#श्रीकृष्णनीती #भाग३७
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
धर्म या संकल्पनेबद्दल विस्ताराने जाणून घेतल्यानंतर अधर्म काय हे कळायला खरतर अवघड नाही. जे धर्माविरुद्ध आहे, तो अधर्म. धर्म म्हणजे फक्त ईश्वरोपासना वा अध्यात्म आणि ततसंबंधी ज्ञानार्चन नव्हे तर प्रत्येकाचं आपलं जीवन जगताना व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि मातृभूमीप्रति असलेली कर्तव्य म्हणजेच व्यापक अर्थाने धर्म. यातील कशातही केलेली चूक वा कर्तव्यमूढता हा अधर्म नसला तरी धर्म पालनात केलेली चूकच.
परंतु यातील कोणत्याही गोष्टींबाबत केलेला अक्षम्य गुन्हा वा प्रतारणा वा प्रमाद म्हणजे अधर्म. अधर्म हा आपण स्वतः केला किंवा अधर्म करत असलेल्या व्यक्तीला जाणूनबुजून वा अजाणतेपणी केलेले सहाय्य. मुळात अधर्म हा पूर्वापार असुरांचा धर्म होता. त्यांच्यासाठी धर्म पालन न करणं म्हणजेच धर्म. हे त्यांच्या बुद्धीनुसार वा विवेकाच्या अभावाने, अहंकाराच्या प्रभावाने, तामसीपणामुळे, काम क्रोध यांच्याकडे मनाच्या असलेल्या नैसर्गिक ओढीतून व वाईट तेच चांगलं या बुद्धीच्या धारणेतून मनातील विकारांचा झालेला उत्पात म्हणजे अधर्म
असुरांचा हा धर्म म्हणजेच देव व मानव यांच्यासाठी अधर्म. असुरांच्या या अधर्मात मुख्य शत्रू काम, क्रोध, लोभ, मत्सर, असूया, अहंकार, दंभ, गर्व, सत्वप्रवृत्त लोकांना त्रास दिल्याचा असुरी आनंद, सात्विकतेचा व तात्विकतेचा अभाव, अनीती, अनाचार, मूल्यहीनता, स्वार्थ, तामस या गोष्टी प्रामुख्याने अध्याहृत असतात. म्हणजेच जिथे स्वहित हे सामूहिक, राष्ट्रीय व धार्मिक हितापेक्षा श्रेष्ठ असतं, तिथे असुर वृत्ती आहे हे सरसकट समजावं.
त्रेतायुगाच्या अंतापर्यँत जी असुरी वृत्ती प्रामुख्याने असुरांच्यात आढळत होती, ती त्या काळापर्यंत मानवाच्या अंगात पूर्णपणे भिनली होती. ज्या कारणांसाठी कृष्णाने जन्म घेतला होता. त्याची उदाहरणासह प्रात्यक्षिकं करून दाखवण्याची तीच योग्य वेळ होती. अर्थात सर्वशक्तिमान परम ईश्वर म्हणून हे श्रीकृष्णाला ज्ञात होतं कि, सर्व एका ठराविक मर्यादेपर्यंत आपण करून आदर्श घालून दिले तरी त्या आदर्शांचा मानवाने कसा अवलंब करावा वा अमलात आणावे हे प्रत्यक्ष युद्धात योग्य प्रकारे दाखवून देणं गरजेचं आहे.
हे जाणूनच श्रीकृष्णाने निश्चित महाभारत युद्धात शस्त्र हाती न घेता अर्जुन रूपातून मानवाला धर्मशी धर्म आणि अधर्माशी अधर्म हि योग्य शिकवण दिली. आणि एक प्रकारे हेच दाखवून दिलं कि, येणाऱ्या कलियुगात हेच तत्व जीवनाचा भाग असुदे. केलं होतं. परंतु संपूर्ण संपूर्ण अर्वाचीन , प्राचीन आणि सांप्रत इतिहासात फार थोड्या व्यक्ती अश्या होऊन गेल्या ज्यांनी, श्रीकृष्णाला जे अभिप्रेत होतं त्याप्रकारे श्रीकृष्णाची शिकवण अमलात आणली. ज्यांनी ज्यांनी अमलात आणली ते नक्कीच यशस्वी झाले.
