Skip to main content

जानकी पुनःवनवास १०० व अंतिम

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास १०० व अंतिम 

 
आज समारोपाचा भाग लिहिताना मन आनंद आणि अश्रु दोन्हीनी भरून आलय. आनंद या साठी की, इतकी दीर्घ मलिका आणि ती सुद्धा एका गंभीर विषयावर लिहायची इच्छा होती. ती पूर्ण झाली याचा आनंद. दुःख यासाठी की आज सर्व वाचकांचा निरोप घ्यायचा यांच दुःख.

अश्या समिश्र भावात काही विवेचन रामायणाबद्दल.

कोणतीही कथा वा लेखन वाचताना तो त्या काळानुसार वाचावा. अन्यथा काही चुकीचे निष्कर्ष निघू शकतात. 

रामायण हा नीतिमूल्यांच्या जपणुकीचा काळ आहे. सत्ययुग आणि त्रेतायुग या दोन युगात नीतिमूल्याना मानवी जीवनापेक्षा जास्त महत्व होत.  ही त्यावेळची मानसिकता होती.  कोणताही निर्णय मग तो भगवान श्रीराम यांचा असो वा अन्य कोणाचाहि त्याच काळातील संदर्भानुसार बघावा. जस मूल्य ही माणसांसाठी आहेत आणि जीवन श्रेष्ठ आहे. हा आताचा सिद्धांत झाला. पण त्याकाळात माणस ही मूल्य जपण्यासाठी आहेत. हा त्यांचा सिद्धांत होता आणि तो जपत असताना माणसाला झालेला त्रास , याही पेक्षा मूल्य श्रेष्ठ हा त्याकाळचा सिद्धांत.

हे अजून एका गोष्टिवरुन सिद्ध होत. की देवी सीतेचा त्याग करण्याचा निर्णय घेतल्यानन्तर परिवारातील लक्ष्मण सोडून बाकीं कोणाच्याही प्रतिक्रिया नोंदल्या नाहीत.  हे विशेष. अस  होणार नाही की बाकीं कोणाला दुःख नसेल झाल. पण त्याहीपेक्षा प्रभुंच राजा म्हणून असलेल्या कर्तव्यात ते गौण ठरत. हा काळाचा महिमा.  आज आपण वडिलांनी कधी काळी घेतलेल्या निर्णयावर सुद्धा चर्चा करतो. पण तेंव्हा सुद्धा हे विसरतो की तो निर्णय सुद्धा त्यांच्यां तरुण पणी म्हणजे आजपासून २०, २५ , वा ३० वर्षानपुर्वी घेतला होता. त्यावेळच्या  साधनं , संस्कार आणि प्राप्त परिस्थितितील विचार यावर घेतला होता. त्यावर भाष्य आज करण गैर आहे. हे माझ मत. 

रामायण वाचताना या गोष्टिंच ध्यान ठेवण गरजेच आहे.  लोकं क़ाय करतात की आताच्या काळाच्या संदर्भात एखादा निर्णय चूक की बरोबर यावर भाष्य करतात.  हे चूक आहे अस मला वाटत. दूसर अस की खुप जण श्रीकृष्णाच्या चरित्राशी श्रीरामांच्या चरित्राची तुलना करतात आणि म्हणतात की श्रीकृष्ण व्यवहार्य म्हणजेच प्रैक्टिकल होते . बरोबर आहे. पण तेही भगवान आहेत जाणतात की द्वापारयुगाच्या पुढे कलियुग आहे आणि कलियुगासाठी मानवाने कस वागल पाहिजे , कस राहिलं पाहिजे हे त्यानी दाखवून दिलय. ते सुयोग्यच आहे.  पण प्रभू श्रीराम हे त्याही याधी कित्येक हजार वर्ष होउंन गेले. तेंव्हाची नीतिमूल्यांची संकल्पना, व्याख्या आणि आदर्श वेगळे होते. ते आजही कालातीत आहेत आणि असतील. तस वागण कोणालाही कधीच शक्य नाही म्हणून ते श्रेष्ठ ठरतात. अर्थात हेही माझं मत. 

असो. या मालिकेच्या लेखनात खुप महत्वाची गोष्ट ही कि वाचकांच्या प्रतिसादामुळे मला माझ्यातील सिद्धहस्त लेखक सापडला.  त्यांमुळे याही पुढे असच पौराणिक कथांवर आधारित लेखन करण्याची उर्मि, ऊर्जा आणि प्रेरणा जागृत झाली हे नक्कीच. ही प्रेरणा अर्थातच माझे सद्गुरु श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची. त्यांमुळे सरते शेवटी. जय श्रीराम. 

लोभ आहेच तो असाच राहावा व वाढ़ावा ही नम्र विनंती. 

लवकरच श्रीकृष्ण व राधा यांच्या  जीवनावर आधरित एक काल्पनिक कथामाला, (पूर्णपणे माझ्या कल्पनेतून आलेली कथामाला ) , घेऊन येईन.  ज्याना त्यावर टैगिंग हव आहे त्यानी इथे तस सांगितल्यास मी त्याना टैग करीन. 

ll श्रीराम जयराम जय जयराम ll
ll सद्गुरु श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय ll

© संकल्पना आणि लेखन  : प्रसन्न आठवले

शुभम् भवतु 

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...