Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

शहाणपण आणि प्रेम

शहाणपण आणि प्रेम  शहाणपण हे जन्मतः मिळावं लागतं आणि प्रेम हे यौग्य वयात करून व्यक्त व्हावं लागतं . ते नाही जमलं तर पन्नाशीत काय होतं  ते मांडण्याचा प्रयत्न केलाय  उपजताच जे आले नाही पन्नाशीत मिळेल कसे  तरुणपणी जे जमले नाही पन्नाशीत जमेल कसे  रांजण शहाणपणाचे आमुच्या  जन्मतः रितेच होते  म्हणून गद्धे पंचविशीत आमुचे  सूत  कुठेच जमले नव्हते  शहाणपणाचे सोडा जाऊदे  त्याने काही अडले नाही  पंचविशीतही मग गद्धे राहिलो  म्हणून काही जमले नाही  आता पन्नाशीमध्ये यातील काय जमेल कसे  तरुणपणी जे जमले नाही पन्नाशीत जमेल कसे  तरुणपणी केला विचार तरी  व्हावे शहाणे जमवून अक्कल  फुकाचे ते मंत्र घेऊनि कधीतरी  हाती शेवटी फक्त उरले टक्कल  न्हावीदेखील चकित व्हायचा  केसाचे हे तुमच्या नुसते जंगल  जाऊ दे ते शहाणपण मग  प्रेमात तरी होऊया पागल  खाते हे शहाणपणाचे रिते राहिले  ते भरेल कसे  तरुणपणी जे जमले नाही पन्नाशीत जमेल कसे  म्हटले आता जावे दुसऱ्या वाटे  बघावे प्रेम...

खऱ्या भक्तीचा मंत्र

सोबत जोडलेला व्हीडिओ पाहिला. ज्यात पोलिसांनी वारकरीबुवांना पंढरपूरच्या वेशीवर अडवलं. बुवानी तिथेच पोलिसांना नमस्कार केला आणि परतीचा रस्ता धरला. हे पाहिलं आणि मन भारावून गेलं. राग नाही, त्रागा नाही, अपशब्द नाही, हे पाहून अद्भुत वाटलं मला. म्हणून लगेच एक काव्य सुचलं ते लिहून काढलं. खऱ्या भक्तीचा मंत्र घेतला वेशीपाशी पांडुरंग पाहिला नमन देहातील ईश्वराला सर्वत्र विठ्ठल दिसे त्याला कुठून आले वारकरी बुवा विठ्ठल भेटीची आस मना पायीच्या त्या जडजीवाला विठ्ठल वेशीपाशी भेटला खऱ्या भक्तीचा मंत्र घेतला लागले पिसे भक्तीचे तया चेतवून भाव जाळून माया फक्त नाम विठ्ठल घ्याया जन्म त्याने जगी या घेतला खऱ्या भक्तीचा मंत्र घेतला उगा नाही राग ध्यानी उगा नाही खेद मनी उगा नाही त्रागा जनी भजे जळीस्थळी त्याला खऱ्या भक्तीचा मंत्र घेतला गाव पंढरी मी पोचलो वेशीपाशी मी अडकलो विठ्ठलइच्छा दर्शना आलो जीव हा वेशीवर विसावला खऱ्या भक्तीचा मंत्र घेतला ©®कवी : प्रसन्न आठवले २८/०६/२०२० १६:५१

#श्रीकृष्णनीती #भाग३९

#श्रीकृष्णनीती #भाग३९ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! स्वातंत्र्याच्या सुमारास आणि त्या नंतर सत्तेला वा सत्ताधीशांना लागलेलं बेजबाबदारीचं ग्रहण हे त्याच सुमारास लागलं कि आधीपासूनच होतं, हे शोधण्यासाठी स्वातंत्र्याच्या थोडं मागे जाऊ. मुळात काँग्रेसची स्थापना हि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झालीच नव्हती. ब्रिटीच सत्ताधाऱ्यांकडून येथील सुशिक्षित जनतेसाठी जास्तीतजास्त सवलत मिळवता यावी, या हेतूने खरतर इंडियन नॅशनल काँग्रेस या संस्थेची स्थापना २८ डिसेंबर, १८८५ रोजी ब्रिटिश निवृत्ती सनदी अधिकारी अॅलन ह्यूम यांनी केली. १८८५ ते १९०५ पर्यंत याच उद्देशाने चालणाऱ्या पक्षाच्या रक्तात  लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा मंत्र  ओतला. त्यानंतर त्याची री बाकीच्या सर्व नेत्यांनी ओढली.  जवळजवळ १९२० पर्यंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बिपीनचंद्र पाल, लाला लजपत राय,  जिन्ना यासारखे जहाल नेते काँग्रेसच्या नेतृत्वात होते. यातील जिन्नानी  १९१३ मध्ये लोकमान्यांच्या तुरुंगात असण्याच्या काळात  मुस्लिम लीग पक्षात प्रवेश केला आणि काँग्रेस सोडली. त्याचसुमारास म्हणजे १९२० नन्तर जहालांचं प्र...

