Skip to main content

Posts

Showing posts from August, 2015

कान्हा तव मुरली

 ।।कान्हा तव मुरली ।। मी तर व्याकूळ तूज भेटीला तू नच सोडी कारे तिजला तू तर कायम तिजला हरखून धरिसी अधरी जैसी प्रियतम ।। मी नच बोलिन तूज संगे रे जर ती आहे प्यारी तूजला माझे मी पण गेले विसरून तूज भेटीमी आहे आतूर ।। तरी नच येसी माझ्या भेटी कारण संगे आहे वैरीण कृष्ण सखा करी मन्दस्मित अंन वदले ऐसे त्या राधेला ।। तू तर प्रियतम माझी असशी कैसे मी गुज सांगू तुजला आतूर नच मी तूज भेटीला का हे भासे कायम तूजला ।। मी तर आतूर जैसा भ्रमरची करितो गुंजन पाहून कमला राधा बोले तरीही कान्हा का नच पटते तव बोलाला ।। का मज भासे तू तर वदसी सदा सदा जे रुचते मजला कान्हा पकडून बोले राधे ये मी पटवून देइ तुजला ।।   दावे मग तो रूप साजिरे  देखे राधा त्या हृदयातच पाहुनी आपूले रूप देखणे राधा लाजून हो वनमाला ।।  कवी : प्रसन्न आठवले 

जीवन सुगंध -५

जीवन सुगंध -५ माया ही विश्वाची चालक असल्याचा आभास निर्माण करते पण प्रत्यक्ष परिस्थिति भिन्न असली पाहिजे कारण जो चालक असतो तो जनक नियंता आणि अन्तःकर्तासुद्धा असतो म्हणजेच निर्माता नियंता आणि उद्धारकर्ता देखील असतो . आता या निकषात माया बसते का ते पाहू. अस समजा की एक पाण्याच्या ओहोळामध्ये एक कीड़ा पडलाय. यात माया काय करेल ती त्या किड्याला झुलवेल  आणि नंतर त्याचा अंत काळ आला की सोडून जाईल दुसऱ्या लक्षा कड़े. आता याच जागी भगवंत काय करतील त्याला बचावाचे काही मार्ग उपस्थित करतील. पण तेहि त्याचे काही आयुष्य शिल्लक असेल. पण जर अंत समय निकट असेल तर त्याच्या पुण्याई नुसार काही अशी व्यवस्था करतील की ज्यामुळे त्याचा अन्तःकाळ सुकर होईल. आणि तो प्राणी मोक्षाला अथवा त्याच्या पूर्व कर्मा नुसार पुढील जन्मी सहज जाईल. पण हे सर्व तेंव्हाच शक्यआहे जेंव्हा त्या प्राण्याचा स्वतःचा कर्माचा साठा पुण्यरूपात शिल्लक असेल. असही कर्म प्राणी तेंव्हाच करेल जेंव्हा तो मायेच्या बंधनात न अडकता कर्म करेल. आता माया कशी काम करते ते पाहू. तुम्ही सरळ मार्गी गृहस्थ आहात अश्या वेळेला तुम्हाला विचलित कर...

श्रावण

श्रावण  हिरवाळीच्या गालीच्यातून तृणपुष्पांची शाल पांघरुन जलबिंदूची चादर ओढून श्रावण आला बरसत बरसत ।। आकाशाच्या चारी दिशानी निसर्ग आपूल्या अष्ट भुजानी सोडून दिधल्या अनंत धारा श्रावण आला बरसत बरसत ।। नभो मंडळी दाटी झाली मेघांची ती गर्दी जमली वसुंधरा ही तृप्त जाहली श्रावण आला बरसत बरसत ।। ऋतुपर्व हे सुरु जाहले लगबग लगबग सारे करती दशोदिशाना हर्ष भरुनी श्रावण आला बरसत बरसत ।। आता सारे फुलले मोदे रंगांचीही झाली उधळण निसर्गातही अवघी धुंदी श्रावण आला बरसत बरसत ।। कवी : प्रसन्न आठवले 

