Skip to main content

कवडसा 5

कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु …4……



शीतल समर एक निरागस अल्लड आणि निष्पाप स्वभाव असलेली साधी सरळ मुलगी. आता वयामुळे अल्लड़पणा कमी झाला असला तरी निरागसपणा तसाच टिकून होता .  सश्याच काळीज, जिभेवर साखरेचा गोडवा , बोलण्यातील मार्दव्य , वागण्यातील शालीनता , सोशिकपणा , समरच्या स्वभावाला सजेसा सुस्वभाव हे कळीचे गुण होते 

लहानपणी काहिशी अबोल आणि छोट्या छोट्या गोष्टीत बराच वेळ मन रमवणारी, घरातल्यांच्यापेक्षा आपल्याच विश्वात हरवलेली , फूल , फुलपाखर, पान, वेली यांच्याशी सुद्धा तासनतास गप्पा मारणारी  हे तिचे खास स्वभाव विशेष मोठेपणी टिकून होते.  म्हणूनच मृदुला आणि साक्षी या खास दोनच मैत्रिणी ज्यांच्या जवळ ती आपली मनातील सर्व बोलत असे. 

फुलांमध्ये ह्रुदय असत या विश्वासाने ती केसात फूल माळताना अत्यंत हळूवार पणे माळत असे, किंवा वाहत्या पाण्यात हात घालताना पाण्याच्या प्रत्येक अणूत जणू जीव असतो या जाणीवेने जपून हात घालत असे. आपल्या केसातून सुद्धा हात फिरवताना हळूवार पणे  हात फिरवणारी, कारण आपल्या नाजूक केसांच्या जीवाला देखील धक्का लागेल अशी भीती बाळगून असलेली . 
विश्वाच्या  या अफाट पसाय्रात आपल्या अस्तित्वाचा छोटासा का होईना ठसा उमटवू हां खारिचा आत्मविश्वास तिच्या कड़े होता. सर्वसाधारण माणसाच आयुष्य जे आपल्या वाट्याला आलय ते शांतपणे आणि कुणालाही फारसा त्रास न देता जगण हे जीवनाच साध तत्वज्ञान असलेली एक सोशिक सद्गृहिणी आहे. जरी एक चाकोरिबद्ध जीवन जगलो तरी त्यात आपण आपल्या शैलीने थोड़ तरी वैविध्य आणू शकतो हां ठाम विश्वास तिच्याजवळ होता. आणि तिच्या याच गुणांवर समर फिदा होता ती कॉलेज मध्ये असल्या पासून. दोघे जणू फक्त एकमेकांसाठीच जन्माला आलेत असे दोघांचेही पूरक स्वभाव विशेष होते . ………. 


क्रमशः 



Comments

  1. कवडसा या प्रदिर्घ ब्लॉग कादम्बरीचा लेखक प्रसन्न आठवले ः
    जे हि कादम्बरी वाचतात त्याना हि विनंति कि त्यानी क्रूपया आपले मत नोंदवावे जेणे करून मला कळेल कि वाचक प्रतिसाद कसा आहे. हि एक प्रदिर्घ कादम्बरी आहे आणि ति रोज या स्वरूपात ब्लॉग वरच प्रसिद्ध होइल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...