Skip to main content

Posts

Showing posts from May, 2023

अध्यात्म विराम १८८

अध्यात्म विराम १८८ ज्ञान माणसाला सत्य आणि मिथ्या, योग्य व अयोग्य, अती आणि संयत, अनावर आणि नियंत्रण यातील फरक मुख्यतः जाणवून देतं. ज्ञानाने कृती किंवा कर्म योग्य पद्धतीने घडेल, ही शक्यता पूर्ण ठामपणे जरी सांगता आली नाही तरी, ज्ञानाने मनाचे चक्षु नक्कीच उघडतात आणि त्याने कार्य करण्याची, जग वेगळ्या नजरेने पाहण्याची दृष्टी प्राप्त होते. अर्थात दृष्टी आली म्हणजे कार्य घडेल किंवा योग्य कृती होईल, याची शक्यता असेलच हे विश्वेश्वर सुद्धा सांगू शकणार नाही.  पण जाणिवेची केंद्र जागृत होतात. बरेच वेळा एखादी नवीन माहिती, आपल्याला मिळाल्यावर, आपण म्हणतो अरे हे तर माहीतच नव्हतं. अर्थात माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, हे इथे मुद्दाम स्पष्ट करू इच्छितो. तर माहिती म्हणजे फक्त ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग. खरं ज्ञान हे ते जे मनाला, मनातील जाणीवेच्या केंद्रांना आणि त्याद्वारे मनःचक्षुंना योग्य आणि अयोग्य हा सारासार विचार करण्याची किल्ली मनाला प्राप्त करून देतं. असा सारासार विचार करायची दृष्टी मनाला प्राप्त झाली की, हळूहळू, त्या मार्गावर नियमित चालताना, विवेक जागृत होतो. विवेक हा सारासार विचार आणि योग्य दृष्टी य...

अध्यात्म विराम १८७

अध्यात्म विराम १८७ कालच्या विषयाला पुढे नेऊया. विवेक म्हणजे योग्य अयोग्य याची जाण आणि सारासार विचार. पण हा विवेक अनेक प्रकारचा असतो. व्यावहारिक विवेक हा व्यवहार ज्ञान,अनुभव इत्यादीं मुळे जागुत होतो व अभ्यासात, कार्यात असलेल्या व्यक्तींचा व्यावहारिक विवेक तोपर्यंत जागृत राहतो. म्हणजेच हा ज्ञान आणि अनुभव म्हणजे कर्म या दोन मार्गांनी जागृत करता येतो. व्यावहारिक अनुभव व्यक्तीला व्यावहारिक विवेक जागृत करून देतो. त्याच्या उपयोगाने मनुष्य उत्तम व्यवहारी होतो आणि असतो. खूप वेळा आपण काही व्यक्तींना खूप लहान वयात उत्तम व्यवहारी व्यक्ती म्हणून ओळखतो किंवा जाणतो.  पण या विवेकाचा फक्त व्यवहाराशी अर्थात जगताशी संबंध असतो. तो उत्तम धन, ऐश्वर्य व व्यावहारिक कीर्ती प्राप्त करून देऊ शकतो. अश्या व्यक्तीकडून अविवेकी वागणूक व्यवहारात सहसा होत नाही. पण हा एक विवेक झाला. या शिवाय नाते संबंध आणि व्यक्ती व्यक्ती मधील संबंध या बाबतचा विवेक सुद्धा असतो. अश्या व्यक्ती व्यवहार उत्तम करू शकतील की नाही ते सांगता येणार नाही. पण संबंध स्थापित करणं, त्याची जोपासना करणं आणि त्यांना कायमस्वरूपी सांभाळणं हे काम अश्या...