#श्रीकृष्णनीती #भाग३८

#श्रीकृष्णनीती #भाग३८ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! श्रीकृष्णाच्या काळापासून , अर्वाचीन भारतातील सांस्कृतिक,  वैचारिक, आर्थिक, सामाजिक  अशी सर्वच स्तरावर सुबत्ता अनुभवून उपभोगणारा जगातला एकमेव देश म्हणजे भारतवर्ष. इतर देश वा संस्कृती या चाचपडत देखील नव्हत्या त्यावेळी येथे सर्व बाबतीत संपन्नता नांदत होती. खऱ्या अर्थाने प्रत्येक घरात सोन्याचा धूर निघत होता. कदाचित याचं आकर्षण वाटून, यांच्या लोभापायी हे वैभव लूटण्याकरता येथे अश्या मुलखातून टोळ्या आल्या ज्यांनी या वैभवाचा एक शतांश देखील कधी अनुभवाला नव्हता.  प्रथम येऊन गेलेले या बद्दल या देशाबाहेर जितकं जास्त सांगत गेले असतील त्या वर्णनानुसार येथील अमाप संपत्तीचा, वैभवाचा उपभोग घेऊन यातील जास्तीत जास्त लुटून नेण्याकरिता अजून अजून टोळ्या येत गेल्या. सुरवातीला कदाचित इथली संपन्नता इतकी होती कि, लुटून नेलेलं ऐश्वर्य हे गुंजभर भासत असल्यामुळे, येथील राजे आणि प्रजा दुर्लक्ष करत गेले. त्याचा परिणाम म्हणून अजून लूट नेण्यासाठी टोळ्या येत गेल्या. अगणित संपत्ती असल्यामुळे असलेली बेफिकिरी हि घातक ठरते. तसंच ...

#श्रीकृष्णनीती #भाग३७

#श्रीकृष्णनीती #भाग३७ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! धर्म या संकल्पनेबद्दल विस्ताराने जाणून घेतल्यानंतर अधर्म काय हे कळायला खरतर अवघड नाही. जे धर्माविरुद्ध आहे, तो अधर्म. धर्म म्हणजे फक्त ईश्वरोपासना वा अध्यात्म आणि ततसंबंधी ज्ञानार्चन नव्हे तर प्रत्येकाचं आपलं जीवन जगताना व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि मातृभूमीप्रति असलेली कर्तव्य म्हणजेच व्यापक अर्थाने धर्म. यातील कशातही केलेली चूक वा कर्तव्यमूढता हा अधर्म नसला तरी धर्म पालनात केलेली चूकच. परंतु यातील कोणत्याही गोष्टींबाबत केलेला अक्षम्य गुन्हा वा प्रतारणा वा प्रमाद म्हणजे अधर्म. अधर्म हा आपण स्वतः केला किंवा अधर्म करत असलेल्या व्यक्तीला जाणूनबुजून वा अजाणतेपणी केलेले सहाय्य. मुळात अधर्म हा पूर्वापार असुरांचा धर्म होता. त्यांच्यासाठी धर्म पालन न करणं म्हणजेच धर्म. हे त्यांच्या बुद्धीनुसार वा विवेकाच्या अभावाने, अहंकाराच्या प्रभावाने, तामसीपणामुळे, काम क्रोध यांच्याकडे मनाच्या असलेल्या नैसर्गिक ओढीतून व वाईट तेच चांगलं या बुद्धीच्या धारणेतून मनातील विकारांचा झालेला उत्पात म्हणजे अधर्म असुरांचा हा धर्म म्हणजेच देव व मानव यांच...

Major General Nathu Singh Rathore Hindi and English

मेजर जनरल नथू सिंह राठौर , फील्ड मार्शल करिअप्पा और नेहरू। एक अज्ञात बात। !!!!! इंटरनेट पर खोज करते हुए एक लेख मिला। जो अंग्रेजी में है। मेरा हिन्दी अनुवाद। हमने   स्वतंत्रता प्राप्त की थी और अपनी सेना के लिए एक नए सेना प्रमुख का चयन करना चाहते थे। लेकिन तत्कालीन कार्यवाहक प्रधानमंत्री नेहरू ने बिना किसी से सलाह लिए जनरल रोब लॉकहार्ट , एक ब्रिटिश अधिकारी को नियुक्त किया। यह बहुत बड़ा सदमा था। सेना में हर जगह एक भावना थी कि क्य हमने इसके लिए 190 साल की लड़ाई लड़ी और अंग्रेजों को वापस भेज दिया ताकि आजादी के बाद सेना प्रमुख ब्रिटिश होंगे। नियुक्त लॉकहार्ट ने भारतीय सेना के लिए एक व्यापक योजना तैयार की और इसे नेहरू की मेज पर रखा। नेहरू का जवाब सुनने के बाद वह बाहर आए। बाहर ,   मेजर जनरल अजीत अनिल ( जिक ) रुद्र , एक सेना अधिकारी से उनकि मुलाकात हुई।   रुद्रसाह्बने पूछा कि प्रधानमंत्री ने क्या कहा। लॉकहार्ट ने गुस्से में कहा , " ने...

