Skip to main content

शहाणपण आणि प्रेम


शहाणपण आणि प्रेम 

शहाणपण हे जन्मतः मिळावं लागतं आणि प्रेम हे यौग्य वयात करून व्यक्त व्हावं लागतं . ते नाही जमलं तर पन्नाशीत काय होतं  ते मांडण्याचा प्रयत्न केलाय 

उपजताच जे आले नाही पन्नाशीत मिळेल कसे 
तरुणपणी जे जमले नाही पन्नाशीत जमेल कसे 

रांजण शहाणपणाचे आमुच्या 
जन्मतः रितेच होते 

म्हणून गद्धे पंचविशीत आमुचे 
सूत  कुठेच जमले नव्हते 


शहाणपणाचे सोडा जाऊदे 
त्याने काही अडले नाही 

पंचविशीतही मग गद्धे राहिलो 
म्हणून काही जमले नाही 

आता पन्नाशीमध्ये यातील काय जमेल कसे 
तरुणपणी जे जमले नाही पन्नाशीत जमेल कसे 


तरुणपणी केला विचार तरी 
व्हावे शहाणे जमवून अक्कल 

फुकाचे ते मंत्र घेऊनि कधीतरी 
हाती शेवटी फक्त उरले टक्कल 

न्हावीदेखील चकित व्हायचा 
केसाचे हे तुमच्या नुसते जंगल 

जाऊ दे ते शहाणपण मग 
प्रेमात तरी होऊया पागल 

खाते हे शहाणपणाचे रिते राहिले  ते भरेल कसे 
तरुणपणी जे जमले नाही पन्नाशीत जमेल कसे 

म्हटले आता जावे दुसऱ्या वाटे 
बघावे प्रेम जमते का मज 

खूप मारल्या चकरा उद्यानी  
कॉलेजातील शोधले मी जग 

कुठेच शिजली नाही डाळ ती 
नशिबातच नाही जमेल कसे मग 

कळेपर्यंत प्रेमाचा मार्ग आम्हाला 
पंचविशीचे कधीच सरले ते जग. 

पटण्यासाठी काहीच नाही कोणी आम्हा पटेल कसे 
तरुणपणी जे जमले नाही पन्नाशीत जमेल कसे 

आता शोधात फिरतो दोन्ही गुण 
मिळणे कठीण तरी विजेरी घेऊन 

पन्नाशीत अनुभवाने कथिले मज  
शहाणपण आहे बक्कळ बघ शोधून 

म्हटले त्याला आता करू काय मी 
हे शहाणपण अन प्रेम शोधून 

ज्या गावाचा रस्ता  न ठाऊक मज 
करू काय माहिती मी घेऊन 

अनुभवाचे सार कवितेत सांगतो, हेतू इतुकाच असे 
तरुणपणी जे जमले नाही पन्नाशीत जमेल कसे 

  
कवी : प्रसन्न आठवले 
३०/०६/२०२०
०८:०६











Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...