Skip to main content

#श्रीकृष्णनीती #भाग३५

#श्रीकृष्णनीती #भाग३५

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

भरतवर्षाची गौरवशाली परंपरा खरतर सहाव्या सातव्या शतकापर्यंत सुरु होती. म्हणजेच सिकंदराच्या परत जाण्याच्या सुमारास म्हणजेच २३४२ वर्षांपूर्वी चंद्रगुप्त मौर्य याने आचार्य विष्णुगुप्त अर्थात आर्य चाणक्य यांच्या मार्ग दर्शनाखाली सार्वभौम सत्ता स्थापन केली. प्रथम त्याने मगधनरेश धनानंद याचा पराभव करून आर्य चाणक्याची प्रतिज्ञा पूर्ण केली. त्यानंतर त्याने पश्चिम आणि  वायव्ये कडील सर्व यवन राजांचा पराभव केला. साधारण २३३७ वर्षांपूर्वी म्हणजेच फक्त पाच वर्षात अफगाणिस्तान ते इराणपर्यंतचा प्रदेश काबीज करून मौर्य साम्राज्याचा विस्तार केला. 

कलिंग प्रांत आणि खाली दक्षिण भारत सोडला तर संपूर्ण भारतवर्ष आणि इराण पर्यंत चंद्रगुप्त मौर्याच्या साम्राज्याच्या सीमा पसरल्या होत्या. त्याने बावीस वर्ष वयाचा आपला  पुत्र बिंदुसार याला राज्यावर बसवून आपण सन्यास घेऊन वान प्रस्थाश्रमाचा स्वीकार केला. तदनंतर बिन्दुसाराने दक्षिणेत कर्नाटकपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. फक्त अति दक्षिणेकडील आताचं तामिळनाडू आणि केरळ या राजांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे तिकडील प्रांतावर आक्रमण केलं नाही. त्याच्या पश्चात सम्राट अशोकाने कलिंग प्रांत देखील युद्ध करून आपल्या राज्यात सामील करून घेतलं. सोबत मौर्य साम्राज्याचा १३७ वर्षातील  विस्तार दर्शवणारा नकाशा जोडला आहे. (२३४२ ते २२०५ वर्षांपूर्वी पर्यंत) ,त्यावरून भारताच्या समृद्ध वारशाची कल्पना येईल. 

या नंतर चीन आणि मध्य आशियातून हाकलून दिलेल्या शक टोळ्यांना आधी सातवाहन राजे गौतमीपुत्र  सातकर्णी यांनी आणि नंतर उज्जैनचा सम्राट अर्थातच विक्रमादित्य याने पूर्ण पराभूत केले ते २०७७ वर्षांपूर्वी. सोबत सम्राट विक्रमादित्य यांच्या राज्याचा नकाशा जोडला आहे. याच सम्राट विक्रमादित्य यांच्या दरबारात नवरत्नांमध्ये धन्वन्तरी,  कालिदास आणि थोर गणितज्ञ वराहमिहीर होते. चंद्रगुप्तांच्या आधी कुशाण, ज्याचं राज्य उझबेकिस्तान ताजिकिस्तान ते काश्मीर पर्यंत पसरलेलं होतं, यांना सम्राट समुद्रगुप्त  याने पराभूत करून आपल्या राज्याचा विस्तार केला आणि त्याचं समूळ उच्चाटन सम्राट चंद्रगुप्त द्वितीय याने केलं. 

त्यानंतर कुशाण या भारतवर्षातील संस्कृतीत इतके सामावून गेले कि, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आजच्या घडीला सांगता येणार नाही. त्यानंतर गुप्त राजवंशाच्या काळात चीनच्या प्रदेशातून वादळा प्रमाणे आलेल्या हूणांना ई. स. ४६० मध्ये गुप्तनरेश सम्राट स्कंदगुप्त यांनी पराभतू करून पिटाळून लावलं.  स्कंद्गुप्तच्या मृत्यूपर्यंत स्वस्थ बसलेल्या हूण सम्राट मिहिरकुल याने स्कंद्गुप्तच्या मृत्यूनंतर  ई. स. ४७० मध्ये आक्रमण करून गुप्तांना पराभूत करून काही काळ राज्य केलं. परंतु माळव्याचे सम्राट यशोधर्मा याने ई. स. ५१८ मध्ये पराभूत केले. त्यानंतर ई. स. ५४० मध्ये गुप्तनरेश सम्राट नरसिंह गुप्त याने हूणांना संपूर्ण पराभूत करून येथून पिटाळून लावलं.  

या सर्व सम्राटांचं वैशिष्ट्य म्हणजे ते या भूमीच्या रक्षणार्थ लढले, जिंकत गेले, शौर्याची व विजयाची  परंपरा प्रत्येक काळात त्या त्या खानदानाने पुढे चालू ठेवली. या भरत वर्षाच्या या गौरवशाली इतिहासाला आपण खरतर सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवलं पाहिजे. येथपर्यंतच्या एकाही परकीय सम्राटाने दुहीच्या बीजाची पेरणी केल्याचं इतिहासात नोंदलेलं दिसत नाही. जवळजवळ ई. स. १००० पर्यंत या परंपरेला छेद जाईल अशी मोठी आक्रमण झाली नाहीत वा ती जेंव्हा जेंव्हा झाली तेंव्हा तेंव्हा ती परतवून लावण्याचं कार्य, त्यावेळी जे श्रेष्ठ सम्राट वा राजे होते, त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून केलं. 

