Skip to main content

रखुमाईची तक्रार



खास आषाढी एकादशीनिमित्त. 

रखुमाईची तक्रार 

भक्तरक्षणार्थ हरी उभे विटेवरी 
अठ्ठावीस युगे सरली हरी पंढरी 

अखंड हा स्नेह झरा  पंढरपुरी 
पांडुरंग उभे ऐकले पंढरपुरी 

रखुमाईस वाटले तक्रार न्यावी 
आपली व्यथा श्रीहरींना सांगावी 

बोलावून घेतले नारद मंदिरी 
एकतारी वाजवीत आली स्वारी 

लक्ष्मी म्हणे नारदांस ऐका एकदा 
ऐकली मी उभी इथे सदा सर्वदा 

कधी न मी खंत केली ना काळजी 
परी मनी सल आहे एकलेपणाची  

सांगू कुणा हृदयाची पीडा नारदा 
उपाय काही असेल सांगा मजला 

नारायण नारायण बोल बोलुनी 
नारद करीती चिंता काय बोलू मी 

सुचले ते सांगतो परी हात जोडतो 
नाव नका घेऊ माझे पाया पडतो 

आश्वस्त करिते  नारदास  माता 
सांगावे काय करिता पावेन नाथा 

नारद मग स्मरून श्रीहरीस बोलती  
माते मग साधा उपाय करा एकची 

भक्तवत्सल हे ब्रीद असे हरीवचन 
जावे शरण पांडुरंग करा भावेस्मरण 

हरी आपुल्या नामाला बांधला असे 
तत्पर येऊन पुसतील भाव मनीचे 

सांगा त्यास एक क्षण द्यावा मजही 
ज्ञाना सांगे  क्षण एक राहे हरी द्वारी 

खरे नाही वाटत परंतु हे अद्भुत सत्य 
एक क्षण विठ्ठल म्हणा हरिरूप प्राप्त 

रखुमाई हसून म्हणे मम हृदयी नाथ 
उगीच पुसले तुम्हा हरी जवळी नित्य 

नारद हसून म्हणती दोष न आपुला 
जवळी जे असते ते दिसे न स्वनेत्रा  

राग रखुमाईचा पळून गेला क्षणात 
हरी हसले मंदिरात नारदहि आनंदात 
हरी हसले मंदिरात नारदहि आनंदात 

कवी : प्रसन्न आठवले 
०१/०७/२०२०
१४:४६
































Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...