कवडसा - 23

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव ,    तसा  घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …२२ शीतल : तुला मला या प्रकारे भेटावस का वाटल ( हसून ) का असा stunt करण्याची सवय आहे तुला.  योगेन्द्र : (शांत पणे हसत ) मला असे सुखद वाटणारे धक्के i mean pleasant surprises द्यायला आवडत. in fact its my way of presenting things .  शीतल : वा म्हणजे स्वतःच्या मर्जीने घडवलास की काय accident,  मला भेटण्यासाठी ( हसते) योगेन्द्र : मी देवाला इतकंच सांगितल की मला शीतल समर यांना भेटायचय तेहि hospital मधे . Thats all i did . पुढच त्याने arrange केल .  शीतल : देवा वर विश्वास दिसतोय तुझा.   देव भोळा वगैरे नाहीस ना.  योगेन्द्र : नाही देवभोळा निश्चित नाही या जगात कर्म श्रेष्ठ मानतो मी. देव आणि दैव हे कर्माच्याच गती वर अवलंबून असत ही माझी धारणा आहे. sorry पहिल्याच दिवशी lecture थोड़ जास्त झाल.  शीतल : अरे नाही पण खुप छान बोलतोस तू . अस जाणवतय की,  त...

जीवन सुगंध - ४

जीवन सुगंध - ४ आता या मायेचा विचार करुया. ही माया एका अर्थी भगवंत निर्मित म्हणजे विश्वाचा आधार, पण दुसऱ्या अर्थी वाटेच दूसर टोक, म्हणजे निश्चितच विचार करायला लावणारी गोष्ट किंवा बाब. पण ती संपूर्ण विश्वाला सुद्धा वाटेच्या दुसऱ्या टोकाला म्हणजेच भगवंताच्या विरुद्ध बाजूला अर्थातच इश्वरापासून लांब घेऊन जाते. इतकी प्रचंड ताकद तिच्यापाशी  कशी. त्यासाठी तिच्या निर्मितीचा विचार करू . मुळातच हे विश्व भगवंताला  झालेल्या मोहातून निर्माण झाल. त्यामुळे हाच मोह माया रुपात पूर्ण विश्वात संचारला. हीच ती माया. आता तर्काने एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जेंव्हा हां मोहच जर निर्मितीच कारण आहे तर हे विश्व सुरळीत चालू राहाव यासाठी ही गरजेचीच आहे हे पटत.  पण त्यात ही मेख पण आहे की जर तुम्हाला या विश्वाच्या पसाऱ्यातच अडकायच असेल तर कोणाची ना नाही.  मग या मायेचा तुम्ही विचार केला नाहीत तरी चालेल.  कारण प्रत्येक जण प्रत्येक क्षणी त्या मायेच्या आधीन आहे आणि जातोच आहे. ही माया म्हणजेच जिला भगवंताची सावली असही म्हटल जात.  तर तर्काने हेही  जाणू शकता की सावली म्हणजे...

जीवन सुगंध - ३

जीवन सुगंध - ३ सरळ घडणारी कोणतीही गोष्ट नेमकी आपल्याच बाबतीत वाकडी का घडते हा प्रश्न पडलाय ना. आणि इतरांच्या बाबतीत सरळ कस  घडत हे कोड पण पड़ल असेल तर त्याच उत्तर ऐक . त्याच खर तर खूप सोप्प उत्तर आहे की ते आधीच मायेच्या अधीन असतात प्रश्न असतो तो तुमच्या आधीन होण्याचा. त्यासाठी तुमचा बुद्धिभेद करण्याचा हां प्रयत्न असतो. ते ज्याना आपण याबाबतीत आदर्श मानतो त्यांची निर्मितीच यासाठी झालेली असते . त्याना आपसूक मिळणाऱ्या गोष्टी आणि आपल्याला न मिळालेल्या किंवा मिळून सुद्धा आपण आपल्या चूकीशिवाय गमावलेल्या गोष्टी या सर्वाची निर्मितीच मुळात आपल्याला मूळ स्वरूपाला म्हणजेच मगाशी सांगितलेल्या वाटेच्या दुसऱ्या टोकाकडे तुम्हाला जाऊ न देण्याचा मायेचा खटाटोप. बर यात तीच यशस्वी होण न होण हे तस बघितल तर आहे  आपल्याच हातात.  कारण विधात्याने सर्व घडवलय वा ठरवलय ते कर्माधिष्टित. म्हणजे एका अर्थाने तुझ्याच हातात. पण……  हा पणच खुप महत्वचा ठरतो आयुष्य घडवायला . पुन्हा घडल की बिघडल याची परिमाण जी जगाची वेगळी आणि  नियंत्याची वेगळी. यात चूक कोण बरोबर कोण हे सुद्धा प्रत्येक जण आपल्...

