Skip to main content

कैकयी, श्रीराम आणि वनवसाचा फास ! एक चिंतन -२

कैकयी, श्रीराम आणि वनवसाचा फास ! एक चिंतन -२

प्रत्यक्ष श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त काढण्यापर्यंत आणि त्याच्या तयारीपर्यंत गोष्टी आल्या, पण जर हे घडून आलं तर ज्या कार्यार्थ श्रीराम आले, ते कसं घडणारं, हे नियतीच्या लक्षात आलं.एक लक्षात घ्या ही नियती, प्रारब्ध किंवा संचित, हे कधीही अज्ञातात किंवा अदृश्य राहून कार्य करत नाही आणि करू शकत नाही.

तर असे नशिबाचे फासे फिरणं किंवा विधीला जे घडावयच आहे, ते घडवायला कोणीतरी देहात असलेली व्यक्तीचं वापरली जाते किंवा वापरावी लागते. अगदी मायासुद्धा एखाद्या देहाच्या वापरातूनच आपले कार्य साध्य करते. किंबहुना अदृश्यात किंवा निर्गुण स्थितीत काहीही होत नाही किंवा होऊ शकत नाही. म्हणजेच श्रीराम, रावणाला मारण्यासाठी घेतलेल्या जन्मात, तीच गोष्ट कशी शक्य आहे, याची जाणीव नियातीला राज्या भिषेकाच्या तयारीच्या वेळीच लक्षात आलं असेल का आणि अशी ही नियती कुणाच्या तरी बुद्धीने, मनाने, देहानेच कार्य करते किंवा करू शकते. 

हे जर गृहीत धरलं तर, मी आधी म्हटल्याप्रमाणे अशी व्यक्ती फक्त आणि फक्त कैकयीच असू शकते. एकदा हे मान्य झाल्या नंतर,त्या व्यक्तीला ते कार्य घडवून आणण्या साठीची बुद्धी होणं, ही औपचारिकता असू शकत नाही. कारण ती व्यक्ती कोणी साधीसुधी वा कमी बुद्धीची नसून, राज्यकारभार करू शकण्या इतपत बुद्धी असलेली व्यक्ती होती. अर्थातच ती व्यक्ती कैकयी आहे. म्हणजे जे कैकयीने केलं, ते बुद्धीचा भेद किंवा फिरलेली बुद्धी नसून, पूर्णपणे राजकीय विचाराने, बुद्धीने आणि समजून उमजून व जाणतेपणी घडवून आणलेली कृती होती, असं माझं स्पष्ट मत आहे.

कदाचित आपल्या संपूर्ण चारित्र्यावर, प्रतिमेवर पाणी फिरवून, ज्यासाठी हे घडणं गरजेचं आहे आणि ज्यात अखिल जगताचं हित आहे, त्यासाठी युगानुयुगाचा वाईटपणा घेणं, हे तितकं सोपं सहजी काम नाही. त्याला लागणार धैर्य, जाणं, बुद्धीची झेप, समज, उमज आणि प्रगल्भता ही फक्त आणि फक्त कैकयी व श्रीराम यांच्या कडे होती. रामायणातील बाकीची बरीचशी पात्र भावनिक, श्रद्धाळू, बुद्धीपेक्षा भावनेच्या आधारावर जगणारी होती. पण रामायणातील सर्व व्यक्तिरेखांचां अभ्यास केला तर, माझ्या आकलनानुसार, प्रभू श्रीराम, हनुमंत, कैकयी आणि रावण ही चारच व्यक्तित्व भावनिक न वागता, परिस्थिती नुसार निर्णय घेऊ शकणारी होती. रावण आपल्या मदात उन्मत्त झाला, अन्यथा तो भावनिक नव्हता. 

म्हणूनच रघुकुलात त्यावेळी, दशरथ राजांवरील शापाचा, श्रीरामांच्या जन्म उद्देशांचा विचार नियती नामक एका शक्तीच्या मनात आला आणि या सगळ्यातून काढाव्या लागणाऱ्या मार्गाला तोलू शकणारं कोण असा विचार उद्भवला. त्यावेळी नियतिला ज्ञात होतं की, अशी दोन व्यक्तित्व आहेत, कैकयी आणि श्रीराम. म्हणूनच जाताना चित्रकूट पर्वतावर झालेल्या भरत भेटीत, प्रभूंनी भरताला वारंवार विनवून सांगितल की, मातेची यामधे काहीही चूक नाही. तिने तेच केलं जे नियतीला मान्य होतं. चौदा वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा परत आल्यावर सुद्धा, श्रीरामांनी सर्वात प्रथम माता कैकयीची भेट घेण्याची इच्छा व्यक्त करून, मातेला चौदा वर्षांच्या विजन वासातून बाहेर काढलं. 

माझ्या चिंतनात आलेल्या काही गोष्टी स्पष्ट आणि काही तार्किक बुद्ध्यात्म पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या आगामी राम अनुज भरत, या नवीन लेखमालेत यावर विस्ताराने, त्याच प्रमाणे तर्क व भावभावना याना योग्य न्याय देऊन लिहिण्याचा प्रयत्न करीन. 

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
०७/०५/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...