Skip to main content

अध्यात्म विराम १७२

अध्यात्म विराम १७२

ईश्वरी कृपा इतकी असीम आणि अनंत आहे की, माणसाने क्षणमात्र केलेल्या स्मरणाच्या मोबदल्यात ईश्वर अनंत काळाचं पुण्य प्रदान करतो. पण त्याचं स्वरूप कसं असतं, याचा जरा खोलात जाऊन विचार करूया म्हणजे माऊलींच्या त्या ओवीचा खरा अर्थ ध्यानात येईल. ईश्वर, एक क्षण मनापासून, आत्म्याच्या अंतरंगातून केलेल्या स्मरणाने सुद्धा, जागृत होतो. अर्थात, एखाद्या माणसाने मनापासून घातलेली साद, ईश्वराच्या हृदयात पोचते. याचाच प्रत्यय, द्रौपदी शील रक्षण प्रसंगानंतर श्रीकृष्णाने द्रौपदीला आणून दिला. 

या प्रसंगानंतर द्रौपदीने श्रीहरीला प्रश्न केला की अगदी अखेरच्या क्षणी तू धाऊन का आलास, आधीच का नाही येऊ शकलास.यावर एक मंद स्मित करत श्रीकृष्ण म्हणाला की, कृष्णे, माझी तीव्र इच्छा, सुरवातीला येण्याची होती. परंतु, पांडवांनी माझी आठवण सुद्धा काढली नाही. दुर्योधन सुरवातीलाच म्हणाला की माझ्या वतीने फासे शकुनी मामा फेकेल. भ्राता युधिष्ठिर का नाही त्याचवेळी म्हणाले की, मग आमच्या वतीने श्रीकृष्ण फासे फेकेलं. त्याचा अहं असं करण्याच्या आड आला. कारण जर मी फासे फेकले असते तर कृष्णे, चुकीचं दान पडलच नसतं. 

तुझ्या बाबतीत सुद्धा, तू आधी पाचही पती, नंतर भीष्म पितामह, गुरू द्रोण, महाराज धृतराष्ट्र याना साद घातलीय. यातील कोणीही, तुझ्या सहाय्यार्थ येण्याची शक्यता नाही, हे ध्यानात आल्यावर, तू सुद्धा, सर्वात शेवटी माझी आठवण काढून मला साद घातलीय आणि मी क्षणाचाही विलंब न करता आलो. ज्याक्षणी माणूस मला मनाने, मनापासून हृदयस्थ असलेला मी जाणून घेऊन, स्मरण करतो, अश्या त्या क्षणमात्र स्मरणाने मी साद घालणाऱ्याच्या समीप असतो.

आता या पार्श्वभूमीवर माऊलींच्या म्हणण्याचा अर्थ जाणून घेऊया. एक क्षण स्मरणाने, चारही मुक्ती साध्य होतात, हा माऊलींचा सिद्धांत आहे. एखादा शास्त्रज्ञ जेंव्हा कोणताही सिद्धांत मांडतो, तेंव्हा त्यांचं उत्तर शंभर टक्के अचूक असल्या शिवाय तो शास्त्रज्ञ सिद्धांत रुपात त्याला मांडत नाही. कारण सिद्धांत म्हणजे नियम असतो आणि अश्या सैद्धांतिक नियमाला अपवाद नसतो. त्या समीकरणात, कोष्टकात बसणाऱ्या कोणत्याही गोष्टीला तो नियम पूर्णपणे लागू होतो. माऊलींनी सांगितलेला सिद्धांत हा नक्कीच अलौकिक सिद्धांत असणार. 

कारण माऊली जरी, मानवी रुपात ज्ञानेश्वर अवतार धारी असली, तरीही प्रत्यक्ष विश्वाची माऊली आहे. प्रत्येक माणसाला जो मुक्तीचा, मोक्षाच्या प्राप्तीचा अधिकार आहे, तो अधिकार कशाप्रकारे प्राप्त करायचा, याचा सोप्पा सिद्धांत इथे माऊली सांगतात. पण त्याचा अंतरंग खूप गहन आणि गुह्यात्मक आहे. एका क्षणाच्या स्मरणाने, ईश्वराच्या लहरी क्षणमात्र का होईना जागृत होतात. त्या क्षणमात्र जागृत लहरी, इश्वरी लहरी असल्या कारणाने, त्यांची ऊर्जा व शक्ती तीव्र असणार हे नक्की. 

त्या लहरी, आपल्या लक्षाला प्राप्त करण्यासाठी त्या साधकाकडे येण्याचा मार्ग शोधतात. अर्थातच ईश्वर ज्यावेळी एखादी गोष्ट करतो, त्यावेळी ती कायमस्वरूपी करतो. अश्या या क्षणमात्र स्मरणाने, जागृत झालेल्या लहरी, आपल्या दिव्य प्रभावाने, त्या प्राणिमात्रांच्या मनात, हृदयात शुद्ध व सात्विक कंपंनं निर्माण करतात. अशी कंपनं, तश्याच प्रकारच्या शुद्ध सात्विक लहरींची पुनरावृत्ती निर्माण करतात. म्हणजेच क्षणमात्र केलेल्या स्मरणाच्या बदल्यात, त्या लहरी तशाच प्रकारच्या स्मरण लहरी नित्य आणि नैमित्तिक निर्माण करतात. 

माणसाला अश्या स्मरणाची इच्छा, जाणीव, भूक सतत जागृत होत राहते. त्यामुळे अश्या प्रकारचे स्मरण नित्य करण्याची इच्छा त्या मनात व हृदयात नित्य निर्माण होत राहते. हे म्हणजे एखाद्या घंटेच्या कंपनाच्या लहरींची मालिका निर्माण व्हावी, तश्याच प्रकारच्या लहरी उत्पन्न होऊन, मनाचा ओढा सतत त्याच स्मरणा कडे नित्य धावतो. म्हणजेच एखादी काडी पेटवल्यानंतर, त्या आगीने आपोआप पुढील कार्य करून, ती आग पुढे पुढे धुमसती ठेवावी,  त्याचं प्रकारचं हे सूत्र आहे. 

कारण एका क्षणाच्या स्मरणाने निर्माण झालेल्या लहरी या साध्यासुध्या लहरी नसून, त्या ईश्वरी स्मरणाच्या लहरी आहेत. Intution किंवा telepathy अथवा अंतर्ज्ञान या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचं आपण केलेलं स्मरण, त्या व्यक्तीपर्यंत कोणत्या तरी माध्यमाने पोचत आणि त्या व्यक्तीला येण्याची बुद्धी होते किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपली भेट घडून येते.जर ही गोष्ट साध्या माणसाच्या बाबतीत सत्य आहे, तर इथे प्रत्यक्ष ईश्वरी स्मरणाची गोष्ट माऊली सांगतात. त्याची शक्ती नक्कीच अलौकिक असणार.

हाच विषय उद्या पुढे नेऊया. तोपर्यंत ईश्वराच्या स्मरणाचं कर्म आपण करत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०१/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...