Skip to main content

देवळातून देव केंव्हाच पळालाय


।। देवळातून देव केंव्हाच पळालाय ।।


देवळातून देव केंव्हाच पळालाय 
गाभार्याचा ताबा पुजार्यांनी घेतला, तेंव्हाच  तो पळालाय
पूजेचा ताबा उपचारांनी घेतला , 
भक्तीचा ताबा व्यवहाराने घेतला, तेंव्हाच तो पळालाय 
श्रद्धेचा ताबा अंध आणि अपंग श्रद्धेने घेतला,
मंत्रांचा ताबा पठणाने   घेतला ,तेंव्हाच तो पळालाय 
भावनेचा ताबा ढोंन्गाने घेतला 
भावाचा  ताबा देवळा पुढील रांगेने घेतला, तेंव्हाच तो पळालाय
तीर्थाचा ताबा पाण्याने घेतला 
 प्रसादाचा ताबा तबकाच्या किमतीने घेतला, तेंव्हाच तो पळालाय
 मुमुक्षु आणि ज्ञानी  गेले कुठे 
त्यांचा ताबा दक्षिणाधारिणी घेतला, तेंव्हाच तो पळालाय

मग हा देव आहे तरी कुठे 

अजूनही तो गरिबांच्या झोपडीत असतो 
रिकाम् ताट आणि पोट असलेल्या 
 अनाथ अपंग यांच्या नजरेत 
कष्ट करून पोट भरत असलेल्या 
तो  अजूनही वृद्धाश्रमात असतो
 वृद्धांच्यात , आपल्याच  मुलांनी टाकलेल्या 
तो अजूनही असतो ठाण मांडून 
निरागस निष्पाप हास्यात , चिमुकल्या 
हो तो अजूनही असतो वसलेला 
पान फुल झाडात, तुम्ही तोडत असलेल्या 

जा शोधा त्याला एखाद्या सहृदय बाबा वा प्रकाश  यांच्यात 
तो अजूनही वसती करून आहे त्यांच्या सारख्यांच्याच हृदयात
तो अजूनही वसती करून आहे त्यांच्या सारख्यांच्याच हृदयात  
जा शोधा त्याला जा शोधा त्याला जा शोधा त्याला

                            प्रसन्न आठवले 


 

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...