याच कारणाने हे जाणलं पाहिजे कि, स्वःताला जे बुडवायला तयार असतात, त्यांना देशाशी धर्माशी काही देणंघेणं नसतं. त्यांना मातृभूमीचं सुद्धा काहीही देणंघेणं नसतं. त्यांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा, लागेबांधे यांच्याशी ते बांधील असतात. याच कारणास्तव मुघलांपासून ते अगदी स्वातंत्र्या नंतरसुद्धा एक पद्धतशीर प्रयत्न केला गेला कि, या भूमीच्या उच्च संस्कृतीचा, धर्माच्या लढाऊ वृत्तीचा ऱ्हास जितका होईल तितका केला जावा. नव्हे तसे पद्धतशीर प्रयत्न देखील केले गेले. याच कारणास्तव आपला अत्यंत उज्वल इतिहास जो इतका अत्युच्च दर्जाचा आहे कि, फक्त वाचताच छाती अभिमानाने भरून येते. परंतु डाव्या आणि समाजवादी विचारसरणीच्या व्यवस्थेने तो आपल्यापर्यंत पोचणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन, हे कायम आपल्या मनावर बिंबवले कि, गेली हजार वर्ष आपण गुलामीत आहोत. जे पूर्णतः चुकीचे आहे. जर गेल्या फक्त २२७२ वर्षांचा इतिहास जरी बघितला तरी त्यातील फक्त ६८० वर्ष परकीय सत्ता या देशात होत्या आणि जवळजवळ १५९२ वर्ष इथे हिंदू साम्र्याज्याची सत्ता होती. फक्त ती आपण टिकवू शकलो नाही.
त्याची कारणं हि येथील रक्तात असलेली फितुरी वा आपल्या देश धर्म याप्रती प्रेमाचा अभाव, व्यक्तिगत अहंकार व महत्वाकांक्षा यांचं प्राबल्य, दोन मुख्य उदाहरणं दिली जातात ती म्हणजे राजा अंभी याने सम्राट पोरस विरुद्ध सिकंदराच्या सैन्याला केलेली मदत. परंतु याचा परिणाम फार काळ टिकला नाही. पण दुसरी गद्दारी, जी राजा जयचंद याने फक्त व्यक्तिगत आकस व वैमनस्यांपोटी पृथ्वीराज चौहान याच्याविरुद्ध, पराजित झालेल्या मोहम्मद घोरीला बोलावून आणि आपल्या संपूर्ण सैन्याचं त्याला सहाय्य देऊन केली, त्याने या देशाचं केलेलं नुकसान अपरिमित होतं. आज आपण फक्त हिंदु सम्राट आणि त्यासमोर परकिय साम्राज्य यांची तुलना पाहुया.
