Skip to main content

जानकी पुनःवनवास ९७


ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ९७
महाराजांनी मला देखील आसन ग्रहण करण्यास सांगितले. महाराजांनी वसिष्ठ ऋषिना आपल्या व आपल्या परिवाराच्या कुशलते विषयी विचारल्यावर महर्षि दुर्वास म्हणाले 
" हे राजन मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. फार पूर्वी देव आणि दैत्य यांच्यात युद्ध चालू होत. देवांच्या सेन्याकडून मार खाऊन, दैत्य जीव वाचवण्यासाठी भृगु ऋषींच्या आश्रमात पोहोचले. तेथे भृगु ऋषींची धर्मपत्नी हजर होती.  भृगु ऋषी काही  आश्रमाबाहेर गेले होते. भृगु पत्नीने आश्रमात शरण  घेण्यास आलेल्या दैत्यांना जागा दिली. त्या दैत्यांना शोधत आलेल्या भगवान विष्णूनी जेंव्हा जाणलं कि भृगूपत्नीने त्या दैत्यांना आश्रय दिलाय. त्यांना राग आला. आणि त्यांनी सुदर्शन चक्राने भृगूपत्नीचे मस्तक धडावेगळे केले. त्यावेळी तेथे आलेल्या भृगु ऋषींनी ते दृश्य पाहिलं आणि भगवान जनार्दन अर्थात नारायण यांना शाप दिला कि, माझ्या निर्दोष पत्नीला तुम्ही मारलत त्यामुळे मी तुम्हाला शाप देतो कि तुम्हाला सुद्धा मृत्युलोकीं जन्म घेऊन अनेक वर्षांपर्यंत पत्नी वियोग सहन करावा लागेल. यानंतर  भगवान विष्णू तिथून अंतर्धान पावले. राग शांत झाल्यावर भृगु ऋषींना आपल्या बोलण्याचा पश्चाताप झाला. म्हणून पश्चातापदग्ध अवस्थेत ते भगवान विष्णूंच ध्यान करायला बसले. काळी काळानंतर भृगु ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णू तिथे प्रकट झाले. भृगु ऋषींनी त्यांना आपल्या मनातील भाव बोलून दाखवला. पण त्यावर भगवान नारायण म्हणाले. कि, हे महर्षी भृगूजी तुमचा शाप मी लोकहितार्थ स्वीकारला आहे. यास्तव आपण व्यर्थ चिंता करू नये. 
आणि म्हणूनच हे महाराज दशरथ,  हेच भगवान विष्णू,  पृथ्वीलोकी मानव देहात घेऊन तुझ्या घरी जन्माला आले आहेत. जे श्रीरामचंद्र म्हणून तिन्ही लोकी प्रसिद्ध होतील. अनंत युगांपर्यंत त्यांची कीर्ती राहील. परंतु भृगु ऋषींच्या शापाकारणे ते या जन्मी अनेक दुःख आणि क्लेश यांचे धनी होतील. पारिवारिक सुख त्यांच्या प्रारब्धी जवळ जवळ नाहीच. पण अनेक वर्षांपर्यंत ते राज्य करतील. त्यांच्या राज्यात प्रजा अत्यन्त सुखी  असेल. आणि त्याच रामराज्य युगविख्यात राहील. ते अकरा हजार वर्षे राज्य करून नंतर ब्रम्हलोकी जातील. ते अनेक अश्वमेघ यज्ञ करतील. त्यांना कोणीही पराभूत करू शकणार नाही. त्यांना सीतेपासून दोन पुत्र होतील." 
 इतकं बोलून महामुनी दुर्वास म्हणाले " हे राजन हेच वास्तव आहे तुझ्या पुत्राचे. त्यांचं जीवन कर्तृत्ववान असेल पण दुःखपूर्ण सुद्धा असेल. "
"हे सर्व ऐकल्यानंतर महाराज आणि मी, दोन्ही महर्षींना प्रणाम करून आश्रमातून प्रस्थान केलं. महाराज दशरथ यांनी माझ्याकडून तस वचन घेतलं होत कि हे मी कोणालाही जनात सांगणार नाही. म्हणून मी हे इतकी वर्ष मनात ठेवलं. पण प्रसंगोपात ते बाहेर आलं. तरीही हे लक्ष्मणा तू हे कोणालाही सांगू नकोस. पण एक सत्य आहे कि सीतेपासून महाराजाना दोन सुपुत्र होणार आहेत आणि महर्षी दुर्वासांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा राज्याभिषेक अयोध्येतच होणार आहे. तेंव्हा आता जे घडतंय ते नियतीने सुनियोजित केल्या प्रमाणेच होत आहे. तद्वत तू शोक करू नयेस. आज इतकी वर्ष ते मनात जपून ठेवलं होत. पण माहीत होत कि इतक्या श्रेष्ठ मुनिवरांची भविष्यवाणी मिथ्या असू शकणार  नाही. आज त्याचा प्रत्यय आला. म्हणून हे लक्ष्मणा तू तुझं मन दुःखी करू नकोस. अंति जे होईल ते उत्तमच असेल."
या आर्य सुमंतांच्या वाचनांना ऐकून लक्ष्मण सावरून भानावर आला. या प्रकारे चर्चा करत करत आर्य सुमंत आणि लक्ष्मण केशिनी नगरी जवळ पोचता पोचता संध्याकाळ झाली. दोघानींही केशिनी नगरीत विश्राम करण्याचं ठरवलं. एक रात्र विश्राम करून दोघेही दुसर्या दिवशी सूर्योदयापूर्वी निघून माध्यान्हीपर्यंत अयोध्येत पोहोचले. राजप्रासाद परिसरात रथ थांबवून लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्या महाल जवळ पोहोचला. तिथून आत जात असताना लक्ष्मण उदास अंतःकरणाने,  विचारमग्न होऊन महाराजांच्या महालापुढे पोहोचला. तिथे त्याने पहिले प्रभू सुद्धा दुःखी अंतःकरणाने मंचकावर बसले आहेत. प्रभूंच्या समीप जाऊन चरणावर शीश ठेवून प्रणाम करून लक्ष्मण म्हणाला.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...