हि परंपरा खरतर मोहम्मद घोरीच्या आक्रमणापर्यंत टिकून होती. परंतु घोरीपासून दुही आणि फितुरीची बीज पेरली जाऊन त्याचा नन्तर वटवृक्ष झाला. हळू हळू या संस्कृतीची नाळ कापली जाऊ लागली. असा निष्कर्ष काढता येऊ शकतो. कारण घोरीशी लढणारं चौहान घराणं देखील एक वैभवशाली घराणं होतं.  कित्येक शतकं त्यांनी भरत वर्षातल्या मोठ्या प्रदेशावर राज्य केलं होतं. अर्थातच म्हणूनच घोरीला चौहानांचं राज्य जिंकण्याची महत्वाकांक्षा होती. सोबत चौहान घराण्याने व्याप्त राज्याचा नकाशा जोडला आहे. 

तोपर्यंतच्या आक्रमणातील क्रूरकर्मा म्हणून आलेला पहिला आक्रमक म्हणजे घोरी. त्याने ज्याप्रकारे पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला, तेदेखील २० वेळा आपल्याला सोडून दिलेल्या सम्राटाला, त्याने ज्या निर्दयतेने हाल हाल करून मारलं, त्यावरून खरतर क्रूर भविष्याची चाहूल इथल्या सम्राटांना लागायला हवी होती. परंतु  या आधीच्या कोणत्याही सम्राटाने न केलेली चूक खरतर इथून पुढे करायला सुरवात झाली, ती म्हणजे पराभूत केलेल्या परकीय राजाला जिवंत सोडणं.  त्यावेळपर्यंत स्थापित झालेल्या परंपरेनुसार, जसा मोहम्मद घोरी, इब्राहिम लोधी , अल्लाउद्दीन खिलजी, पराभूत होऊन पुन्हा पुन्हा येऊन लढत होते, याची कोणतीही काळजी त्यावेळी असलेल्या सम्राटांनी घेतली नाही व यातील एकाही परकीय आक्रमकाला देहदंड देऊन धाक बसवला नाही. 

उलट परकीय सम्राटांनीच इथल्या राजाला पराभूत करताच अत्यंत क्रूरपद्धतीने हाल हाल करून संपवलं. ज्या गोष्टीचा धसका येथील इतर राजांनी घेतला आणि प्राणभयाने वा क्रूर मृत्यूच्या भयाने कोणीही फार विरोध न करता, परकीय आक्रमकांचं राज्य सुस्थापित व्हायला मदत झाली वा इथल्याच काही राज्यांनी मदत केली. खरतर श्रीकृष्णाने याचा धडा जरासंध, शिशुपाल, भीष्म, द्रोण, कर्ण दुर्योधन इत्यादींना संपवून घालून दिला होता. कारण असा क्रूर शत्रू संपवूनच टाकावा, त्यांचं मतपरिवर्तन होत नाही हा साधा अभ्यास कोणी केला नाही वा अंमलात आणला नाही, तो आजपर्यंत. म्हणूनच पाकिस्तानची विषवल्ली अजून शिल्लक आहे आपलं विष ओकायला.

मला वाटतं तोडा आणि झोडा या नीतीची खरी बीज हि याच काळात रोवली गेली. ज्याचा मुक्त वापर ब्रिटीशानी केला. अजून एक गोष्ट जी इथंपर्यंत घडली नव्हती ती म्हणजे इथली संस्कृतीची धरोहर असलेली वा प्रतीकं असलेली बांधकामं जसं मंदीर , उत्कृष्ट इमारती, किल्ले, राजवाडे यांचा विध्वंस करण्यास वा त्याला आपले नाव देऊन इतिहास बदलण्यास त्याच सुमारास म्हणजे साधारण हजार वर्षांपूर्वी सुरवात झाली. जे कार्य त्या आधीच्या कोणत्याही परकीय आक्रमकाने केलं नव्हतं व तसा विचार त्याने केला नव्हता. 

हळू हळू संस्कृतीच्या नाशाची विषवल्ली याच दरम्यान रोवली गेली. कदाचित इथल्या शौर्य, वीरता , याची गाथा आणि प्रतिक नष्ट केली कि, इतिहासाची हि थोर परंपरा आपोआप नष्ट होऊन येथील गत इतिहास विसरला जाईल, ज्या योगे येथे निरंकुश सत्ता भोगणं सहज शक्य होईल हा त्या आक्रमकांचा अंदाज खरा ठरत गेला. येथूनच श्रीकृष्णाची थोर परंपरा असलेला देश  संस्कृती आणि धर्म यांचं खच्चीकरण व्हायला सुरवात झाली. 

उद्या  पुढे पाहू........ 

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

क्रमशः

©® संकल्पना व लेखन :  प्रसन्न आठवले

भाग  पस्तिसावा समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...