जीवन सुगंध - २

जीवन सुगंध - २ आणि हां प्रवास तरी कसा, किती, कुठे, कोणाबरोबर, किती, वाटेत कोण भेटणार, ते  किती काळ बरोबर हे पण माहित नाही. बर एक प्रकारे माहित नाही हे छान आहे.  कारण त्यामुळे जगण्याला एक अर्थ आहे आणि पुढे जगण्याची जिद्द कायम आहे.  पण त्याची दूसरी बाजू ही की जेंव्हा निराशा दुःख अपमान या गोष्टी समोर येतात, तेंव्हा अस वाटत की हे आधीच कळल असत तर कष्टतरी वाचले असते.  पण मग या सगळ्यात जगण्याचा निश्चीत अर्थ काय,  मार्ग कोणता,  वाटचाल कशी करावी,  या सर्व बाजूंचा थोड़ा स्वार्थी होऊन विचार करावा हे एक उत्तर सापड़तय. स्वार्थ कसा सांगतो.  त्या आधी या विश्वाच एक कोड खरच कोड आहे की एक सहज अनूभवाव अस काही आहे हे आपण पाहुया.  ही एक लेखमाला असेल अस म्हटल तर वावग ठरू नये.  या विश्वाच्या निर्मितीच एक कारण जे सांगितल जाते आणि पुराणात सुद्धा लिहिलेल वाचायला मिळत ते हे की, जगननियंत्याला एक सहज पडलेल स्वप्न आहे त्यामुळेच ते भास् आणि सत्य यामधला एक जोड रस्ता आहे. त्याच एक टोक म्हणजे माया आणि दूसर टोक म्हणजे स्वतः नियंता. आता कोण कूठून निघा...

जीवन सुगंध - १

जीवन सुगंध - १  माणूस एक प्रवास आहे अनंतापासून अनंतापर्यंत. कुठून आला कुठे चाललाय हे कधीच न समाजणार कोड अखंड उरात बाळगून या प्रवासातला एक प्रवासी . हां प्रवास असाच किती काळ चालेल ते नियंत्यालाच माहित.  बर तो कुणाला कळलाय तर तेही एक कोडच. या कोडयाच उत्तर सापडत त्याना जे हे सांगण्यासाठी येऊ शकत नाहीत. त्यामुळे जे माहीत नाही ते कल्पनेनेच जाणलय त्यांनी,  ज्यानी हे पाहिलय हां त्यांचा विश्वास की खात्री की श्रद्धा की भ्रम हे ते स्वतः जाणतात की नाही हे कोणालाच माहीत नाही . बर आपल्या कुणाला हे बोलण्याचा अधिकार आहे की नाही ते पण कोणालाच माहित नाही मी  हे बोलतोय हे सुद्धा अधिकार नसतानाच.  पण मग नक्की काय खर ते कोणी तरी कधी तरी सांगाव आणि कधीतरी आपल्याला कळाव अस वाटणारे किती हे पण ठाऊक नाही.   बर श्रद्धा खरी की तोही एक भ्रमच भुताच्या गोष्टीसारखा माहीत नाही कारण जर ती कल्पना तर देव ही कल्पना का नसेल. सर्व तर्कशास्त्राचा खेळ की अजून काही हे पण त्या नियंत्यालाच माहीत अर्थात जर तो कुठे असेल तर. कारण त्याच्या म्हणण्या प्रमाणे त्याला कोणी पहाव ओळखाव हे...

