा कसा विसर पडला कळत नाही.  आता माझ्या फ़ोन वरुन बोल.  मग उद्या मागवते तुझा फोन अवि कडे आहे.  
आईच्या या वाक्याने शीतलचा प्रफुल्लित झाला.  कशाने ते तिलाच ठाऊक. पण अचानक तिच्या चेहऱ्यावरी भाव बदलले, 
शीतल खरच एका विचित्र मनस्थितित होती.  कारण आपल्याला बघायला योगेन्द्र इथपर्यन्त आला, याच आश्चर्य, कौतुक, आनंद, त्याला अपघात झाला, याच दुःख अणि एक गिल्ट आणि आता त्याची भेट होऊ शकेल का नाही ह्याच टेंशन कोणती भावना  व्यक्त करावी आणि काय हेच तिला कळत नव्हतं त्यामुळे तेच्या चेहऱ्यावरील भाव क्षणाक्षणाला बदलत होते. आणि ते ती आईपासून लपवण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करत होती .  

क्रमशः 

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...