Skip to main content

मनोगत - दामोदर राव पुत्र राणी झाशी यांचे


मनोगत - दामोदर राव पुत्र राणी झाशी यांचे 

नमस्कार, आज मी खास तुमच्याशी बोलायला आलो आहे. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि मी कोण . तर सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देतो . तर आम्ही दामोदर राव . आम्ही म्हणजे मी . काय जुन्या सवयी लवकर जात नाहीत . आता या काळात स्वतःला आम्ही म्हणणारे कोणीही नसतील.  पण पूर्वी खास करून राजे आणि त्यांच्या परिवारातील सर्व  स्वतःला आम्हीच म्हणत असत.  असो. काळ बदललाय म्हणून आम्ही मी ने सुरवात केली . तर आता प्रश्न पुढचा दामोदर राव कोण. आपल्या पैकी काही जणांनी नक्कीच ओळखल असेल. दामोदर राव म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा दत्तक पुत्र. तुम्हाला हासुद्धा प्रश्न पडेल की आता इतक्या वर्षानंतर काय बोलायचं  आहे .  ऐका म्हणजे कळेल . 

मी मूळ  आनंदराव.  पण राणीसाहेबांनी मला दत्तक घेतल आणि माझ नाव दामोदरराव झाल . आपण इतिहासाच्या पुस्तकात माझा संदर्भ राणी लक्ष्मीबाई यांच्या धड्यात वाचला असेल. बरोबर तोच मी. आता नमनाला घडाभर तेल झाल्यानंतर मूळ विषयाला हात घालतो .   

आज इतक्या वर्षानि सुद्धा व्यस्थित आठवतोय तो काळ १८५३। ५४ चा संघर्षाचा. प्रत्येकाच्या डोळ्यात फ़क्त एकच स्वप्न होत आणि एकच आग ब्रिटिशांविरुद्ध . त्यातलाच एक संघर्ष मी पाहिलाय, नव्हे अनुभवलाय. अर्थात प्रत्यक्ष संघर्षाच्या वेळी मी खुपच लहान  होतो.  पण नंतर जे जाणवल तेच मनातले सर्व विचार तुमच्या सामोर मांडतोय. 

मला ज्यावेळी उमगल तेंव्हाच्या भावना शब्दात व्यक्त करण खूप कठीण आहे . मला हां आनंद म्हणून मांडता आला नाही किंवा व्यक्त करता आला  नाही कधीच , की मी,   साक्षात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा दत्तक का होईना पण  पुत्र आहे.  कारण  हां आनंद मनात येतोय त्यातच माझी माता, माझी आई,  आज हयातच नाहिये. हा विचार मनात आधी दुःख आणि नंतर संताप , चीड,  राग,  ब्रिटिशां विरुद्ध निर्माण करत असे .   

त्यांचा,  क्षमा करा,  तिचा विचार मनात आला की असंख्य भाव भावना मनात येतात ती एक  आई होती,  माझी  आई,  जीने तीन वर्षात मला कधी पोटाशी धरल असेल अस वाटतंय का. म्हणजे नसाव हे मी उद्वेगाने म्हणत नाहिये. कारण ती विश्व माता होती ,   जगत जननी,  साक्षात आदिशक्ती रूपिणी . तिला आपल्या या पुत्राला कधीतरी पोटाशी कवटाळता आला असेल का. आणि हि माझीच नाही तर कोणत्याही सर्वसामान्य पुत्राची म्हणजेच मुलाची इच्छा असते.  अर्थात ती सर्वसामान्य माते कडून . माझी आई हि एक असामान्य माता होती. नव्हे आजवरच्या इतिहासात अशी माता संपूर्ण विश्वात झाली नसेल आणि होणार नाहि. 

विचार करा स्वताच्या पुत्राचा मृत्यू ,  तो पुत्र ,  अवघा  चार महिन्याचा असताना झालेला. त्याच दुःख व्यक्त करण्याच स्वातंत्र्य , इच्छा असूनही एका असामान्य स्त्रीला मिळाल  नसेल . कारण तिच्या चेहर्या कडे लाखो जणांचे डोळे लागलेले असावेत.  आणि हे जीला माहित होत अश्या त्या  स्त्रीला,  ती एक स्त्री असूनही आपल्या पुत्रवियोगाच दुःख कस व्यक्त करता आला असेल . कल्पेनेपलीकडील गोष्ट आहे. तुमच्याच नाही माझ्या सुद्धा . ते कमी म्हणून ब्रिटीश सत्तेचा सततचा दबाव , एक टांगती तलवार . राज्य खालसा करता याव म्हणून . एका भयानक संघर्षाची सुरवात होण्याचा तो काळ . साधारण १८५१ ५२ चा . 
त्यातच मला म्हणजे नात्यातल्या एकाला दत्तक घ्यायचा निर्णय. त्याला ब्रिटिशांचा असलेला विरोध . आणि म्हणून राज्य ताब्यात घेण्यासाठी ब्रिटीश अधिकारी १८५४ मध्ये ६०००० फौज घेऊन निघाले  आणि त्याच त्यांच्या आदेशाला  राणीने दिलेल ते करारी  उत्तर . हो तेच " मेरी झांसी नही दुंगी ". युद्ध अटळ . ब्रिटीश राज्यात घुसले. राणी एका हातात ढाल , दुसय्रा हातात  तलवार  आणि घोडीचा लगाम चक्क तोंडात पकडून , मागे पाठीशी दामोदर राव , म्हणजेच मला  , घेऊन निघाली . किल्ल्याच्या बुरुजावरून उडी मारून निघाली. आणि तिच्या मागून मी तिच्या डोळ्यातील ती आग प्रत्यक्ष पाहिली आहे . 
त्या नंतर  संघर्ष,  सतत,  ब्रिटीश सत्ते विरुद्ध,  लढाया,   यासर्वातच  राणीचा सर्व वेळ आणि काळ  गेला. मला मनात असूनही कधी तिच्या कुशीत शिरता आल नाही आणि तिची इच्छा असूनही मला कधी ती उराशी कवटाळू शकली नाहि. कारण तिच्या आत्म्यात सतत , तिच्या राज्याचा , या देशाचा , विचार . मनात भाव नसतील अस मी कस काय  म्हणू. कारण ती पण एक माता होति.  . पण ते तिला कधी व्यक्त करता आले नाहित. म्हणजे तसा वेळच तिला मिळाला नसेल.  मी प्रत्यक्ष आईला कधी बिलगून रडू सुद्धा शकलो नाहि. कधी हट्ट  करून शकलो नाहि. की काही मागू शकलो नाहि. आणि तिची इच्छा तिला कधी पुर्त करता आली नाहि. तिचा जन्मच मुळी  या देशासाठी होता. अश्या असामान्या मातेचा नव्हे जगन्मातेचा दत्तक पुत्र म्हणवून घेण्यासाठी का होईना माझा जन्म झाला हे खरतर माझ परम भाग्य. ही अशीच व्यक्त आणि अव्यक्त प्रेमाची कथा आणि व्यथा आहे . 
असो आज इतक्या वर्षानंतर मला माझ्या मनातील भाव भावना तुमच्या समोर व्यक्त करता आल्या. खूप बर वाटल . आणि तुम्ही ते ऐकून घेतलत हे पाहून त्याहून  बर वाटल . चला आता रजा घेतो . काळजी घ्या  आणि … 

जय हिंद 
प्रसन्न आठवले



Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...