Skip to main content

मोदींची लडाख भेट आणि त्याचे भारतासाठी सकारात्मक परिणाम !!

मोदींची लडाख भेट आणि त्याचे भारतासाठी सकारात्मक परिणाम !!

कालचं मोदीजींचं लडाखमधलं भाषण ऐकलं. त्यातील एक वाक्य जे मोदीजी सणसणीत बोलले आणि जो गर्भित इशारा होता. ज्यांना तो इशारा दिला होता, त्यांच्यापर्यंत तो पोचला आहेच. पण त्यातून अनेक उडते पक्षी त्यांनी जमिनीवर पाडले. इशारा कशाला म्हणतात आणि तो कसा द्यायचा असतो हे खरंतर मोदींच्या बऱ्याच भाषणात आढळतं आणि शिकायला मिळतं.  पुलवामा नंतर लगेचच दोन दिवसात बिहारमध्ये एका रॅली मध्ये इशारा दिला होता त्यांनी कि, ज्यांनी हे काम केलंय त्यांना हे खूप महागात पडणार आहे. हे मोदीजी बोलले तेंव्हा अनेक जणांनी टिंगल केली, कि इकडे ४४ जवान मारले गेलेत आणि तुम्ही भाषणं कसली करता. पण १४ फेब्रुवारीची दुर्दुवी घटना आणि २६ फेब्रुवारीचा एअर स्ट्राईक आणि या दोन घटनांच्या मध्ये दिलेला इशारा. आपले शब्द खरे करून दाखवणारा माणूस म्हणजे मोदीजी आणि दुसरा पंतप्रधान. पाहिजे अर्थातच शास्त्रीजी. 

कालच्या भाषणात म्हटलेले वाक्य होतं "विस्तारवाद का दौर अब खतम हो चुका  है." या वाक्याला अनेक गर्भित आणि गूढ अर्थ आहेत, अनेक कंगोरे आहेत, अनेक किनारे आहेत, अनेक इशारे आहेत. सर्वात प्रथम हा इशारा चीनला प्रत्यक्ष आहे. कारण ताबडतोब चीनचा प्रतिवाद आलाच " भारत चीनला अकारण विस्तारवादी समजत आहे.". वाक्याचा रोख नरमाईचा आणि दबलेला आहेच. खूप मोठा अर्थ आहे या वाक्याचा. मुळात चीनला कळलं कि हा टोमणा आपल्यालाच होता. याला  चोराच्या मनात चांदणं. यात अजून एक गोष्ट स्पष्ट होते कि, चीन मोदींच्या प्रत्येक कृतीकडे बारीक लक्ष ठेवून आहे आणि प्रत्येक बोलण्याचा अर्थ काढून त्यावर प्रतिक्रिया देत आहे. 

जो देश काँग्रेस सत्तेत असताना कधी इथल्या राज्यकर्त्यांना भीक देखील घालत नव्हता आणि येथील राज्यकर्ते चीनच्या आगळीकिकडे कसं दुर्लक्ष करत होते याचं जवळचं मोठं उदाहरण म्हणजे २०१२ मार्च मध्ये चीनने  हिमाचल प्रदेश जवळच्या त्यांच्या हद्दीत लष्करी कवायती दरम्यान हवाई हद्दीचं उल्लंघन करून त्यांची दोन हेलिकॉप्टर आपल्या हद्दीत येऊन गेली. हि गोष्ट हिमाचल प्रदेशचे त्यावेळचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुम्मल यांनी केंद्राला कळवूनदेखील केंद्राने काहीही हरकत नोंदवली नाही. लष्कराने आपलं काम त्यावेळी केलं हरकत घेण्याचं. परंतु राजकीय पातळीवर काहीही नोंदवलं नाही.  

या पार्श्वभूमीवर भारतीय पंतप्रधानांचं सीमेवर जाऊन केलेलं हे विधान अत्यंत समर्पक आणि योग्य ती चेतावणी देणारं आहे.  ज्याचा गर्भित अर्थ चीनला समजला म्हणूनच त्यांनी त्वरित या वाक्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवत आम्हाला आक्रमक म्हणणं हा मिथ्या आरोप आहे आणि परिस्थितीचा विपर्यास आहे, असं म्हटलं. यालाच म्हणतात नाकाला मिरच्या झोंबणं. हा इशारा पाकला देखील होता कि, आम्ही चीनसारख्या देशाला धूप घालत नाही तर तुम्ही त्यांच्यापुढे बच्चे आहात. भारताने एका वाक्यात खरतर चीनचे इरादे स्पष्ट करून गर्भित धमकी दिली आहे. कारण देशाचा सर्वोच्च नेता सीमेवर जाऊन फक्त जवानांना धैर्य देत नाही, त्यांची पाठ थोपटत नाही, तर समोरच्या शत्रूराष्ट्राला अप्रत्यक्षपणे धमकावत आहे कि, आपल्या हद्दीत व्यवस्थित रहा, अन्यथा परिणाम गंभीर होतील. त्याची झलक आम्ही  १५ जूनच्या मध्यरात्री तुम्हाला दाखवली आहेच. अजून बघण्याची इच्छा असेल तर आमच्यात धमक आहे. 

