Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

रामायण ,उर्मिला त्याग , निष्ठा यांची मूर्ती

वाचण्यात आलेली रामायणातील हिंदी कथा माझ्या शब्दात आणि शैलीत मराठीत स्वैर अनुवादित !!  इंद्रजिताच्या शक्तीअस्त्राचा परिणाम होऊन भ्राता लक्ष्मण मूर्च्छित होऊन पडले आहेत. प्रभू स्वतःच्या मांडीवर लक्ष्मणाचं मस्तक ठेवून विलाप करत बसले आहेत. हनुमंत विभीषणाच्या सांगण्यावरून वैद्यराज सुशेण याना ते झोपलेल्या पलंगासह  घेऊन येतो. वैद्यराजाना जागं करून विभीषण  परिस्थिती कथन करून लक्ष्मणाचा जीव वाचवण्याची विनंती करतात. . वैद्यराज लक्ष्मणाची नाडीपरिक्षा करून प्रभुंकडे हात जोडून पाहतात आणि म्हणतात " हे श्रीराम लक्ष्मणाला वाचवण्याचा एकच उपाय आहे हिमालयात संजीवनी नावाची वनस्पती आहे तिचा पाला काढून त्याचा काढा करून तो जर लक्ष्मणाला दिला तर त्याचा जीव वाचू शकेल. तेदेखील सूर्योदयाच्या आत, अन्यथा...... "  वैद्यराजांचे हे शब्द एखाद्या तीराप्रमाणे प्रभूंच्या हृदयात घुसले. नेहमी अविचल असणारे  प्रभू एक क्षण विचलित होतात . विभीषण आणि सुग्रीव यांनी प्रभुना धीर दिला. बंधू विरहात व्यथित झालेले प्रभू क्षणात अश्रू ढाळू लागले. प्रत्यक्ष प्रभुना अश्रू ढाळताना पाहून हनुमंत अत्यंत कष्टी झाला. त्य...

देवभूमी

आज या संकटात अनेक हातानी ईश्वरच सहाय्य करतो आहे. ही नक्कीच दैवभूमी आहे. म्हणूनच प्रत्येक संकटात पुण्यवान माणसांच्या जाणिवा जागृत ठेवून त्यांच्या करवी सहाय्य करवून घेऊन ईश्वर या भूमीला संकटातून सहजी बाहेर काढतो. आजसुद्धा या संकटातून वैद्यकीय सेवा देणारे, सुरक्षा सेवा देणारे, अत्यावश्यक सेवा देणारे, सरकारी अधिकारी जे घरी न बसता अहोरात्र आपल्यासाठीच झटत आहेत, त्या सर्व सेवार्थीच्या माध्यमातून स्वतः ईश्वरच या भूमीवर अवतरला आहे., अशी माझी धारणा आहे. त्यांच्या मनोबलाला आपण द्विगुणित करूया.  काही अपवाद वगळता बहुतांशी जनसामान्य घरीच राहून त्यांना व सरकारला सहकार्यच करत आहेत. त्या सर्वांना ईश्वररूप मानून खालील ओळी लिहिल्या आहेत. ईश्वर हा वेगळा सहाय्य करत नाही तर मानवरूपातील त्याच्या अंशातूनच तो मानवाला सहाय्य करतो. म्हणूनच त्या मानवरूपातील सर्व सेवार्थी ईश्वरअंशाला ही शब्दरूप पुष्पमाला सादर.  अनंताची शक्ती पाठीशी अनंत भजती ईश्वराला अनंतरुपे पाहतो ज्याला तोचि राखतो कृपे आम्हाला निष्काळजी न आम्ही कधी भक्ती करतो विधात्याची कुणी म्हणती स्वामी त्यांना महाराज म्हणती त्या स्वरूपाला अनंतरुपे प...