मौर्य/ हर्षवर्धन ई.स.पुर्व २२७२ ११०० ११७२ संपुर्ण हिंदुस्थान
गुप्त/ सातवाहन
विजयनगर ई.स. १३३६ १६४६ ३१० कर्नाटका - आंध्रा
देवगिरी ई.स. ८६० १३१७ ४५७ देवगिरि
पल्लव ई.स. २७५ ८९७ ६२२ तामिळ्नाडु
काकटिय ई.स. ११६३ १३२३ १६० तेलंगणा-आंध्रा
कारकोट ई.स. ६२५ ८८५ २६० श्रीनगर- काश्मिर
लोहार ई.स. १००३ १३२० ३१७ श्रीनगर- काश्मिर
चालुक्य ई.स. ५४३ ७५३ २१० कर्नाटका
पाल ई.स. ८०० १२०० ४०० उत्तरप्रदेश - बांग्लादेश
परमार ई.स. ९७२ १३०५ ३३३ मध्यप्रदेश
गुर्जर-प्रतिहार ई.स. ७७६ १०३६ २६० उत्तरप्रदेश
अहोम ई.स. १२२८ १८२६ ५९८ आसाम
मुघल ई.स. १२०६ १७५७ ५५१ दिल्ली
मराठा ई.स. १६७४ १८१८ १४४ महाराष्ट्रा ते दिल्ली
ब्रिटिश ई.स. १८१८ १९४७ १२९ संपुर्ण भारत
हिंदु राजे १५९२
परकिय ६८०
एकुण ई.स.पुर्व २२७२ १९४७ २२७२
या इतका बलशाली आणि पराक्रमाची शानदार परंपरा असलेला इतिहास पहिल्यानंतर खरतर आपल्याला शिकवलेल्या इतिहासाचा खोटेपणा जाणवतो. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या या अद्भुत , वैभवशाली इतिहासाचा विसर पडावा याच उद्देशाने मुघल, ब्रिटिश आणि त्यानंतरच्या राज्यकर्त्यानी पद्धतशीर प्रयत्न केले. कारण हि भूमी इतिहासातून शिकून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा आकाशात झेप घेण्यासाठी गरुडाची जिद्द ठेवणारी आहे. म्हणूनच या इतिहासाचं शक्य तितकं खच्चीकरण करणं हाच उद्देश गेल्या सातशे ते आठशे वर्षात झाला आणि होतोय. म्हणून तो धर्म, ती नीती, ते ज्ञान तो आत्मसम्मान, ते वैभव या भूमीला पुन्हा प्राप्त व्हावा या हेतूने अनेक लोक कार्यरत आहेत आणि राहतील. कारण जशी हि भूमी वीरांची आहे तशीच ती धर्माची सत्ता पुनर्स्थापित करणाऱ्या आर्य चाणक्यांची देखील आहे.
म्हणूनच दुर्दैवाचे दशावतार दाखवणारी सहिष्णुता, शत्रूवर दया दाखवणारी आत्मघातकी क्षमाशीलता, संस्कृती, धर्म यांना स्मशानाच्या दारापर्यंत नेणारी शांतता आणि अनंताचं वैभव मातीमोल करणारी अहिंसा या सद्गुणविकृतींचा (वीर सावरकरांचा शब्द) त्याग केला तर अयोग्य व्यक्तींना व राष्ट्रांना त्यांच्या त्यांच्या जागा दाखवणं शक्य होईल आणि याच संस्कृतीचे गोडवे गाऊन त्याच संस्कृतीचे लचके तोडणारे जयचंदाच्या वंशजांचा बंदोबस्त करता येईल आणि तरच श्रीकृष्णनीती नक्कीच आपण आत्मसात केली असं खऱ्या अर्थाने म्हणता येईल. प्रत्येकाला राज्य करून निर्णय घेता येणार नाहीत हे नक्की. परंतु योग्य त्या व्यक्तीला त्या स्थानी नेमून आपल्या धर्माच्या रक्षणाचं आपलं उत्तरदायित्व नक्की पार पाडता येईल आणि त्यावर सतत लक्ष ठेवून जागरूक राहून या उच्च सांस्कृतिक सनातन धर्माची ध्वजा हिमालयात उज्वल ठेवता येईल. अन्यथा एकेकाळी इराण पासून ब्रह्मदेशापर्यंत पसरलेली हि संपदा, जशी आपल्याच चुकांमुळे, दुर्लक्ष करण्यामुळे, उदासीनतेमुळे आणि नाकर्तेपणामुळे आक्रसत गेली, तशीच ती अजून अजून आक्रसत जाऊन एक दिवस लयाला जाईल. म्हणूनच वेळीच जागे होऊया.
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
क्रमशः
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
भाग सदतीसावा समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री
Comments
Post a Comment