Skip to main content

#श्रीकृष्णनीती #भाग२७

#श्रीकृष्णनीती #भाग२७

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

महाभारताचा पूर्ण सारीपाट पहिला तर त्यात सुरवातीपासून कुरु वंशीयांची मुख्य कथा सापडते. यात मुख्यत्वे श्रीकृष्णाचा वावर इतर व्यक्तित्वाच्या तुलनेत संपूर्ण महाभारत भारून टाकतो. श्रीकृष्णाव्यतिरिक्त भीष्म हे एकच महायोद्धे आहेत जे दीर्घ काळ परिघावर वावरत आपली छाप पडतात. मुळात हि फक्त कथा नसून एका घडलेल्या महानाटयाचं वास्तविक साद्यन्त वार्तांकन जे महर्षी व्यासांनी इथम्बुत लिहून घेतलं आणि आज मागील पाच हजार वर्ष आणि पुढेही कित्येक युगं हे मानवी मनाला आकर्षित करेल. 

मुळात यातील अगणित पात्रं, प्रत्येकाचं स्वतःचा परीघ आणि त्यायोगे कथानकातील  त्याचं योगदान, या सर्वांचा एकत्रित विचार करणं हे एक मोठं आव्हान आहे. इतकं दीर्घ कथानक, इतक्या दीर्घ पद्धतीने मांडणं, हेच मुळात दैवी आहे. या कथानकाच्या आधारावर कित्येक उप कथानकं वा लेख इत्यादी  आतापर्यंत लिहिले गेले असतील. व्यासोच्छिष्ट जगत सर्वं या उत्कीप्रमाणे जे महाभारतात नाही ते जगात अस्तित्वात असू शकत नाही. याचा प्रत्यय अनेक वेळा आणि अनेक प्रकारे येतो. 

संजयला मिळालेली दिव्य दृष्टी आणि त्याद्वारे त्याने धृतराष्ट्रांना, युद्धाचं, युद्ध चालू असताना, केलेलं यथोचित वर्णन, हे कदाचित या जगतातील पाहिलं थेट प्रक्षेपण असेल, जे विज्ञानाने साध्य करून आज आपण बऱ्याच गोष्टी थेट पाहतो. अनेक प्रकारची अस्त्र शस्त्र , कदाचित ब्रम्हास्त्र म्हणजे अणुबॉम्ब वा याचंच आधुनिक रूप असू शकेल. अश्या अनेक गोष्टी महाभारतात आहेत, जिथे अजूनपर्यंत आपण वा आपलं विज्ञान अजून पोचू शकलेलं नाही. कारण महाभारताचा काळ द्वापारयुगाचा शेवटचा काळ असल्यामुळे असेल, आपण आज ज्याला वैज्ञानिक प्रगती म्हणतो ती, ज्ञान , मंत्र या माध्यमातून नुसती अस्तित्वातच नव्हती तर तिचा वापरदेखील सुरू होता. 

यात एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, जसं हे विध्वंसक ज्ञान मंत्रांच्या माध्यमातून जबाबदार लोकांच्या हातात राहावी, याच उद्देशाने ते पिढी दर पिढी हस्तांतरित होत गेलं. परंतु यात जन्माने मिळणारी ज्ञानाची सुलभता किती चुकीची होती, हे अश्वत्थामाने अत्यंत नीचपणे ब्रम्हास्त्राचा केलेला वापर, हे इतकं संहारक ज्ञान चुकीच्या हातात गेल्यास काय परिणाम होतात हे ठळकपणे दाखवून दिलं. यावर पुढे जाऊन हे देखील म्हणता येईल की, हा इशारा व्यासांनी त्याच वेळी दिला होता जो आज करोनाच्या संदर्भात आपण लक्षात घ्यायला हवा की, इतकं विध्वंसक आणि विघातक ज्ञान चुकीच्या हाती गेल्यावर काय परिणाम होतात, फक्त विनाश. 