मुळात १५ जुनच्याच धक्क्यातून चीन सावरत नाहीये कि, भारत इतका मोठा झटका कसा काय देऊ शकतो. मुळात जो देश आजपर्यंत गुळमुळीत बोलत होता आणि कायम ज्याला आपण धमकावत आलो आणि  इथले राज्यकर्ते लाचार असल्यामुळे त्यांनी ते ऐकून घेतलं आणि आपल्याला फार कधी दुरुत्तरे देण्याचा विचारदेखील करू शकत नव्हते,   तो देश कृती करून मोकळा झाला. म्हणजे आतून किती सज्ज असेल भारत.या विचारानेच चीनची झोप उडाली आहे. 

एखाद्या राज्यकर्त्यांची मानसिकता ओळखायला यावं लागतं . मोदीची मानसिकता खूप वेगळी आहे. मुळात आता घाव बसलाय म्हणजे जखम ताजी आहे, त्याचवेळी पुढील घाव घालून घेतले कि, अशी शिक्षा मिळते कि, पुढील कित्येक वर्ष तो शत्रू तोंड वर काढून बोलताच काम नये. इकडे राजनैतिक स्तरावर चीनने आपल्याशी बोलणी सुरु ठेवलीत,  कारण ड्रॅगन आयुष्यात पहिल्यांदा एका कोब्राच्या नादि लागलाय. ज्या भारताला राजकीय अर्थाने तो निर्जीव समजत होता.  त्या देशाला कोब्रासारखा डसताना पाहून ड्रॅगन सपशेल बिथरलाय. म्हणूनच मोदीनितीने आताच अजून काही घाव घालून पुरता मागे हटवून पुन्हा वळवळ करणार नाही याची तजवीज मोदीजी आणि टीम करत आहे. 

मुळातच या भेटीचा चार पदरी उद्देश होता. १५ जूनला सैन्याने दाखवलेलं धैर्य आणि अतुलनीय साहस यांचं कौतुक (जो मोदीजींचा नैसर्गिक स्वभाव आहे), मी पूर्वीच्या राज्यकर्त्याप्रमाणे भिणारा  नाही हे दाखवून द्यायचं होतं, चीनला राजनैतिक पातळीवर पूर्ण अडकवण्यासाठी जेणेकरून तिथे कोणतीही माघार चीनने घ्यायला नको आणि चवथा उद्देश जर ऐकलं नाही तर पुढील कोणतीही गोष्ट करण्यास भारत कचरणार नाही आणि आमच्या सैन्याने जी काही कृती केली ती आगळीक नव्हती तर ती एक समजून उमजून व ठरवून केलेली कृती होती, हे लक्षात घ्या. त्याच्या मागे संपूर्ण भारत उभा आहे, त्यामुळे हा पूर्वीचा भारत नाही, कि सीमेवर काहीही होउदे आणि आम्ही देशात त्याची खबर पण घेणार नाही. 

अजून एक अर्थ या भेटीचा आहे की, १५ जूनला जे घडलं ते पूर्णपणे आमच्या प्लांनिंगचा भाग होता आणि ते कार्य अपेक्षेपेक्षा उत्तम पार पाडल्याबद्दल मी माझ्या बहादद्दूर सैनिकांचं कौतुक करायला आलोय. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि, पुलवामा प्रमाणेच त्यांनी हा इशारा पण दिला आहे कि, आमच्या एकाही सैनिकाचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. याचा खूप मोठा अर्थ आहे आणि चीन बालाकोट हल्ल्यापासून हे नक्कीच जाणून आहे कि,मोदीजी जेंव्हा सांगतात तेंव्हा ते करतातच. परंतु जे सांगत नाहीत ते पडद्यामागे घडत असतं आणि त्यांची टीम त्यात सक्षम आहे. 

यात अजून एक इशारा दडलेला आहे कि, तुमच्या इथल्या  सर्व पेरलेल्या एजंटांना आम्ही भीक पण घालत नाही आणि त्यांनी कितीही बकबक केली तरी आम्ही जे करायचं ते करणारच. अर्थात हा इशारा चीनला त्याचप्रमाणे इथल्या त्यांच्या करार केलेल्या एजंटांना, कम्युनिस्ट पक्षांना आणि मेडियामधील अस्तनीतल्या सापांना देखील आहे. दुसरा एक इशारा  या अचानक ठरलेल्या भेटीने दिला कि, तुम्ही देणग्या देऊन कितीही लाचार बनवलत इथल्या संघटना मीडिया आणि लोकांना तरी त्या लाचार असलेल्या माणसांना , संघटनांना आणि मीडियाला, तरी आम्ही काही उत्तर देणं लागत नाही आणि मोदी सर्व निर्णय स्वतंत्ररित्या घेतात.  त्यावर कोणताही आणि कोणाचाही दबाव काम करून शकत नाही वा करणार नाही. अंतर्गत वा बाह्य कोणत्याच दबावाला मोदी भिकसुद्धा घालत नाहीत. त्याचप्रमाणे कोणतीही  घटना आणि त्यांचे परिणाम आम्ही आमच्या हिताचेच करवून घेतो,समोर कितीही मोठा शत्रू का असेना. 