कवडसा - 22

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …२२…… समोर योगेंद्रला इतक्या वर्षानी  बघून शीतलला विश्वासच बसत नव्हता आणि योगेन्द्र काल परत भेटून आज भेटतो आहोत अश्या शांतपणे शीतल कडे बघत होता. असा किती वेळ गेला असता कोण जाणे पण भानावर येत योगेंद्र हात उंचावून म्हणाला हाय शीतल करेक्ट  शीतल : ( एकदम सावरत ) हाय योगेन्द्र पण तुझी भेटायला यायची पद्धत आणि जागा आवडली मला.  मानल तूला.  कॉलेज मधे होतास त्यापेक्षा खूप वेगळा आहेस तू , खुपच बदलला आहेस.  तेंव्हाचा योगेन्द्र खूप लाजरा बूजरा मुलींशी कमी बोलणारा असा होता पण तू तर ..  योगेन्द्र : (तीच वाक्य अर्धवट ठेवत ) खूप बदललो ना. वक़्त और हालात इंसानको सब कुछ सीखा देते है ( असा म्हणून तो स्वतःच जोरात हसतो) त्यावेळचा मी आणि आताचा मी यात  २० एक वर्ष गेलीत मॅडम. असो तू कशी आहेस. ( आता तिच्या डोळ्यात थेट नजर टाकत योगेन्द्र विचारतो ) शीतल : (आपले डोळे मिचकावत ) एकदम मजेत तूला कशी...

कवडसा - 21

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …२१…… नर्स लगबगीने रूम मधून गेली आणि शीतलच्या डोक्यातून टेंशन काही जाईना. तिला अस बघुन आशाताई रागावल्या आणि शीतलला म्हणाल्या    तुला टेंशन घ्यायला काय झालय.  तो योगेन्द्र तुझ्या माहितीतला असल्या सारख का करतेस.  अग काय बोलत्ये मी  शीतल : (अचानक तंद्री भंग झाल्या सारखा) अग तस नाही पण कोणी नाहिये त्याच,  म्हणून काळजी वाटते एवढंच  आशाताई : ते ठीक आहे.  पण तुझ टेंशन वेगळच दिसतय.  असो मी ज़रा जाऊन येते,  तू ज़रा पड तुला आरामाची गरज आहे  आशाताई जातात.  शीतल बळे बळेच डोळे मिटण्याचा प्रयत्न करते पण योगेंद्रच्या विचाराने झोप काही येत नसते. तेवढ्यात डॉ साठे स्वतः येतात बरोबर नर्स असतेच आणि शीतलला म्हणतात चला भेटायला  शीतल : म्हणजे डॉ ते इमरजंसी सगळ   डॉ : आशाताई निर्धास्तपणे जाव्यात म्हणून (आणि जोरात हसतात) शीतलला लगेच नर्स आणि वार्डबॉय  मिळून ot म...

धुंद मधुमती - पुनर्लिखित

धुंद मधुमती पुनर्लिखित                    धुंद मधुमती हे गाण  पुनर्लिखित केल आहे.             ध्रुव पद तेच ठेवून मधील कडवी पुन्हा लिहिली आहेत  धुंद मधुमती रातरे रात रे तन मन नाचे यौवन नाचे उगवला रजनीचा नाथ रे नाथ रे रातराणी ही बाहेरून आली आरक्ताचे गंध सांडती गंध सांडती कर धर हाती पुढे येउनी पुढे येउनी  कर मजवर बरसात रे रात रे  धुंद मधुमती ...  प्रेमविरहीणी गातसे कुणी अधीरतेचे भाव ये मनी भाव ये मनी  आज सदनी या थांब रे सख्या थांब रे सख्या प्रेम तुझे मज आज दे आज दे  धुंद मधुमती .... कवी : प्रसन्न आठवले 