अध्यात्म विराम १८५

अध्यात्म विराम १८५ म्हणजेच माया प्रत्येक घडलेल्या कर्माचा हिशोब पूर्ण करण्या साठी, योग्य ते कर्म घडवून ईश्वराच्या कर्मफल न्यायाला कार्यरत ठेवून, एकप्रकारे ईश्वराचं निर्मितीचं, पालनकर्त्याचं आणि लयकर्त्याचं कार्य अविरत सुरू ठेवते. म्हणजे यातून थोडासा गोंधळ किंवा गुंता मनात व विचारात होऊ शकतो. तो असा की,जर माया आपल्याला कर्म प्रवृत्त करून कर्म घडवून घेत असेल तर, आपण काय करतो आणि आपणच ते का भोगतो. इथे एक एक मुद्दा विचारात घेऊन पुढे जाऊ, म्हणजे हा विचारांचा तिढा सैल होईल आणि विषय ध्यानात येईल.  माया ही अनेक अंगांनी अनेक गोष्टी घडवत जाते. त्या एकेक पाहूया. मुळात माया जीवाला कर्मबद्ध करते, कर्मात गुंतवून ठेवते. त्यासाठी परिस्थिती, मती व मनः स्थिती यांचा उपयोग भ्रम निर्माण होण्यासाठी करते. किंबहुना आपण बघितल असेल की ज्यावेळी पडता काळ येतो,त्यावेळी विपत्ती आणि आपत्ती अनेक मार्गांनी येतात. मती कुंठीत करून, चुकीचे निर्णय व कर्म घडवून घेऊन, पुन्हा त्याची फलरुप निष्पत्ती भोगायला भाग पाडते. आता यांमधे मायेचा उपद्व्याप किती आणि आपली कर्मगती किती, हे अवघड गणित सोडवणं महाकर्मकठीण काम आहे.  आ...

अध्यात्म विराम १८६

अध्यात्म विराम १८६ माया काय करते हे आपण पाहिलं. आता आपण या सर्वात काय करतो याचा विचार करूया. मुळात माया फक्त कार्यकारण भाव आणि कर्ता यांना जवळ आणते. मनात भाव निर्माण झाला की माणसाला एखादी वस्तू, वास्तू, व्यक्ती किंवा गोष्ट हवी अशी इच्छा जागृत होते. त्यानंतर मन बुद्धीला, बुद्धी देहाला आणि देह इंद्रिय व अवयव यांना कार्याला जुंपतात. जुंपणं यासाठी म्हटलं की, एकदा एखादी वासना निर्माण झाली की ती इच्छेच्या केंद्रांना उद्दिपित करते. मग माणूस कर्मरत होतो. कर्म करतो किंवा करून चुकतो आणि मग फलाची बीजं पेरली जातात. आता यातील मायेचा खेळ इतकाच की ती फक्त वासना, इच्छा, ओढ, आकस, मत्सर, द्वेष, क्रोध, काम इत्यादी मनातील सुप्त भाव भावना जागृत करण्याचं काम करते. यात फक्त हा शब्द यासाठी वापरला की, इतर प्राणी आणि मनुष्य यामधे जो मूलभूत भेद, ईश्वराने निर्माण करून ठेवला आहे, तो म्हणजे माणसाला बुद्धी, मन आणि मनात इतर भावांप्रमाणे सुप्त असलेला विवेक, ही अतुलनीय ईश्वरी देणगी दिलेली आहे. म्हणजेच मायेचा खेळ हा तुमच्या मनात जागृत भावातील, योग्य कोणते आणि अयोग्य कोणते, हे मनातील विवेक ठरवू शकतो. हा विवेक मनाला स्तब्...

