Skip to main content

ऋतूबदलाचा एक दिवस.


ऋतूबदलाचा एक दिवस. 

१जून पर्यंत प्रचंड उन्हाळा, उष्मा, उकाडा असह्य होत होता. फक्त एक दिवसाचा फरक पडला आणि २जूनला आकाशात मेघांची दाटी झाली आणि वातावरण एकदम आल्हादकारक झालं. सर्व उष्मा, उकाडा काही क्षणात पार नाहीसा झाला. संपूर्ण आसमंत काळ्या काळ्या ढगांनी भरलं आणि जवळजवळ दोन सव्वा दोन महिने असलेला उकाड्याच्या आणि त्याहीपेक्षा कारोनाच्या मानसिक सावटातून मुक्त झाल्यासारखं वाटलं. याला अजून एक गोष्ट कारणीभून ठरली. वादळाचा धोका. असं म्हणतात कि एक रेष छोटी करायची असेल तर त्या रेषेसमोर दुसरी त्यापेक्षा मोठी रेष आखली कि, आधीची रेषा आपोआप छोटी भासते. मला वाटतं निसर्गाने तेच केलं. 

करोनाच्या भीतीदायक सावल्या गडद आणि मोठ्या मोठ्या होत चालल्या असताना, एक दिवस बातम्यांचं जग वादळाच्या भीतीने भरून आणि भारून टाकलं. जेणेकरून काही काळाकरता लोक करोनाची भीती विसरून या नवीन भीतीच्या बातमीत हरवून गेले. वादळ येणार होतं यात दुमत असण्याचं कारण नाही आणि वादळाने हुलकावणी दिली हेदेखील सत्य आहे. पण एका मानसिक दृष्टिकोनातून विचार केला तर, जे झालं ते एकदम परफेक्ट झालं. ज्याला करेक्शन फॅक्टर असं म्हटलं जातं  तस झालं.  कारण करोना आहे तो राहील तोपर्यंत आयुष्यातील बऱ्याच गोष्टी बदलल्यात त्या तश्याच बदललेल्या राहतील. परंतु माणसाला मूळ प्रश्नापेक्षा त्या प्रश्नाची मानसिक भीती जास्त त्रास देते. म्हणून हे बदललेलं वातावरण नवीन ऊर्जा,नवीन आत्मविश्वास, नवीन चेतना, नवीन प्रकाश आणि नवीन उमेद घेऊन येईल, हे नक्की. 

बघा मस्त अंधारून आलंय 
आकाश अगदी भरून आलंय 
मेघात गर्द  पावसाचा भाव 
धरणीलाही भरून आलंय 

तप्त किरणांना साहून तिने 
सोसले घाव विरही ग्रीष्माचे 
आता होउदे तिलाही तृप्त 
झेलून थेंब थेंब पावसाचे 

उदयीचा  सूर्य झाकोळून 
मेघांनीही समा बांधला 
मेघांनी  पावसाच्या थेंबांचा 
धरणीवर जलमहाल बांधला 

रंग जाहला मेघसावळा
प्रेमाला आली आता जाग 
मन म्हणतंय मनाला जणू 
प्रत्येक थेंबात तू प्रेम माग 
प्रत्येक थेंबात तू प्रेम माग. 

कवी : प्रसन्न आठवले 
०४/०६/२०२०
०७:५७











Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...