Skip to main content

कवडसा 3

कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु …२…… 

कालच शर्वरीला आई सोडून चार दिवस राहून गेली तिच्या कडे बघवत नव्हत. आपल्या लेकीच्या पदरी आलेलं हे दान ती कसा पेलणार हा प्रश्न सतत तिच्या नजरेत मला जाणवत होता. या वयात तिला लेकीच वैधव्य बघण्याचा योग आला होता. ती बोलत नव्हती पण तिच्या नजरेतील सुन्न पणा काळीज पिळवटून टाकत होता. कारण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ती मला सावरण्याला मदत करू शकत होती. पण त्या पलीकडे हि माझीच लढाई होती आणि ती लढण माझ्याच नशिबात होत . 
खरच नशीब या शब्दावर या आघातापर्यंत आपण खरच विश्वास ठेवत नव्हतो. पण आता अस वाटत कि खरच नियती नावाची कुणी एक अज्ञात शक्ती  आपली परीक्षा पाहायला  समोर येऊन ठाकली होती. आणि आता तिला समोर जाण मला क्रमप्राप्त होत. कारण  वेळ हातपाय गळून बसण्याची नव्हती, तर उठून उभ राहून समोर आलेल्या परिस्थितीला हिमतीने तोंड देणे गरजेच होत. 
सर्वात प्रथम आर्थिक बाजूचा विचार, आणि शर्वरीच शिक्षण पूर्ण करून समरच स्वप्न वास्तवात आणण्याचा, केला मी . सर्व मिळकत आणि जमा रकमांचा अंदाज आणि समरच्या ऑफिस मधून मिळून शकणाय्रा प्राप्तीचा विचार करून मी कामाला लागायचा ठरवलं . मला प्राप्त परिस्थितीला तोंड देण आणि धैर्याने परत उभ राहणं हि पहिली निकड होती . 
या सगळ्यात मी माझ्या सासूबाईंचा आणि त्याच्या मनस्थितिचा विचार आता पर्यंत केलाच नव्हता आणि मी एकदम भानावर आले. कारण त्यांच्या साठी तर त्यांचा कर्ता सवरता तरुण मुलगा अचानक गेल्याचा आघात होता. त्यामुळे आम्हीच एकमेकीना साथ देत आयुष्य पुढे नेण्याचा विचार एकत्र, पण न बोलता, केला आणि कामाला लागलो. कधी त्या मला धीर देत तर कधी मी त्याचं सांत्वन करत असे ,  एक अजब चक्र सुरु झालं . 

क्रमशः

Comments

  1. कवडसा या प्रदिर्घ ब्लॉग कादम्बरीचा लेखक प्रसन्न आठवले ः जे हि कादम्बरी वाचतात त्याना हि विनंति कि त्यानी क्रूपया आपले मत नोंदवावे जेणे करून मला कळेल कि वाचक प्रतिसाद कसा आहे. हि एक प्रदिर्घ कादम्बरी आहे आणि ति रोज या स्वरूपात ब्लॉग वरच प्रसिद्ध होइल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...