ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास १०० व अंतिम
आज समारोपाचा भाग लिहिताना मन आनंद आणि अश्रु दोन्हीनी भरून आलय. आनंद या साठी की, इतकी दीर्घ मलिका आणि ती सुद्धा एका गंभीर विषयावर लिहायची इच्छा होती. ती पूर्ण झाली याचा आनंद. दुःख यासाठी की आज सर्व वाचकांचा निरोप घ्यायचा यांच दुःख.
अश्या समिश्र भावात काही विवेचन रामायणाबद्दल.
कोणतीही कथा वा लेखन वाचताना तो त्या काळानुसार वाचावा. अन्यथा काही चुकीचे निष्कर्ष निघू शकतात.
रामायण हा नीतिमूल्यांच्या जपणुकीचा काळ आहे. सत्ययुग आणि त्रेतायुग या दोन युगात नीतिमूल्याना मानवी जीवनापेक्षा जास्त महत्व होत. ही त्यावेळची मानसिकता होती. कोणताही निर्णय मग तो भगवान श्रीराम यांचा असो वा अन्य कोणाचाहि त्याच काळातील संदर्भानुसार बघावा. जस मूल्य ही माणसांसाठी आहेत आणि जीवन श्रेष्ठ आहे. हा आताचा सिद्धांत झाला. पण त्याकाळात माणस ही मूल्य जपण्यासाठी आहेत. हा त्यांचा सिद्धांत होता आणि तो जपत असताना माणसाला झालेला त्रास , याही पेक्षा मूल्य श्रेष्ठ हा त्याकाळचा सिद्धांत.
हे अजून एका गोष्टिवरुन सिद्ध होत. की देवी सीतेचा त्याग करण्याचा निर्णय घेतल्यानन्तर परिवारातील लक्ष्मण सोडून बाकीं कोणाच्याही प्रतिक्रिया नोंदल्या नाहीत. हे विशेष. अस होणार नाही की बाकीं कोणाला दुःख नसेल झाल. पण त्याहीपेक्षा प्रभुंच राजा म्हणून असलेल्या कर्तव्यात ते गौण ठरत. हा काळाचा महिमा. आज आपण वडिलांनी कधी काळी घेतलेल्या निर्णयावर सुद्धा चर्चा करतो. पण तेंव्हा सुद्धा हे विसरतो की तो निर्णय सुद्धा त्यांच्यां तरुण पणी म्हणजे आजपासून २०, २५ , वा ३० वर्षानपुर्वी घेतला होता. त्यावेळच्या साधनं , संस्कार आणि प्राप्त परिस्थितितील विचार यावर घेतला होता. त्यावर भाष्य आज करण गैर आहे. हे माझ मत.
रामायण वाचताना या गोष्टिंच ध्यान ठेवण गरजेच आहे. लोकं क़ाय करतात की आताच्या काळाच्या संदर्भात एखादा निर्णय चूक की बरोबर यावर भाष्य करतात. हे चूक आहे अस मला वाटत. दूसर अस की खुप जण श्रीकृष्णाच्या चरित्राशी श्रीरामांच्या चरित्राची तुलना करतात आणि म्हणतात की श्रीकृष्ण व्यवहार्य म्हणजेच प्रैक्टिकल होते . बरोबर आहे. पण तेही भगवान आहेत जाणतात की द्वापारयुगाच्या पुढे कलियुग आहे आणि कलियुगासाठी मानवाने कस वागल पाहिजे , कस राहिलं पाहिजे हे त्यानी दाखवून दिलय. ते सुयोग्यच आहे. पण प्रभू श्रीराम हे त्याही याधी कित्येक हजार वर्ष होउंन गेले. तेंव्हाची नीतिमूल्यांची संकल्पना, व्याख्या आणि आदर्श वेगळे होते. ते आजही कालातीत आहेत आणि असतील. तस वागण कोणालाही कधीच शक्य नाही म्हणून ते श्रेष्ठ ठरतात. अर्थात हेही माझं मत.
असो. या मालिकेच्या लेखनात खुप महत्वाची गोष्ट ही कि वाचकांच्या प्रतिसादामुळे मला माझ्यातील सिद्धहस्त लेखक सापडला. त्यांमुळे याही पुढे असच पौराणिक कथांवर आधारित लेखन करण्याची उर्मि, ऊर्जा आणि प्रेरणा जागृत झाली हे नक्कीच. ही प्रेरणा अर्थातच माझे सद्गुरु श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची. त्यांमुळे सरते शेवटी. जय श्रीराम.
लोभ आहेच तो असाच राहावा व वाढ़ावा ही नम्र विनंती.
लवकरच श्रीकृष्ण व राधा यांच्या जीवनावर आधरित एक काल्पनिक कथामाला, (पूर्णपणे माझ्या कल्पनेतून आलेली कथामाला ) , घेऊन येईन. ज्याना त्यावर टैगिंग हव आहे त्यानी इथे तस सांगितल्यास मी त्याना टैग करीन.
ll श्रीराम जयराम जय जयराम ll
ll सद्गुरु श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय ll
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
शुभम् भवतु
Comments
Post a Comment