अजून एक वाक्य जे मोदींनी वापरलं कि "अब विकासका दौर चला है " यात फक्त इथला विकास नाही तर आत्मनिर्भर भारताचा गंभीर इशारा पण आहे. म्हणजे तुमची इथली स्थानं लवकर गुंडाळून त्यांना  आम्ही परत तुमच्याच देशात पाठवणार हे निश्चित. कारण आत्मनिर्भर भारत या त्यांच्या मंत्रामध्ये  समस्त भारतीय अत्यंत उत्साहाने  सामील झालेत. सुरवातीला  लोकांनी आपणहून अँप  बंद करून दाखवलेला प्रतिसाद पाहूनच,  कायद्याच्या पातळीवर, तेच अँप बंद करून, एक पाऊल पुढे टाकून, मोदींनी आर्थिक नाड्या आवळायला सुरवात केली आहे. हा तमाम भारतीयांचा पाठिंबा लक्षात घेऊनच तसा इशारेवजा आवाज मोदींनी सीमेवर जाऊन चीनला ऐकवला. कारण आर्थिक नुकसान माणसाला वा  देशाला बरंच काही शिकवून जाते. 

दुसरं असं कि, जर खरंच चीनच्या आर्थिक नाकेबंदीची  गणितं जमवता आली तर तेथील अर्थव्यवस्था नक्कीच कोलमडेल. येथील कंपन्या ताब्यात घ्यायच्या चीनच्या हालचालींना नुकताच एक अध्यादेश आणून पायबंद घातला आहेच. ज्यायोगे येथे  चीनची अनियंत्रित गुंतवणूक होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.  त्याचा पुढील परिणाम चीनमध्ये बेकारीसह  आर्थिक अस्थैर्य निर्माण होऊन, लोकमत बदल आणि त्याचं रूपांतर आज ना उद्या असंतोषात होईल आणि सत्तापरिवर्तन होऊ शकेल. कारण कोणतीही सत्ता अनियंत्रित पद्धतीने व हुकूमशाहीच्या मार्गाने फार काळ टिकवता येत नाही, हे जगातील अनेक राष्ट्रात सिद्ध झालाय. 

मुळात चीन हा वर्गातला एक व्रात्य आणि गुंड मुलगा, ज्याला अमेरिकेपासून सर्व प्रत्यक्ष इशारा द्यायला घाबरत होते. १५ जूनच्या भारतीय जवानांच्या  धडाकेबाज आणि कल्पनातीत कृतीने, जगात सर्वांना शब्दशः तोंडात बोट घालायला लावली. हे म्हणजे एखाद्या व्रात्य आणि दंगेखोर मुलाला, एखाद्या  सरळ साध्या वाटणाऱ्या (मुळात साध्या नसलेल्या, पण ७० वर्षांच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वच आघाड्यांवर  बोटचेपं वागावं लागलेल्या), मुलाने धोपटून काढण्यासारखं आहे. पण १५ जूनच्या कृतीतून अजून एक गोष्ट सिद्ध झाली ती म्हणजे फक्त लढाईची तयारीच नव्हे किंवा शस्त्रसज्जता नव्हे तर सैनिकी मनोधर्याच्या बाबत देखील भारतीय सैन्य जगात अग्रेसर आहे. कारण जगातलं कोणतही युद्ध संख्याबळावर नाही तर सैनिकांच्या मनोधर्यावर लढलं जातं . म्हणूनच कमीतकमी सैन्य असूनसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना इतकी टक्कर दिली आणि हिंदवी स्वराज्य स्थापित केलं. 

मोदी आल्यानंतर त्यांनी  लष्कराला गरजेची शस्त्रास्त्र , उपकरणं , सामग्री सर्व काही दिलं. तेदेखील शस्त्रास्त्र खरेदीची कोणताही भ्रष्टाचार होऊ न देता. याकारणाने सैनिकांचं  मनोधैर्य उच्च आहे. त्यांचं मनोधैर्य उच्च असण्याचं दुसरं महत्वाचं कारण ज्या ज्या वेळी त्यांनी उच्च कामगिरी केली, त्या त्या वेळी स्वतः पंतप्रधान मोदींनी त्या सैनिकांना प्रत्यक्ष जाऊन शाब्बासकी दिली आहे. एअर स्ट्राईकच्या वेळी तर पंतप्रधान पूर्ण रात्र जागे राहून कामगिरी नीट पार पडत आहे आणि आपली काहीही जीवित हानी होत नाही याची पाहणी करतात. हि खूप मोठी गोष्ट आहे. 

वरील सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम चीनच्या बदललेल्या भूमिकेत दिसुन येतो. जर असा बदल वरवरचा असेल तर आपण सज्ज आहोतच यावेळी, पूर्ण धडा शिकवायला. हा देखील इशारा या भेटीतून त्यांनी दिला. हे खूप मोठं फलित  आहे भेटीचं . 

NOW HOPE FOR THE BEST !!!!

© ®  संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
०४/०७/२०२०
१३:१०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...