सुभद्राहरण ९

सुभद्राहरण ९ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll आमच्या चर्येवरील भाव आणि अंतःकरणातील पश्चाताप जाणून देवर्षी म्हणाले. दक्षिण समुद्र किनाऱ्यावर पाच रमणीय तीर्थे आहेत. तुम्ही विनाविलंब  तेथे प्रस्थान करा. तिथे विश्वातील सर्वश्रेष्ठ पुरुष धनंजय अर्थात पांडुपुत्र अर्जुन लवकरच येईल आणि तुमची सुटका करेल. त्यांचे बोल ऐकून आम्ही शीघ्र गतीने या तीर्थात आलो. हे अनघ, या बाकीच्या चार तीर्थात माझ्या चारही सख्या आहेत. मी तुम्हाला हात जोडून नम्रतेने विनंती करते की आपण त्वरित त्यांचीसुद्धा या शापातून मुक्तता करावी."  पांडुपुत्र अर्जुनाने वर्गाच्या विनंतीवरून त्या चारही ग्राह रूपातील अप्सरांना जलाबाहेर काढून त्यांना शापमुक्त केलं. बाहेर आल्याबरोबर  त्या पुनः आपलं आधीचं रूप प्राप्त कर्त्या झाल्या. अर्जुनाचे चरणस्पर्श करून त्या पाचही अप्सरांनी अर्जुनाचे आभार मानून पुनः नंदनवनात प्रस्थान करण्याची अनुमती घेतली. अर्जुन त्यांना अनुमती देऊन. त्या पाचही तीर्थात स्नानसंध्या करून पुनः मणिपूरला चित्रांगदेकडे परत आला. अर्जुन गेल्यानंतर अर्थातच त्याच्यापासून चित्रांगदेला झालेल्या अर्जुन...

करोनावर विनोदी अस्त्र !!

करोनावर विनोदी काव्यअस्त्र !!  करोना गेलाय डोक्यात कामाची लिस्ट हातात करोनाच्या हल्ल्याने पुरुष झालेत हताश करोना गेलाय डोक्यात ........ ऑफिसला जाणे बंद नोकरदार हो घरात  बाहेर गेलो तर पोलीस जेलर बसला घरात  करोना गेलाय डोक्यात ........ कधी होईल कधी संपेल शाश्वती नाही मनात क्षण क्षण जात नाही  मोजीत बसलो घरात  करोना गेलाय डोक्यात ........ कोणी सांगे हे करा घालवा वेळ शिकण्यात स्वैपाक वाचन अवांतर करा सुरू जोशात करोना गेलाय डोक्यात ........ दिवसा झोपा रात्री जागा स्थिती झालीय उलट  शेड्युल बिघडेल सारे करोनाच्या या लफडयात करोना गेलाय डोक्यात ........ लोकडाऊन झालो  सारेच आपल्या घरात कोणीच नाही दिवसदिवस या डोळ्यांना दिसत करोना गेलाय डोक्यात ........ संपो हे लवकर नष्टचर्य मोकळी हवा श्वासात वाट पहातो सारेजण मजा नॉर्मल जगण्यात करोना गेलाय डोक्यात ........ ©® कवी : प्रसन्न आठवले २९/०३/२०२० २१:२२

सुभद्राहरण ८

सुभद्राहरण ८ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll  वर्गा पुढे वदली. "त्यांच्या तपसाधनेत व्यत्यय आणण्याच्या उद्देशाने आम्ही हास्यविनोद व नृत्य करण्यास सुरुवात केली. परंतु हे महापराक्रमी अर्जुन, त्या तेजस्वी ब्राम्हणाने आपलं मन जराही विचलित होऊ न देता आपली साधना सुरू ठेवली. हे क्षत्रिय शिरोमणी, परंतु आमचं तपोभंगाच्या दुष्कृत्याने क्रोधीत होऊन त्या तेजस्वी तपस्वी ब्राम्हणाने आम्हाला शाप दिला की, तुम्ही शंभर वर्षापर्यंत जलात ग्राह होऊन विहार कराल. हे महापुरुष, त्या द्विजवराचे ते विद्युल्लतेसम उद्गार ऐकून आम्ही अत्यंत दुःखी झालो.  आपल्या तप आणि धर्मकार्यापासून तसूभरदेखील न ढळणाऱ्या त्या विप्रवराच्या चरणी आम्ही शिश ठेवून अत्यंत पाश्चातापदग्ध अंतःकरणाने आम्ही त्याला वदलो. हे तपोनिधान, आम्ही सौन्दर्य, काम आणि वासना यामध्ये उन्मत्त होऊन हे कृत्य करण्यास धजावलो. परंतु आम्ही आपल्यासारख्या ज्ञानी आणि तपस्वी विप्रवराचा तपोभंग करण्यास्तव येथे उतरलो हेच मुळात आमच्या अधःपतानाचं कारण आहे व परिणामदेखील.  आपण कृपाळू अंतःकरणाने आम्हाला क्षमा करावी. हे धर्मात्मा, शास्त्रात स्त्र...