तोच चन्द्रमा नभात - नव्या शब्दात

तोच चन्द्रमा नभात  नव्या शब्दात  तोच चंद्रमा नभात या गाण्याच धृवपद तसच ठेवून बाकी तीनही कडवी परत लिहिली आहेत. एक नवीन प्रयोग. तोच चन्द्रमा नभात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तुही कामिनी।।ध्रु॥    जुई पुष्पे पड़ती जेथ येई गंध त्या वनी गंधातून त्याच होय अधीर देह उन्मनी परी त्या गंधापरिस तव स्वप्ने जीवनी एकांती मज समीप तीच तुही कामिनी।।१।। प्रतीमेतून त्या तुझ्याच सुंदरता कांचनी नजरेतील तीर तेच तेच तेज लोचनी  पाहुनिया लोचनास भान हरपते  मनी एकांती मज समीप तीच चहरे कामिनी।।२।। जरी बरवे रूप तेहि तेच भाव होउनि करती घायाळ मजसी नेत्र तेज पाहुनी रूपातुन  त्या तुझ्याच जाणवे परी कुणी एकांती मज समीप तीच तुही कामिनी।।३।।   कवी : प्रसन्न आठवले

ग सजणे

ग सजणे  तुझ्या घराच्या समोर येऊन पाऊल अड़ते कसे  ग सजणे प्रेम हे जड़ते कसेे तुला पाहुनी दिवस उगवतो रात्र तुझ्या आठवे  ग सजणे प्रेम हे जड़ते कसे तुझीया डोळ्यामधे मनाला चांदरात पाहुदे  ग सजणे प्रेम हे जड़ते कसे तुला बसवूनी समोर,  स्वप्ने संसारी रंगवूदे  ग सजणे प्रेम हे जड़ते कसे मजवर माझा कसला ताबा लगाम तू हाती घे  ग सजणे प्रेम हे जड़ाते कसे हात तुझा हां घेऊन हाती फिरुया बागेमधे  ग सजणे प्रेम हे जड़ते कसे मधाळ तुझिया बोलाला मी ऐकिन ग   कौतुके  ग सजणे प्रेम हे जड़ते कसे मज भेटून तुज हेच वाटते एकवार ऐकूदे  ग सजणे प्रेम हे जड़ते कसे आता तरी तू माझी होशील वचनीतूज बांधूदे  ग सजणे प्रेम हे जड़ते कसे तुझी पाऊले घरात येऊन स्वप्न क्षुधा शान्ती दे  ग सजणे प्रेम हे जड़ते कसे कवी : प्रसन्न आठवले

तू धुंदी

तू धुंदी डोळ्यातील शब्दांमधुनी नजरेच्या भाषेमधुनी तू तीर सोडते जे जे लागती थेट ते येथे।। ते पाऊल पड़ते जेथे एक मधाळ धुंदी तेथे पायातील पैंजण रुमझुम मनी उठती नादस्वरे ते ।। तू फिरसी ज्या ज्या वाटा पाकळ्या सुगन्धित करसी पापण्या उघडसी मीटसी जणू दिवस रात्र तू करसी।। येउनी समीप तू बसता अप्सराच् मी  जणू पाही   पापण्या जरा घे मिटूनी   दिसूदे मज थोड़े काही ।। हातात घालूनी हात गाऊया धूंद  स्वरात प्रीतीचे गीत मनातील हृदयातून एक सूरात ।। हृदयातून ....... कवी : प्रसन्न आठवले

तुझी आस

तुझी आस तू आस की नुसता भास  तूझ्यातच श्वास गुंतला माझा ।। हां हात तू देशी साथ  की हलते पात  झुळुक वाऱ्याची ।। मी होते धुंद स्मित ते मंद  मनीचा फंद कैफ तो ये बेहोशी ।। तो घाट सावरी वाट  होई तू   काठ, नदी मी येते  रे तुजपाशी ।। तू लाट किनारी पाट   धूके ते फाट होउनि येसी रे मजपाशी ।। तू माझा देह तुझ्यातच काय  मी मजला हाय हरवूनी  गेले ।। तू रे आकाश क्षितीजी कास  मीलनी खास तू ये धरतीशी ।। मी विणले कोश तूझ्यातच पाश  मला विश्वास तूझ्या प्रीतीचा ।। कवी : प्रसन्न आठवले 

