Skip to main content

कवडसा 4

कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु …3……

समरला जाऊन दोन तीन महिने होतील आता, पण त्या काळात आलेले लोकांचे  अनुभव विलक्षण होते. एका घटनेने लोकांच्या विचारांचा कमकूवतपणा  आणि वृत्तीचा फोलपणा  प्रकर्षाने जाणवू लागला होता. पण मलाही आता उभ राहण गरजेच असल्यामुळे या अश्या वृत्ती आणि प्रवृत्ती समोर येणार हे ध्यानात घेऊनच पुढच्या  आयुष्याला समोर जायचं मी ठरवलं. 
पण चंद्रकांत, समरचा मित्र , जो पूर्वी सहा महिन्यातून एकदा यायचा तो आता एक दिवसाआड यायला लागल्या मुळे मनात शंकेची पाल चुकचुकली . कारण एकटी स्त्री म्हणजे वापरायला मिळालेली वस्तुच जणू हा एकूणच पुरुषी समाजाचा विकृत दृष्टीकोन आणि वृत्ती यांच दर्शन पदोपदी पुरुष्यांच्या नजरेतून जाणवत होत . चंद्रकांत तरी वेगळा कसा असेल. पण एक ना एक दिवस त्याला जागा दाखवण गरजेचच होत. 
एक दिवस तो सकाळीच आला "वाहिनी काही हव असल्यास निःसंकोच पणे सांगा मी कधीही कोणत्याही मदतीला धावून येईन. " मी म्हणाले "भाऊजी तुम्ही नका तसदी घेत जावू मी स्वत खूप खंबीर आहे.  शिवाय माझे दीर जाऊ आशुतोष आणि मनाली अखंड आहेत मला.  तुम्ही माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या घराकडे लक्ष दिलत तर बर होईल . "  या नंतर मात्र चंद्रकांत परत कधीही माझ्या वाटेला गेला नाही . 
दुसरा सर्वांत महत्वाचा टप्पा होता शर्वरीला मानसिक दृष्ट्या उभारण . आणि त्यामुळे मी कोणताही आड पडदा न ठेवता तिला सोप्या भाषेत सर्व सत्य परिस्थिती समजावली तसेच  तुला माझी आणि मला तुझी गरज किती नितांत आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न केला . तिला कितपत समजल ते माहित नाही पण तिला एक कळल होत कि आता कायम आपण दोघीच असणार एकमेकीना आयुष्यभर इथून पुढे . 
तिसरा टप्पा म्हणजे माझ्या नाचाच्या क्लासची काहीशी विस्कटलेली घडी पुन्हा बसवणं . ते पुन्हा सुरु करण माझ्या मानसिक उभारी करता गरजेच होता . मधल्या काळात आशुतोष आणि मनाली अनेक वेळा येउन गेले. मला म्हणाले कि कधीही काहीही लागल तर आम्ही आहोत पाठीशी. मी म्हणाले कि तुमचा  हा आधार मला विश्वास देणारा आहे पण हि आता माझी लढाई आहे आणि इथून पुढे आयुष्यभर ती मलाच लढण गरजेच आहे आणि संकटांना तुम्ही जितके घाबराल किंवा टाळाल तेवढीच ती तुम्हाला घाबरवतात म्हणून मी ठरवलंय किं आपणच संकटांसमोर ताठ मानेनं उभा ठाकायच बघू किती दिवस टिकतात . तसे ते दोघेही एकदमच  हसून म्हणाले "All the best but we are with you always " मी पण म्हणाले " yes I also need your support wherever I feel necessary " ………

क्रमशः

Comments

  1. कवडसा या प्रदिर्घ ब्लॉग कादम्बरीचा लेखक प्रसन्न आठवले ः जे हि कादम्बरी वाचतात त्याना हि विनंति कि त्यानी क्रूपया आपले मत नोंदवावे जेणे करून मला कळेल कि वाचक प्रतिसाद कसा आहे. हि एक प्रदिर्घ कादम्बरी आहे आणि ति रोज या स्वरूपात ब्लॉग वरच प्रसिद्ध होइल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...