Skip to main content

अध्यात्म विराम १८१

अध्यात्म विराम १८१

गुणातीत ईश्वर, केवळ आणि केवळ आपल्या संकल्पने तील विश्वाला, आपल्या स्वरूपाचं ज्ञान व्हावं आणि उत्तम गुण प्रकृतीच्या लोकांना, आधार वाटावा आणि अधम व नीच अव गुण प्रवृत्ती धारण करून वावरणाऱ्या पापी जनांना धाक वाटावा, यासाठी गुणात किंवा सगुणात प्रकट होऊन, आपली लीला दाखवतो. तो एक प्रकारचा खेळ असतो. ज्याप्रमाणे आपण आपल्या लहान मुलांना काही बाबतीत आपल्या प्रेमाचा आधार देतो आणि काही बाबतीत बागुलबुवाचां धाक दाखवतो, त्याचप्रमाणे ही ईश्वरी लीला, या विश्वात असणाऱ्या सर्व जडजीवात अती प्रगत व मन,बुद्धी, अनेक इंद्रिये व अवयव असलेल्या आपल्या मानवी लेकरांना गुणात प्रकटून आपली शक्ती व ऊर्जा यांचा प्रत्यय तो ईश्वर देतो. 

हा प्रत्यय आणि प्रचिती नित्य निरंतर आणि श्वासा श्वासाला आपल्याला प्रत्ययास येते किंवा येऊ शकते.मात्र त्यासाठी दृष्टीची नितांत आवश्यकता असते. ती दृष्टी, ईश्वराच्या व सद्गुरूंच्या कृपेने व प्रेरणेनेच प्राप्त होते. अशी कृपा व प्रेरणा तेंव्हाच प्राप्त होते, जेंव्हा आपण नित्य त्या लहरी व संकेत यांच्या सानिध्यात आणि संपर्कात राहू. अशी स्थिती येण्यासाठी आपण नित्य आपल्या मनात, त्याच ईश्वराचं स्मरण व आठवण जागृत ठेवली पाहिजे. कारण लहरिनी लहरी उत्पन्न होतात, वाढतात आणि शक्तिवान होऊन कार्य करतात. त्या नित्य जागृत असतील तरच आपल्याला त्यांचा लाभ प्राप्त होईल.

उदाहरणार्थ आपण आकाशवाणी किंवा दूरदर्शन वर कार्यक्रम बघताना, कोणत्या वेळी कोणते कार्यक्रम आहेत, हे आपल्याला तेव्हाच ज्ञात होईल, जेंव्हा आपण ते नित्य ऐकू. त्यानंतर त्यातील आपल्यासाठी उत्तम कार्यक्रम कधी असतात, याचं कोष्टक मनात ठेवून, त्या त्या वेळी ते ते कार्यक्रम लावून पाहू शकतो. समजा माहिती अभावी, आपण एखादा कार्यक्रम पहात नाही, त्यावेळी आपले परिचित व हितचिंतक आपल्याला त्याबाबत माहिती देऊन, त्या वेळच्या कार्यक्रमाचे प्रसारित होणारे संकेत व लहरी आपण, त्यावेळी आकाशवाणी वा दूरदर्शन संच जोडून पाहतो किंवा ऐकतो. 

त्याचं प्रमाणे ईश्वराच्या हृदयातून निर्गुणातून सगुणात नित्य प्रसारित होणाऱ्या या ईश्वराच्या कृपा लहरी व संकेत अखंड प्राप्त करणारे व त्याचे नित्य पालन करणारे सद्गुरू, संत महंत, हे आपल्याला नित्य, त्या कृपा लहरीं बाबत व त्या प्राप्त करण्याच्या मार्गाबद्दल सांगतात. त्यांच्या सान्निध्यात राहिल्यास, त्या लहरी व संकेत अविरत, योग्य पद्धतीने प्राप्त होत राहतात. त्या नित्य प्राप्त होत राहण्यासाठी, या देहातील काही तत्व जागृत होणं गरजेचं असतं. कारण त्या जागृत लहरी अर्थात radio active frequency प्राप्त करण्याचे सर्व तंत्र, व्यवस्था या देहात निर्माण करून ठेवली आहे. पण ती व्यवस्था कार्यरत अर्थात activate केली तरच त्या लहरींचा लाभ प्राप्त करता येतो. 

किंबहुना त्या प्राप्तीचे मार्ग अनेकानेक आहेत आणि अनेकांनी ते आपापल्या पद्धतीने विषद केले आहेत. ते अष्टांग सिद्धी, योगायाग, ध्यान धारणा, स्मरण, चिंतन, कीर्तन, पूजन,अर्चन इत्यादी अनेकानेक आहेत. आताच्या भाषेत समजावून सांगायचं म्हणजे अनेक चॅनल्स असलेलं दूरदर्शन किंवा अनेक ॲप असलेला भ्रमणध्वनी किंवा मोबाईल जसा असतो, त्याचप्रमाणे हे अनेकानेक मार्ग, ईश्वराच्या संपर्क लहरी व संदेश प्राप्तीसाठी आपल्याला उपलब्ध आहेत. या अनेक मार्गांच एक वैशि्ट्य म्हणजे काळाच्या कोणत्याही पटलावर किंवा आपल्या देहस्थिती, मन, बुद्धी यानुसार त्यातील योग्य तो मार्ग निवडून आपल्यासाठी त्यानुसार, त्यावर मार्गक्रमण करून, आपला देह, बुद्धी व मन यांना जागृत अर्थात चार्ज करू शकतो.

याचंच अजून चिंतन गरजेचं आहे. ते पुढील भागात करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
११/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...