सुभद्राहरण ७

सुभद्राहरण ७ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll मणिपूरचा त्याग करून अर्जुन समुद्र मार्गाने परमपावन तीर्थांचे दर्शन घेत घेत  समुद्रकिनाऱ्याच्या रेषेने मार्गातील तीर्थस्थानांचं दर्शन घेत दानधर्म करत पुढे पुढे मार्गस्थ होत होता. अश्याच परमपुण्यवान तीर्थांचं दर्शन घेत असताना अर्जनाच्या ध्यानात एक गोष्ट आली की, मार्गात पाच तीर्थ अशी आहेत की ज्यांचं दर्शन घेण्यासाठी ऋषीमुनी, साधू,  तपस्वी, यात्रेकरू इत्यादी न जात पुढे निघून जात आहेत. त्या तीर्थांची नाव आहेत अगस्त्यतीर्थ, सौभद्रतीर्थ, परमपवित्र पौलोतीर्थ, अश्वमेधाचं पुण्य देणारं कारंधमतीर्थ त्याचप्रमाणे पापनाशन महापुण्यवान भारद्वाजतीर्थ. अर्जुनाने बरोबरीच्या साधुजनांना पृच्छा केली  " आपण या परिसरातील सर्व तीर्थांचं यथोचित दर्शन घेता पण या पाच तीर्थांचं दर्शन घेण्यास्तव कोणीही का जात नाही. या मागे काय कारण आहे मी जाणून घेऊ इच्छितो."  एक अनुभवी आणि वयोवृद्ध तपस्वी म्हणाले " हे धनंजया , या पाचही तीर्थांमध्ये पाच मगरी राहतात ज्या त्या तीर्थात स्नान करणाऱ्यला जलामध्ये ओढून नेतात. म्हणून त्या पाचही तीर्थाना टाळून ...

सुभद्राहरण ६

सुभद्राहरण ६ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll नागकन्या त्याला म्हणाली " हे वीरपुरुष तुमची सर्व कथा मला माहित आहे. परंतु देवर्षीच्या प्रयश्चित्ताचा मतितार्थ इतकाच आहे की, आपण द्रौपदी संदर्भात या वचनाचं पालन करावं व त्यात मोह बाधा होऊ नये म्हणून दूर राहून हा प्रवासाचा नियम बनवला आहे. हे विशालनेत्री अर्जुन, माझी इच्छा पूर्ण करण्याने तुमच्या धर्माची कोणतीही हानी होत नाही. जरी आपल्या कर्तव्य धर्माची थोडीफार हानी झालीच तर माझ्या सारख्या युवतीचं मन राखून तिची इच्छापूर्ती केल्याने मिळणाऱ्या पुण्याने ती हानी भरून निघेल. म्हणून माझी कामना पूर्ण करून आपण मला प्राणदान देण्याचं पुण्य जरूर कमवू शकाल. आपण प्रतिदिन अनेक जीवांवर उपकार करता. मी आपल्याप्रती अनुरक्त आहे आणि आपली समागमाची अपेक्षा करते. अतः आपण व्यर्थ चिंता सोडून माझ्या इच्छेचा विचार करावा हीच माझी नम्र विनंती." उलूपीच्या विनंतीचा मान राखून, मनोमन ज्येष्ठ भ्राता युधिष्ठीर यांना प्रणाम करून तो पूर्ण दिवस आणि रात्र उलुपी सोबत व्यतीत केली. प्रातः यथाविधी सर्व उरकून अर्जुन कौरव्य नागराजाच्या भवनातून गं...

