Skip to main content

खऱ्या भक्तीचा मंत्र

सोबत जोडलेला व्हीडिओ पाहिला. ज्यात पोलिसांनी वारकरीबुवांना पंढरपूरच्या वेशीवर अडवलं. बुवानी तिथेच पोलिसांना नमस्कार केला आणि परतीचा रस्ता धरला. हे पाहिलं आणि मन भारावून गेलं. राग नाही, त्रागा नाही, अपशब्द नाही, हे पाहून अद्भुत वाटलं मला. म्हणून लगेच एक काव्य सुचलं ते लिहून काढलं.

खऱ्या भक्तीचा मंत्र घेतला
वेशीपाशी पांडुरंग पाहिला
नमन देहातील ईश्वराला
सर्वत्र विठ्ठल दिसे त्याला

कुठून आले वारकरी बुवा
विठ्ठल भेटीची आस मना
पायीच्या त्या जडजीवाला
विठ्ठल वेशीपाशी भेटला
खऱ्या भक्तीचा मंत्र घेतला

लागले पिसे भक्तीचे तया
चेतवून भाव जाळून माया
फक्त नाम विठ्ठल घ्याया
जन्म त्याने जगी या घेतला
खऱ्या भक्तीचा मंत्र घेतला

उगा नाही राग ध्यानी
उगा नाही खेद मनी
उगा नाही त्रागा जनी
भजे जळीस्थळी त्याला
खऱ्या भक्तीचा मंत्र घेतला

गाव पंढरी मी पोचलो
वेशीपाशी मी अडकलो
विठ्ठलइच्छा दर्शना आलो
जीव हा वेशीवर विसावला
खऱ्या भक्तीचा मंत्र घेतला

©®कवी : प्रसन्न आठवले
२८/०६/२०२०
१६:५१

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...