या प्रसंगात अजून एक शिकवण मिळते की,क्रोध आणि अनावर क्रोध किती विघातक असू शकतो. सर्वस्वाचं भस्म करण्याची ताकद क्रोधात आहे, कारण तोही एक अग्नी आहे. त्यामुळे असा अग्नी हा वडवनलासम असतो आणि संपूर्ण मानवतेची राखरांगोळी करण्याची क्षमता त्यात आहे. पांडवपुत्र, द्रष्टद्युम्न यांचा मृत्यू, हे एक प्रातिनिधिक उदाहरण होतं असं समजायला हरकत नाही. कदाचित हे असच पुढील युगात होऊ शकेल जर कोणताही ज्ञान विध्वंसक हातात पडलं  तर, हेच कदाचित महर्षी व्यासांना सुचवायचं असेल आणि आज ते सत्य होताना दिसत आहे. अनेक प्रकारची विध्वंसक अस्त्र अनेक देशांनी निर्माण करून स्वसंरक्षणाच्या नावाखाली जमा केली आहेत. अर्थात यात पूर्ण असत्य आहे अशातला भाग नाही. 

कारण प्रथम हल्ला न करण्याचं मानवी तत्वज्ञान फक्त भारतासारखा एखादा  देश पाळू शकतो.  पण सर्वच पाळतील असं नसल्यामुळे ती तुमची कमजोरी समजली जात काम नये. हे देखील युधिष्टिराच्या चरित्रावरून श्रीकृष्णांनी लक्षात आणून दिलय. म्हणूनच स्वसंरक्षण हा हक्क न राहता जबाबदारी होते. कदाचित व्यासांनी सुचवलेल्या या भीतीला श्रीकृष्णाचं व्यक्तित्व हे एक उत्तम उत्तर असू शकेल. 

श्रीकृष्ण ज्यांनी यदा यदाही धर्मस्य हे आश्वासन जरी दिलं असलं तरी ते अपवादात्मक आणि पूर्ण विनाशाची वेळ येईल, त्यावेळी नक्कीच पाळलं जाईल हा विश्वास आहेच. परंतु श्रीकृष्णाचं चरित्र विशेषतः युद्धातील भूमिका हि निश्चित एक मार्गदर्शक तत्वज्ञान आहे. श्रीकृष्णाने कोणतीच गोष्ट सहज जाता जाता केली नाही. प्रत्येक गोष्टी मागे कार्यकारण भाव आणि कारणमीमांसा नक्कीच आहे. 

मुळात याची सुरवात जन्मापासूनच होते. प्रत्यक्ष ज्याला या जगातून संपवायचं आहे, त्याच्याच बहिणीच्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेतला, तेही त्या कंसाला त्याच्या मृत्यूची पूर्ण सूचना व पूर्वकल्पना, आकाशवाणीच्या माध्यमातून, देऊन. यात मुळात एक गोष्ट सिद्ध होते, कि हि त्याला दिलेली संधी होती. जर सुधारायचं असेल तर अजूनही वेळ आहे. म्हणजे नीचातल्या नीच माणसाला देखील सुधारण्याची एक संधी देऊन , पूर्वसूचना देऊन मगच या जगात त्याच्या विनाशासाठी प्रवेश केला. 

यातून इतर दुष्ट शक्तींना देखील एक प्रकारचा संदेश दिला कि, प्रत्येकाची वेळ आली आहे. जो यातून धडा घेईल त्याला जगण्याची संधी मिळेल. अन्यथा त्याचा मृत्यू निश्चित आहे. म्हणजेच यातून अजून एक गोष्ट सिद्ध केली कि, जगात इतर सर्व भौतिक गोष्टींना शेवट आहे त्याप्रमाणेच नीचपणा, दुष्टपणा यांना देखील शेवट आहे. तरीही त्याच दुष्टपणातून पुढील काळासाठी दुष्टांची साखळी तयार होणारच हेही दाखवून दिलं. म्हणूनच प्रत्येकाला यासाठी मनाने , शरीराने तयार असणे गरजेचे आहे. 

श्रीकृष्णाबद्दल विस्ताराने पुढेही भागात. .....

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

क्रमशः

©® संकल्पना व लेखन :  प्रसन्न आठवले

भाग सत्ताविसावा  समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...