सुभद्राहरण ५

सुभद्राहरण ५ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll अर्जुनाने युधिष्ठिराचं म्हणणं स्वीकारून प्रस्थानाची तयारी केली. माता कुंती , द्रौपदी सह चारही बंधू अत्यंत दुःखव्याप्त आहेत. साहजिक आहे सर्वांचा प्रिय धनंजय अर्थात अर्जुन एक तप अर्थात बारा वर्षांसाठी वनवासात निघाला आहे. मोठया जड व व्यथित अंतःकरणाने सर्वांचा निरोप घेऊन अर्जुन आपल्यासह काही दळभार (सैन्य) व तीर्थाटनासाठी निघालेले यात्री, भगवतभक्त, वानप्रस्थाश्रमी, पुराण वेद पठण कीर्तन करणारे,  साधू, संन्यासी, ऋषी व विप्र यांना घेऊन इंद्रप्रस्थातून प्रस्थान ठेवतो. इंद्रप्रस्थाहून गंगा किनाऱ्याच्या मार्गाने निघालेला अर्जुन अनेक तिर्थक्षेत्रांचं दर्शन घेत , मार्गातील अनेक ग्रामातील देवालयांना दानधर्म करत करत गंगाकिनारी गंगाद्वार अर्थात हरिद्वारला पोहोचला. अर्जुनासमवेत आलेल्या सर्वांना त्याने आपण इथे आज विश्राम करणार आहोत हे सांगून सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्याची आज्ञा दिली. अर्जुनाच्या आज्ञानुसार सर्वांनी तिथे राहण्यासाठी आपापली गाठोडी व सामान उतरवून त्यांच्या नियोजित राहुटी मध्ये प्रवेश केला. ब्राम्हमुहूर्ती , त्यांच्या...

सुभद्राहरण ४

सुभद्राहरण ४ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll  आश्वस्त झालेला द्विजवर अर्जुनास म्हणाला. " हे महाबाहो, मी खांडवप्रस्थातील निवासी द्विजवर. आताच माझे गोधन व द्रव्य काही कंटकांनी बळजोरी करून माझ्या इथून चोरून नेले आहे.  आपण माझ्या गोधनाचे आणि द्रव्याचे  रक्षण करून त्यांना योग्य ते शासन द्याल हे जाणून मी येथे आलो आहे." विप्रवराचे हे उद्गार ऐकून धर्मरक्षणार्थ तत्पर आणि पात्र असलेल्या अर्जुनाने त्या विप्रवरास त्वरित सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्याच्या लगेचच लक्षात आलं की त्याचा चाप अर्थात गांडीव आणि शर असलेला भाता महालाच्या आतील कक्षात राहिला आहे, जिथे ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर आणि द्रौपदी एकांतवासात आहेत. जर आतील कक्षात गेलो तर देवर्षीच्या नियमाचा भंग होतो आणि जर तसं न करता ब्राह्मणाचं साहाय्य केलं नाही तर क्षत्रिय व राजधर्माचं उल्लंघन होईल.  या भवतीनभवतीमध्ये बद्ध झालेल्या अर्जुनाने विचार केला की, देवर्षीनी घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन झालंच तर प्रायश्चित्त घेऊन त्या पातकातून मुक्ती मिळेल. परंतु विप्रवराला अर्थात असहाय्य जीवास सहाय्य न केल्यास घ...

तू

तुझं गाणं गुणगुणणं शब्दातीत आहे त्या नादात मी स्वत:लासुद्धा हरवतो त्या लहरीत मन बेधुंद होतं, नकळत त्याच दोलायमान अवस्थेत मी झुलतो केसातून येणारा मोगऱ्याचा सुवास मला अनाहत नादात घेऊन जातो तुझ्या डोळ्यातील काळी  वर्तुळं  त्या तेजात मी मंत्रमुग्ध होऊन जातो अविरत आनंदाच्या त्या अनुभूतीतून मन सतत म्हणतं अजून जरा डुंबतो  अक्षय सुखाचा हा जणू सोहळाच  याच भासात सतत मी विहरत असतो तिथून बाहेर पडूच नये असं वाटून  डोळे मिटून तो आनंद साठवत जगतो ©® कवी : प्रसन्न आठवले १७/०३/२०२० २०:४४