ओढ अनावर

ओढ अनावर ती   ओढ़ अनावर झाली शब्दांची प्रतिमा केलि आतूर मी  तुज भेटाया का उगाच भीति जडली।।    या ऊरात तूज का धरले त्या प्रितीस्तव मी उरले तू उगाच देसी आशा की मम प्रितीची  परीक्षा ।। ती  ओढ …. त्या सागर लाटा गहिऱ्या  क्षितिजात बुडाल्या साऱ्या त्या दिशा तमी  भिजलेल्या मनी नव्या खुणा थिजलेल्या ।। ती  ओढ …….  त्या दवात पाय भिजावे अन मनात स्वर उमटावे तू उल्हासोनि पहावे मी माझ्यातच न ऊरावे ।। ती  ओढ …।   मी तुझ्या मनात असावे माझे मीपण   संपून जावे तू रोज पापण्या उघडोनी हलकेच मला उठवावे ।।  ती  ओढ …….   तू अवीट मधाची धुंदी पाउलखुणा स्वच्छंदी मी भानावर नच यावे मी तूझ्यात संपून जावे ।।   ही ओढ …  कवी: प्रसन्न आठवले

कोंडमारा (लघू कथा )

कोंडमारा (लघू कथा ) लहानपणा पासून दोघ एकमेकांना ओळखत होते,  शेजारिच राहात असल्यामुळे. पुढे शाळा झाली.  एसएससी झाले दोघ.  तोपर्यंत सर्व व्यवस्थित होत.  कॉलेज मधे गेल्या नंतर काय बिनसल कोणालाच कळल नाही.  पण ती दोघ एकमेकांशी बोलायची बंद झाली.   पुढे कॉलेज संपल.  दोघे कामधंद्याला लागले.  वर वर सर्व व्यवस्थित वाटत होत.  दोघेही आपल्या व्यापात होते.  छान चालल होत तस,  पण जेंव्हा जेंव्हा ती दोघ् समोर येत असत एक प्रकारचा संकोच दोघांच्याही चेहऱ्यावर जाणवत होता.  काय घडल होत कोणालाही माहीत नव्हतं नाही म्हणायला दोघांचाहि एक मित्र   होता,  त्याने खुप प्रयत्न करून पाहिले होते.  पण एक गोष्ट जी फक्त त्यालाच माहित होती ती कालौघात त्याला सांगावी लागली होती की, त्याने तीला काहीतरी विचारले होते आणि ती जे काही म्हणाली होती त्याला अनुसरुनच त्यांच्या वर्तनात फरक पडला होता.   होता होता वर्ष गेली.  दोघांचही लग्नाच वय झाल ,   ते हि सरुनं गेल.   दोघेही तसेच राहत...

कॉलेज प्रेम (कादंबरी)

कॉलेज प्रेम  (कादंबरी) प्रसाद कॉलेज मधून निघताना तनू ला म्हणतो की, उदया 10 30 नंतर सकाळी मी तुझ्या घरी येतो, आपण बाइक वरुन लॉन्ग राइडला जाऊया. तुला पण आवड़तच ना. तनू : मी येणार नाही.  मला आवडत हे तुला कोणी सांगितल. प्रस् : जस काही माहितच नाही कोणाला.  तूच म्हणालीस, एकदा,  तुझ्या मैत्रिणीना की  बाइक वर बसण्यासाठी तू काहीही करशील,  बरोबर  तनू : तरी पण  मी नाही येणार प्रस् : अग का पण उद्या घरचे कोणी नाहीत ना, मग माझ काही चुकले का ते  तरी सांग तनू : चूका कर स्वतःच आणि नंतर विचार मलाच ,  मी चालले ( तनू लगेच जायला निघते आणि प्रस् तिच्या मागे जातच असतो तेवढ्यात कॉलेज मधील शालिनी प्रस् ला आडवते)  शा : कसा आहेस प्रस्,  या टी शर्ट मधे खूप मस्तच दिसतोस.  तसा तू आहेसच् छान पण अजून हैंडसम दिसतोस प्रस् : अग मी ज़रा घाईत आहे, तेंव्हा  नंतर बोलुया बाय शालिनीला प्रसशी बोलताना पाहून तनू  आणखीनच  चिड़ते आणि रागाने निघून जाते प्रस् दुसऱ्या दिवशी 10 30 नंतर तनू च्या घराच्  दार वाजवतो तनू दार उघडत...