Skip to main content

कवडसा 13

कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  

कहाणी एका संघर्षाची सुरु …१३……

शीतल खुप वेळ झोपूनच होती आणि आशाताई तिच्या जाग होण्याची वाट बघत होत्या .  तासाभराने डॉक्टर साठे पुन्हा,  येऊन बघून गेले आणि आशाताईना म्हणाले, 

डॉ : तिला अजून तासा दीड तासाने जाग येईल त्यावेळी नर्सला बोलवा.  मी येतो आता.  
आशाताई : हो डॉक्टर तुम्ही आहात हा  खूप आधार आहे आम्हाला .  
डॉ फ़क्त हसतात आणि आपल  एक बोट वर दाखवातात . जाताना नर्सना आवश्यक सूचना देतात आणि निघतात.  
आशाताई एक्ट्याच् खोलीत असतात आणि शीतल शांत निजलेली. किती गोड दिसताय माझ लेकरु आणि किती निरागस. इतके आघात सोसूनही ही इतकी निरागस आणि निष्पाप कशी काय हे एक आश्चर्य आहे. एवढ्या कमी वयात इतका मोठा आघात पचवून पुन्हा उभ रहाण सोप्पी गोष्ट  नक्कीच नाही.    हीचं  पूर्व सुकृत म्हणून हे घडणार होत आणि म्हणून देवाने असा स्वभाव दिला हिला . कारण भोग पचवायला सुद्धा तस काळीज असाव लागत . आणि ते माझ्या लेकिला जन्मापासून मिळालय . लहानपणी सुद्धा किती  लागल तरी फार त्रास दिला नाही कधी.  तिन्ही भावंडांच्यात ही खूपच समंजस . कधीही कोणत्याही गोष्टीसाठी आग्रह नाही की हट्ट नाही . जे मिळेल त्यात समाधान.  आपल्याला त्या वेळी याचा अर्थ कळला नव्हता.  पण आता उमगतोय. कारण दुःख आणि भोग हे पूर्वकर्माने येतातच, पण ते  पेलण्याची ताकद आणि सहन करण्याची शक्ति असण हीच देवाच्या अस्तित्वाची खूण असावी . 
आशाताई असा  बराच वेळ विचार करात होत्या आणि अचानक बाहेर लगबग आणि गड़बड़ ऐकू आली म्हणून त्यानी शीतल कड़े एक नजर टाकली ती शांत झोपलेली पाहुन त्या बाहर गेल्या. बाहेर एका माणसाला स्ट्रेचर वरुन नेत होते.  एक मध्यम बांध्याचा गोरा दिसायला खुप सुन्दर आणि नाकी डाळी नीट असलेला असा तो होता. आशाताई ना त्याचा चेहरा स्पष्ट दिसला. खरच दिसायला खूप छान आणि चांगला सुशिक्षित वाटत होता.  तेवढ्यात आशाताईनी एक मुलाला विचारल काय झालय.  तो म्हणाला, अहो काकू हा कोण ते माहीत नाही,  पण हॉस्पिटलच्या बाहेरच याचा एक्सीडेंट झाला एका ट्रकने याच्या बाइकला  उडवलय. एवढा बोलूंन तो पटकन त्या स्ट्रेचरच्या मागे निघुन गेला 
बाहर बराच वेळ माणसांची लगबग ऐकू येत होती. 


क्रमशः 

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...