अजयमेरु उर्फ ​​अजमेर

अजयमेरु उर्फ ​​ अजमेरl  Ajaymeru alias Ajmer उपलब्ध दस्तावेजों के अनुसार , चौहान वंश के एक राजा अजयराज चौहान ने इस शहर की स्थापना की और इसे एक शानदार शहर बनाया। बाद में , चौहान वंश के राजाओने इस शहर को झीलों और बगीचों से सजाया। इस शहर की स्थापना 27 मार्च , 1112 को अजयराज चौहान ने की थी। उनके नाम पर इस शहर का नाम अजयमेरु रखा गया। अजय राजा का नाम है और मेरु का अर्थ शिखर है। इस शहर की सुंदरता के बारे में लिखते हुए , पृथ्वीराज चौहान के दरबार के कवि जयानक कश्मीरी ने इंद्र कि अलंकापुरी , श्रीकृष्ण कि द्वारका और रावण की लंका के रूप से अधिक सुंदर शहर बताया है। इस शहर की स्थापना के बाद , अजयराज चौहान ने इस शहर को अपने साम्राज्य की राजधानी बनाया। इस चौहान वंश ने लगभग आठ सौ से एक हजार वर्षों तक शासन किया। अजयराज चौहान इस राजवंश के 23 वें राजा थे। इस राजवंश के अंतिम राजा पृथ्वीराज चौहान थे , जिन्हें मोहम्मद गोरी यानी गजनी के मोहम्मद ने हराया...

Ajaymeru alias Ajmer

Ajaymeru alias Ajmer According to the available documents, Ajayraj Chauhan, the king of the Chauhan dynasty, established this city and made it a glorious city. Later, the city of capital of the Chauhan dynasty was decorated with lakes and gardens. This city was founded on March 27, 1112 by Ajayraj Chauhan. The town was named as Ajaymeru after his name. Ajay is the name of the king and Meru is the peak. Writing about the beauty of this city, poet Jayanak Kashmiri of Prithviraj Chauhan's court has described this as a more beautiful city than Indra’s Alankapuri, Shrikrishna’s Dwarka and Ravana’s Lanka. After the establishment of this city, King Chauhan made this city the capital of his empire. This Chauhan dynasty ruled for about eight hundred to one thousand years. Ajayraj Chauhan was the 23rd king of this dynasty. The last king of this dynasty was Prithviraj Chauhan, who was defeated by Mohammad Ghori i.e. Mohammad of Ghazni and the thousand year rule of Chauhan dynasty came to ...

UN सुरक्षा परिषद, स्थायी सदस्यत्व आणि इतिहासात भारताने गमावलेली संधी !!

UN सुरक्षा परिषद, स्थायी सदस्यत्व आणि इतिहासात भारताने गमावलेली संधी !! हा विषय अनेक वेळा चर्चेला येतो , अर्थवट माहितीवर काहीतरी वाचायला मिळत कि, भारताला आलेली संधी भारताने गमावली आणि ती चीनला दिली.  म्हणून या विषयात पडलो आणि काही माहिती गोळा करून एका लेखाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडतोय. घडलेल्या घटना शक्यतो तश्याच मांडण्याचा प्रयत्न केलाय. काढलेला निष्कर्ष हा त्यावेळची जी माहिती उपलब्ध आहे त्यावर आधारित आहे. हि माहिती ६० रे ७० वर्षांपूर्वीची असल्यामुळे फार पूर्वीची नाही आणि त्याचे बरेचसे पुरावे मिळू शकतात, कोणाला शोधायचे असतील तर मिळू शकतील. असो  मूळ विषयाकडे वळण्याआधी UN बद्दल थोडं सांगतो. United Nations  अर्थात संयुक्त राष्ट्र संघ याची स्थापना १९४५ ला दुसरं महायुद्ध संपल्यावर झाली.  २४ ऑक्टोबर, १९४५ या दिवशी अधिकृतपणे UN ची स्थापना झाली. दुसऱ्या महायुद्धातील जेते देश म्हणजे ज्यांनी हे युद्ध जिंकलं ते मुख्य पाच देश अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, संयुक्त रशिया आणि चीन, स्थापनेतील मुख्य भागीदार होते. ज्याला संस्थापक देश म्हणता येईल. चीन हा त्यावेळी चँग कै शेक यांच्या...