सुभद्राहरण ३

सुभद्राहरण ३ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll  त्यांना श्रीब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना वर मागायला सांगितला.त्यांनी श्रीब्रह्मदेवांना अमरत्वाचा वर मागितला. ज्यावर श्रीब्रह्मदेव म्हणाले कि, हा वर देण्याचा अधिकार मला  नाह. परंतु तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम पाहून मी हा वर देऊ शकेन कि तुम्हाला तुमच्या दोघांव्यतिरिक्त इतर कोणतीही शक्ती मारू शकणार नाही. अर्थातच दोघांचा एकमेकांवर विश्वास इतका दृढ होता कि, त्यांना खात्री होती, कि त्या दोघांच्यात कधीही तंटा वा युद्ध होऊच शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी श्रीब्रह्मदेवांना त्वरीत होकार देत त्या वरदानाचा सहर्ष स्वीकार केला आणि श्रीब्रह्मदेवांना नमस्कार करत. भूलोकी परत आले. भूलोकी परत येताच त्यांनी समस्त पृथ्वी आपल्या अत्याचाराने व्यापून टाकली. अर्थात पूर्ण पृथ्वीवर अधिराज्य प्रस्थापित केल्यापश्चात त्यांनी आपला मोर्चा देवेंद्राचा स्वर्ग जिंकण्याची प्रतिज्ञा केली. हि वार्ता देवांच्या कानावर जाताच सारे देव भयभीत होऊन ब्रह्मलोकी श्रीब्रह्मदेवांच्या समोर येऊन उपस्थित झाले. श्रीब्रह्मदेवानी त्यांना येण्या...

सुभद्राहरण २

सुभद्राहरण २ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll  पाचही बंधू, कृष्णा अर्थात कृष्णाची मानस भगिनी द्रौपदी आणि कृष्णाची आत्या अर्थात माता कुंती यांनी अत्यंत जड अंतःकरणाने त्याला प्रस्थानाची अनुमती दिली.  युधिष्ठिर वदला " हे कृष्णा नरोत्तमा, अजून काही काळ आमच्यासह व्यतीत केला असतास तर अतिउत्तम झाले असते. तुझ्या मात्र असण्यानेदेखील क्लेशकारक व दुःखदायक घटनांचा थांगपत्ता देखील मनाला लागत नाही. देह सुखेनैव त्या काळात यातना भोगत असतो. परंतु मन त्याचे क्लेश आत्म्याप्रत पोहोचू देत नाही."  कुंती धर्माच्या बोलण्याला दुजोरा देत त्वरित वदली.  " हे पुत्र युधिष्ठिर योग्यच वदला. मला तर या दुःखदायक काळात कृष्ण सोबत असल्याचा विशेष लाभ व आनंद होतो. म्हणूनच माझीही इच्छा होती की, कृष्णा तू काही काळ अजून थांबलास तर मनाला तितकाच संतोष लाभेल."  कुंतीचे कथन अर्धे थांबवून कृष्ण वदला " हे पाच वीरांची माता , कुंती आत्या , मोह हा माणसाच्या अनेक रिपुंपैकी एक आहे. जे मोहक मनभावन आहे ते अधिक काळ समीप असावे असे वाटत राहते. परंतु हा मोह अवरावा व म...

सुभद्राहरण १

सुभद्राहरण १  ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll  जगन्माता जगतपिता भाव उकळोनि तव चरणा आता वाहतो नवीन पुष्पां कथानामे सुभद्राहरणा  स्वीकारोनी या कमलपुष्पां पुरवावे मनमनोरथा  श्रीगणेश श्रीशारदा लागलो चरणा हे आदिनाथा नमन एकदंता वरदविनायक शुर्पकर्णा भालचंद्रा तुझे गाऊनी स्तोत्र दिन सुरू करतो हा तव भक्त माझ्या इच्छिल्या संकल्पास कृपा करोनि प्रसन्न  सुभद्राहरण कथाभाग पूर्ण करावा धरुनी हस्त श्रीगजानन, श्रीरुक्मिणीकृष्ण आणि  सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, यांना सादर वंदन करून नवीन कथाभाग सुभद्राहरण मी सुरू करत आहे. या कथेच्या मिषाने कृष्णकोश, श्रीधरकवी यांचं पांडवप्रताप आणि मोरोपंतांचं कृष्णविजय हे वाचण्याचा योग आला. यातील मोरोपंत आणि कवी श्रीधर यांचं लेखनकार्य अतुलनीय असं आहे.  त्यांच्या लेखनाची व्याप्ती पाहिली तर मी सागरात तिळाएवढं सुद्धा लेखन करत नाही असा प्रत्यय मला आला. तरीही मराठी सारस्वताच्या प्रांगणात काही मृत्तिका कण वेचता आले तर तीही सेवा खूप आहे असं मनाचं समाधान करून मी विषयाकडे वळतो. माझ...

