Skip to main content

अजयमेरू उर्फ अजमेर

अजयमेरू उर्फ अजमेर

उपलब्ध दस्तऐवजानुसार अजयराज चौहान या चौहान राजघराण्यातील राजाने या शहराची स्थापना करून तिला वैभवशाली नगरी बनवलं. त्यानंतरच्या चौहान घराण्यातील राजानी या नगरीला तलाव, बगीचे यांनी सुशोभित केलं. या नगरीची स्थापना २७ मार्च, १११२ साली अजयराज चौहान यांनी केली. त्यांच्या नावावरूनच या नगराला अजयमेरू हे नाव देण्यात आलं. अजय हे राजाचं नाव आणि मेरू म्हणजे शिखर वा उच्चस्थान. या शहराच्या सौन्दर्याबद्दल लिहिताना पृथ्वीराज चौहान यांच्या दरबारातील कवी जयनक कश्मिरी यांनी इंद्राची अलंकापुरी, श्रीकृष्णाची द्वारका आणि रावणाची लंका यांच्यापेक्षा सुंदर नगरी असं वर्णन केलं आहे. 

या नगराच्या स्थापनेनंतर चौहान राजाने या नगराला आपल्या साम्राज्याची राजधानी केलं. या चौहान घराण्याने जवळ जवळ आठशे ते हजार वर्ष राज्य केलं. अजयराज चौहान या घराण्यातील तेवीसावा राजा होता. याच घराण्यातील शेवटचे राजे पृथ्वीराज चौहान होते,  ज्यांचा पराभव मोहम्मद घोरी अर्थात गझनीचा मोहम्मद याने केला आणि हजार वर्षांची चौहान घराण्याची सत्ता संपुष्टात आली.  याच पृथ्वीराज चौहान यांना छत्रपती शिवाजी महाराज, राजे होईपर्यंत शेवटचा हिंदू सम्राट म्हटलं जातं होतं. 

पृथ्वीराज चौहान यांच्या नंतर या नगरीचा ताबा घोरीकडे आला. यथावकाश या नगराचं नाव अजयमेर आणि कालांतराने अजमेर झालं. घोरीनंतर या नगरावर अकबर व तद्नंतर मुघलांचं राज्य होतं. इतक्या सुंदर नाव असलेल्या शहराचं आपल्याच राजांच्या नाकर्तेपणामुळे नाव बदललं गेलं ते कायमचं. अशी कित्येक शहरं आहेत ज्यांची हिंदू धर्मीय नावं बदलून तत्कालीन शासकांनी आपल्या मर्जीने नावं ठेवली. 

©® संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०९/०६/२०२०
२३:१८





Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...