Skip to main content

अध्यात्म विराम १८३

अध्यात्म विराम १८३

ईश्वरी व्यवस्था हा या जगताचा आत्मा आहे.या आत्म्याचा शोध घेतला की, आपण त्या व्यवस्थेच्या माध्यमात आपोआप पुढे पुढे जातो किंवा जाऊ शकतो. प्राण म्हणजे काय आणि त्याचा हिस्सा होण्यासाठी काय करावं, यावर आज, चिंतन करूया. ईश्वराने काही तत्व मूळ स्वरूपात या जगतात स्थापित केली आहेत. ती या जगतात स्थापित राहतील याची पूर्ण काळजी,स्वतः ईश्वर घेतो आणि या व्यवस्थेत बाधा आणणारी तत्व, व्यक्ती ही नष्ट होतील,यासाठी प्रयत्नशील असतो.या मूळव्यवस्थेची तत्व आहेत,ती या ईश्वराने वेळोवेळी जगताला सांगितली आहेत. आता एक एक करून त्यावर चर्चा करूया. 

यातील पाहिलं तत्व जे कधीही नष्ट होऊ शकत नाही, ते म्हणजे सर्व काही कर्माधीन आहे. कर्म हेच श्रेष्ठ आहे. या एका तत्वाच्या अंतरात, अनेक उपतत्वांचा जन्म झाला आहे. मुळात कर्म श्रेष्ठ म्हणजे काय तर हे कराल त्याचंच उत्तर समोर येऊन उभं राहील. म्हणजे जे कर्म पेराल, तेच फलरुपात उगवेल वा जसा कर्माचा चेंडू फेकाल, तसाच तो समोरून फलरुप परत तुमच्या कडे येईल. आता याचा गाभा म्हणजे,काया वाचा बुद्धी मन या कोणत्याही मार्गाने केलेलं कर्म हे त्याचं स्वरूपात पुन्हा आपल्या कडे येतं. तोपर्यंत ते संचितात साठून, आपल्या पक्व होण्याची प्रतीक्षा करत असतं. ही प्रतीक्षा किती कशी करायची याचं निश्चित समीकरण मांडता येणार नाही. 

पण काही आडाखे वा अंदाज नक्कीच देता येतील. सर्वात प्रथम म्हणजे मनातील इच्छेची, वासनेची, मोहाची, लोभाची, क्रोधाची कामाची तीव्रता जितकी अधिक, तितकीच त्या कर्माची फलरुप होण्याचा प्रतीक्षा समय कमी. उदाहरण घेऊ म्हणजे मुद्दा लक्षात येईल. एखाद्या वेळी गाडीत किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी आपण एखाद्याचा राग आला म्हणून त्याला अद्वातद्वा बोललात किंवा अपशब्द वापरलेत,तर कदाचित तिथल्या तिथे आपला हिशोब होऊ शकतो. मी कदाचित यासाठी म्हटलं की, समोर कोणती व्यक्ती आहे आणि त्याची मानसिकता काय आहे, यावर सुद्धा हा परिणाम अवलंबून आहे.

म्हणजे आपला क्रोध अधिक त्याचा क्रोध,यांचा गुणाकार होतो, बेरीज होते, वजाबाकी होते की भागाकार होतो, यावर हा ताबडतोब होणारा कर्म फल हिशोब अवलंबून आहे. याची गुंतागुंत अजून तीव्र असू शकते, जर दोघांचे संचीताचे मागील काही हिशोब बाकी आहेत. म्हणजे क्रोध या एका अवगुणाने आपल्याला किती गोंधळात टाकलं किंवा टाकलं असतं, हे समीकरण रुपात आता मांडणं कठीण काम आहे. पण थोडाफार अंदाज या एका उदाहरणात आपल्याला आला असेल. म्हणजेच असे किती कर्मफल हिशोब आपण मागील आयुष्यात किंवा आजपर्यंच्या मागील सर्व जन्मात करून ठेवलेले शिल्लक आहेत,हे ईश्वर आणि त्याची ही कर्मफल व्यवस्था जाणते. या विरुद्ध सत्व गुण, शांत स्वभाव, प्रगल्भता या द्वारे घडलेल्या कर्मांची फलरूप होण्याचा प्रतीक्षा समय जास्त असणार. 

पण याची कोणतीही जाणं ज्यावेळी आपण ठेवत नाही आणि आपल्या मदाच्या, अहमच्या, क्रोधाच्या, वासनेच्या धुंदीत असे किती हिशोब शिल्लक असतात, त्यावर आपल्या ईश्वरी व्यवस्थे तून ईश्वरी मार्गाकडे जाण्याची, मती, उक्ती आणि कृती अवलंबून आहे. म्हणजेच आज जे देवाच्या नसण्याचा किंवा देवाचं अस्तित्व नाकार ण्याच्या मदातं असतात, याचा अर्थ असा होतो की, त्यांचे अजून कितीतरी कर्म फल हिशोब चुकते व्हायचे शिल्लक असतील हे ईश्वर जाणे. या मद अहं चं सर्वात महत्वाचं आणि एकमेव कारण म्हणजे,या विश्वाच्या करोडो वर्षांच्या कालखंडात आपण जन्म आणि मृत्यू या सत्तर ऐंशी वर्षांच्या आपल्या आयुष्यात हे सहज म्हणून टाकतो की, ईश्वर नाही. 

पण तुझ्या आधी आणि तुझा नंतर जग कोण चालवतं आणि इतके दुष्ट दुर्जन आले आणि गेले, त्यांना त्यांच्या कर्मानेच शासन घडवले, हा सर्व इतिहास ज्ञात असताना, आपण ईश्वर नाही म्हणणं म्हणजे त्याचीच कर्म फल व्यवस्था नाकारण आहे. हे सर्व आपण त्या धुंदीत व अहं च्या प्रभावाने म्हणतो, जेंव्हा आपण त्याचं व्यवस्थेचा एक अंश आहोत. असो, कर्म या पहिल्या मूळ तत्वाचं पुरेसे चिंतन झाल्यावर, आपण या व्यवस्थे तील दुसऱ्या तत्वाकडे उद्याच्या भागात जाऊया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...