श्रीरुक्मिणी स्वयंवर ९५ (कथासमाप्ती)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ९५ (कथासमाप्ती) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    संपूर्ण द्वारकेला आपल्या नवपरिणीत वधूला प्रदक्षिणा करवून आणि जनसामान्यांना संतोष देववून, श्रीकृष्ण आणि देवी रुक्मिणी प्रसादात परतले. यथावकाश देवी रुक्मिणी द्वारकेच्या प्रसादाशी आणि द्वारकेसह द्वारकावासियासी समरस झाल्या. मूळ राजरूधीर असल्यामुळे द्वारकेतील रीतिरिवाज, चालीरीती, कुलधर्म, कुलाचार शिकून घेण्यास आणि ते आत्मसात करण्यास  देवी रुक्मिणी यांना फार त्रास झाला नाही. पण मुख्य बाब अर्थातच कृष्णाचा स्वभाव. त्याचा वेध घेण्यात मात्र देवी रुक्मिणींना खूप त्रास झाला, तोदेखील आयुष्यभर. अर्थात त्यातही प्रेमाचा ओलावा असल्यामुळे देवींना कृष्णाच्या नटखट स्वभाव देखील भावला. त्या आपल्या संसारी रममाण झाल्या.  श्रीव्यासमुनींनी जे कथन केले श्रीमहाभारतात त्यातील श्रीरुक्मिणीहरण अर्थात श्रीरुक्मिणीस्वयंवर हा रोचक कथाभाग श्रीरुक्मिणीला कृष्णाची , कथा कीर्तनकार बुवांक...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ९४ (द्वारकेत हर्ष उल्हास)(उद्या कथासमाप्ती)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ९४(द्वारकेत हर्ष उल्हास) (उद्या कथासमाप्ती) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    रेवती देवीने तद्नंतर रुक्मिणीला पूर्ण राजप्रासाद दाखवून आपल्या महाली नेले.  समीप बसवून यादवकुळीच्या अनेक प्रथा, चालीरीती यांची खडानखडा माहिती दिली. कोणतं कार्य, कोणते सणवार , कोणती व्रतवैकल्ये आहेत, त्यांच्या काय काय कथा आहेत, काय काय करावं लागतं, काय काय गोष्टी पिता श्रीवसुदेव, माता देवकी, दिर श्रीबलराम व श्रीकृष्ण यांना आवडत नाहीत व ज्या टाळल्या अथवा वर्जिल्या पाहिजेत त्याची पण पूर्ण माहिती देऊन त्या तिला स्मरतील याची काळजी घेतली.  दोघांची लाडकी व एकमेव बहीण सुभद्रा हिचं घरातील स्थान आणि तिचे स्वभाववैशिष्ट्ये याबद्दल देखील सविस्तर माहिती देऊन विशेष काळजी घेण्याची सूचना केली. घराण्याचे कुलगुरू व आचार्य यांची माहिती देखील तिला करून दिली. घरातील सेवक व सेविका यांच्याशी तिची ओळख करून देतानाच प्रत्येक सेवक व सेविकेला आणि त्यांच्या कुटूंबाला ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ९३ (कृष्णरुक्मिणीमय द्वारका)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ९३(कृष्ण रुक्मिणीमय द्वारका) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    आता वरात नगरात शिरण्याचा अवकाश होता. नगरद्वारी वरात पोचली. मंडळींना थांबवून कृष्णरुक्मिणीसह संपूर्ण वरातीची दृष्ट काढून ती वेशीबाहेर उलट दिशेने उतरवून टाकण्यात आली.  राजस रुपडं हरीचं पाहुनी नजर हटेना जनजन पाहती ऐसें पापणी डोळा लागेना कुणी उंच माडी चढले कुणी फांदी फांदी गेले पोरसोर खादी बैसले ढकलती लक्ष्मी पाहण्या उचलली टाच हो कुणी हरीरुक्मिणी नजर भरुनी खांदा उचलली कुणी पत्नी लाज टाकली हरी देखण्या गुणिजन नगरवासी सारे पुष्पे पुष्पहार कुंकू अक्षता फेकती पाहुनी हरी माथा अक्षता हर्षे नीजपुण्या वरात फिरे द्वारकानगरी मुख्यमार्ग फिरले किती मूळमाधवापासून वराती थकले न पदी नाचण्या भान न राहिले माहुता फिरे त्याच त्या मार्गा हास्यविनोदे जन हर्ष गगनी तुडुंबही मावेना पोचली द्वारप्रासादी हरी लक्ष्मी अंबारी  उतरले जोडीने खाली देवकी येई औक्षणा उतरून लिंबलोणा अर्पिली काष्...