Skip to main content

।। नामस्मरण ।।


।। नामस्मरण ।।


आपण सकाळी कोणालाही अनेक प्रकारांनी सुप्रभात  संदेश पाठवतो त्याला अनुसरून सुचलेल्या चार ओळी . 


एक चांगला संदेश 
जणू देवाचा आदेश 
करो सुख प्रवेश 
घरी तुमच्या स्ववेश 


सुख हे अनेक प्रकारांनी आपल्या घरात , बुद्धीमध्ये ,  मनात,  हृदयात , अंतरात्म्यात प्रवेश करत. सुख म्हणजेच एक प्रकारे आनंदाचा झालेला मूर्त अविष्कार . या आनंदाचे अनेक प्रकार आहेत. जे एखाद्या प्रसंग रूपाने , व्यक्तीरूपाने , वा अन्य मार्गाने आपल्या आत मध्ये प्रवेश करतात आणि एक नाद उत्पन्न करतात आपल्या मनामध्ये . तो नाद किती काळ टिकतो हे त्या आनंदाच्या प्रकारावर अवलंबून असत. 

आनंद कोणत्या स्वरूपातून प्रकट झालाय यावर त्याचा नाद किती काळ टिकणार हे ठरत . जस ऐहिक गोष्टीं  पासून मिळणारा आनंद हा काही काळ  टिकणारा असतो . एखादी आलेली आनंदाची बातमी , एखादी नवीन घेतलेली वस्तू  , नवीन घेतलेली गाडी , जागा , पर्यटन स्थळाला देलेली भेट, घरातल्यांच्या शैक्षणिक यशा  संबंधातील छान बातमी, एखाद  छान संगीत , इत्यादी सर्व एक ठराविक काळ आनंद देतात . 

मग प्रश्न येतो तो चिरकाल टिकणारा आनंद कसा प्राप्त होऊ शकतो . असा आनंद फक्त भौतिक जगा पलीकडील गोष्टीं पासूनच मिळू शकतो आणि याच साठी संत महंतांनी अनेक मार्ग सांगितलेले आहेत. यात सर्वात महत्वाचा साधा मार्ग जो ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी सांगितलाय तो म्हणजे नामस्मरण. यातून सध्या होणारे परिणाम :

१. मनाची स्थिरता 
२. चित्ताची शुद्धता 
३. स्वत्वाची जाणीव 
४. परोपकार आणि सामाजिक बांधिलकीची जागृती 
५. सर्व प्राणीमात्रांविषयी प्रेम आदर 
६. परम तत्वाविषयी भक्ती भाव 
७ विषया पासून परावृत्ती 
८ चिरकाल टिकणार्या आनंदाची अनुभूती 
९. जाणीवे पलीकडील गोष्टींची प्रचीती 
१० भौतिक जगाविषयी तटस्थता 
११ विवेकाची उत्पत्ती आणि स्थिरता 
१२ आत्मानुभती 

संतांनी सांगितलेल्या सर्व मार्गातून मिळणारा सात्विक,  चिरस्थायी , आनंदाचा अनुभव हा तुलनेने अत्यंत सोप्या वाटणार्या पण आचरणात आणायला कठीण असलेल्या अश्या नामस्मरण या मार्गाने मिळतो . 

शब्द : ब्रम्हचैत्न्यांचे                                                                  लेखनिक : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...