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ९२ (कृष्णरुक्मिणीची वरात)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ९२ (कृष्णरुक्मिणीची वरात) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    वसुदेव अर्थातच राजाच्या विनंतीचा स्वीकार करतात आणि वऱ्हाडाकडे पाहून प्रस्थान ठेवण्याची आज्ञा देतात. त्याबरोबर ढोल,ताशे,  नगारे, वाजंत्री यांचा लयबद्ध नाद आणि त्या तालावर यादवांचा जल्लोष सुरू होतो. वरातीला  सुरवात होते. सर्वांचा , मोठ्या जड अंतःकरणाने निरोप घेऊन  राजा भीमक, राणी शुद्धमती आणि कौंडिण्यपूर वासी प्रस्थान करतात.  गजाच्या पाठीवर सजलेल्या नक्षीदार सोन्याच्या अंबारीत कृष्णरुक्मिणी बसले. माता देवकी व पिता वसुदेव, ज्येष्ठ बंधू श्रीबलराम व रेवतीदेवी आणि लाडकी भगिनी सुभद्रा हे देखील हत्तीवर बसले आहेत. आजूबाजूला यादवांच्या रथाचे कडे आहे आणि बाकीचे समस्त यादववीर नरनारी सजून नटून शृंगारून ढोल ताशाच्या गजरात, तालात नृत्य करत हास्यविनोद करत आपल्या लाडक्या कृष्णाला तितकीच लाडकी आणि सुंदर, सुशील, गुणसंपन्न अर्धांगी अर्थात राणी रुक्मिणीदेवी यांना बघत...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ९१ (पाठवणी अर्थात विदायी)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ९१ (पाठवणी अर्थात  विदायी) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    राजा हात जोडून कृष्णासमोर उभे राहून बोलणार वा बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत, परंतु त्याआधीच त्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा प्रत्येक थेंब राजाराणीच्या भावना अत्यंत जड अंतःकरणाने श्रीकृष्णापुढे मांडत आहेत. प्रत्येक थेंबात खालील भाव व्यक्त होत आहे. वाचकजन परियेसा.(कारण लिहिणारा मी देखील एकाच मुलीचा बाप आहे आणि पुढील वर्षभरात माझ्याही कन्येचा विवाह करण्याचे प्रयोजन आहे. त्यामुळे राजा  भीमकाची मनःस्थिती मी नक्कीच जाणू आणि व्यक्त करू शकतो) दिली कन्या दिले सर्व आता काळीज जपावे माझे सर्वस्व मी दिले त्याला प्रेमे सांभाळावे कष्ट काड कधी नाही चार पुत्रांहून प्रिय ही काही न्यून राहिल्यास तिला प्रेमाने सांगावे माझे सर्वस्व मी दिले त्याला प्रेमे सांभाळावे अंगणात खेळली ती  बालपण जपले मी आईविण आता जायी माता देवकी जपावे माझे सर्वस्व मी दिले त्याला प्रेमे सांभाळावे माया ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ९० (विवाह सोहळा १८) ( विवाह सोहळा समाप्ती)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ९० (विवाहसोहळा १८) (विवाह सोहळा समाप्ती)  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    आठ दिवसांचा  विवाह सोहळा संपन्नतेकडे चालला आहे. सर्व कार्य , विधी, व्यवहार, कार्यक्रम अतिशय सुंदरपणे आणि सुव्यवस्थितपणे पार पडले. कमी वेळात श्रीपती आणि रुक्मिणीच्या विवाहाचं उत्तम आयोजन व नियोजन राजा भीमकाने करून सर्व यादवांसह वसुदेव देवकी आणि कुटुंबियांना आश्चर्यचकित करून सोडलं होतं. सोहळा उत्तमच झाला यात शंका नाही. राजा भीमक आपली पत्नी राणी शुद्धमती हिला म्हणाला "कार्यव्यस्ततेत असताना काही गोष्टी करतो आपण , त्याप्रमाणे आपण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आता त्यांना विडा दक्षिणा व निरोप देण्याची वेळ समीप आली आहे. त्यामुळे आपण आता भेटीच्या वस्तू घेऊन त्यांना पाठवणीच्या निरोपांचे विडे द्यायला जाऊया."  अर्थात हे बोलताना राजाचा आवाज कंप पावत होता. कारण हा साधा निरोप नव्हता प्रत्यक्ष मुलीला सासरी जाण्यासाठी पाठवणीचा निरोप द्यायचा आहे. हे...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८९ (विवाह सोहळा १७)(प्रसंग सतरावा समाप्त)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८९ (विवाहसोहळा १७) (प्रसंग सतरावा समाप्त)  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    आता आजचा दिवस हा  नृत्याचा दिवस होता. सर्वजण आवरून सावरून सभामंडपी जमले. दोन्हीकडची मंडळी जमली. एकमेकांना आग्रह करून बोलावून नाचवू लागले. एखाद्याचं नृत्य आवडलं तर पुनः पुनः आग्रह करून मंडळी नाच करण्यास भाग पाडत होती. ताल धरून, फेर धरून, रिंगण करून, फुगड्या घालून नाच होऊ लागले. यादवांकडे तर नृत्यामध्ये पुरुषमंडळी स्त्रियांपेक्षा बहारदार नृत्य करण्यात तरबेज होते. कारण वृंदावनी तासनतास कृष्ण राधा आणि गोप गोपी यांना नृत्य करण्याची आवड आणि सवड होती. त्यामुळे यादवांची पुरुष मंडळी सुद्धा जोड्या जोड्या करून मृदंग ढोल यांच्या तालावर ठेक्यावर सुंदर नृत्य करत होती. यादवांची मंडळी बराच वेळ  नृत्य करून झाल्यावर कौंडिण्य पूरवासीयांना चिडवून दाखवत होती, अर्थात नाचासाठी आव्हान देत होती. हे आव्हान अर्थातच कौंडिण्यपूरवासीय स्वीकारणार नाहीत तरच नवल. अर्...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८८ (विवाह सोहळा १६)(प्रसंग सोळावा समाप्त)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८८ (विवाहसोहळा १६) (प्रसंग सोळावा समाप्त) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    रुक्मिणीला मूर्च्छितअवस्था येण्याप्रत समाधी लागली, हरिचरणी. देह त्याज्य केल्यानंतरची दृढ अवस्था अथवा ध्यानानंतरची समाधीअवस्था तिला सदेही प्राप्त झाली. कृष्ण चैतन्यरूपाने तिच्या समाधीअवस्थेत तिच्या समोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला "हे जे संपूर्ण ब्रह्मांड दिसत आहे ,ते व्यापून मीच आहे. प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तूत मीच आहे. तरीही मी याहून भिन्न वा तटस्थ आहे. सर्व चराचर व्यवहार स्वयंचलित आहेत तरीही त्यावर ध्यान माझंच आहे. या विश्वातील व्याप्त चैतन्य मीच आहे. मीच सर्वांचा कर्ता धर्ता आणि हर्ता आहे. जन्म मृत्यू निर्माण आणि विनाश मीच आहे.  मीच सर्व देही व्याप्त आहे. माझ्याशिवाय या जगात काही नाही.  सर्व कर्मांचे भोग मला प्राप्त होतात., त्यातील जे मजसाठी असतात ते मी सेवतो. बाकीचे भोग हे त्या त्या पंचमहाभूतरूप देहाला परत प्राप्त होतात. जे भोग देह न...