अध्यात्म विराम १८४

अध्यात्म विराम १८४ ईश्वराने जग निर्मिती करताना काही मूलभूत नियम किंवा तत्व स्थापित करून ठेवली आहेत, हे आपण मागील भागात पाहिलं. त्यातील एक कर्म हे देखील आपण पाहिलं. यातूनच पुढे येणार तत्व म्हणजे जसा भाव असेल तसाच प्रतिसाद प्राप्त होईल. कारण कर्म हे काया वाचा मन आणि बुद्धी यांच्या मार्फत केलं जातं. म्हणजेच मनातील प्रत्येक विचार हे एक एक कर्म आहे आणि ते आपला प्रतिसाद घेऊनच परत येणार. ही गोष्ट मनात एकदा ठसली की, खरतर माणसाला चुकीचे विचार, काम्य भाव, अती क्रोध भाव जागृत करणारे विचार, दुसऱ्यासाठी नुकसान कारक भाव, विचार व इच्छा येता कामा नये. कारण मी मान्य केलं किंवा नाही केलं तरी कर्माच्या आधीन असलेल्या, ईश्वराच्या या मर्त्य जगतात, भावानुसार फल प्राप्ती हे निर्विवाद सत्य आहे. म्हणजेच जे सत्य आहे, नित्य आहे आणि चिरंतर आहे तेच शाश्वत आहे. हे दुसरं तत्व जे या कर्म तत्वापासून प्राप्त होतं. झाकता येईल, दडपता येईल, काही काळ भ्रमित करता येईल पण अंती किंवा एका क्षणी जे सत्य आहे,तेच बाहेर येणार. याचाच एक अर्थ असा की कर्म आणि हे सत्य ही दोन शाश्वत आणि एकमेकांना पूरक तत्व आहेत. किंबहुना कर्म जे केलं अस...

अध्यात्म विराम १८३

अध्यात्म विराम १८३ ईश्वरी व्यवस्था हा या जगताचा आत्मा आहे.या आत्म्याचा शोध घेतला की, आपण त्या व्यवस्थेच्या माध्यमात आपोआप पुढे पुढे जातो किंवा जाऊ शकतो. प्राण म्हणजे काय आणि त्याचा हिस्सा होण्यासाठी काय करावं, यावर आज, चिंतन करूया. ईश्वराने काही तत्व मूळ स्वरूपात या जगतात स्थापित केली आहेत. ती या जगतात स्थापित राहतील याची पूर्ण काळजी,स्वतः ईश्वर घेतो आणि या व्यवस्थेत बाधा आणणारी तत्व, व्यक्ती ही नष्ट होतील,यासाठी प्रयत्नशील असतो.या मूळव्यवस्थेची तत्व आहेत,ती या ईश्वराने वेळोवेळी जगताला सांगितली आहेत. आता एक एक करून त्यावर चर्चा करूया.  यातील पाहिलं तत्व जे कधीही नष्ट होऊ शकत नाही, ते म्हणजे सर्व काही कर्माधीन आहे. कर्म हेच श्रेष्ठ आहे. या एका तत्वाच्या अंतरात, अनेक उपतत्वांचा जन्म झाला आहे. मुळात कर्म श्रेष्ठ म्हणजे काय तर हे कराल त्याचंच उत्तर समोर येऊन उभं राहील. म्हणजे जे कर्म पेराल, तेच फलरुपात उगवेल वा जसा कर्माचा चेंडू फेकाल, तसाच तो समोरून फलरुप परत तुमच्या कडे येईल. आता याचा गाभा म्हणजे,काया वाचा बुद्धी मन या कोणत्याही मार्गाने केलेलं कर्म हे त्याचं स्वरूपात पुन्हा आपल्या ...

अध्यात्म विराम १८२

अध्यात्म विराम १८२   कालचाच विषय पुढे नेऊया. मुळात हा मानवी देह फक्त आणि फक्त भोग / उपभोग यातून पुढे जाऊन, ईश्वराच्या मूळ निर्गुण स्वरुपाकडे जाण्यासाठीच निर्माण केला आहे. त्याचसाठी या देहात दहा इंद्रिये, अनेक अवयव, वाचा, त्यामधे वाणी, बुद्धीसाठी खाद्य ज्ञान, श्रवणासाठी श्रुती, त्यांनी ऐकलेलं मेंदूपर्यंत पोचण्याची व्यवस्था, त्याचं पृथक्करण आणि विश्लेषण करून आकलन करून देणारा मेंदू आणि त्यात बुद्धीची पटलं, त्या बुद्धीने उमज लेलं समजून, त्याचे योग्य ते भाव, अंतरीच्या आत्म्याला समजावेत यासाठी मन व त्या मनात जाणीवा, इतकी सर्व, संगणकापेक्षा गुंतागुंतीची व्यवस्था, ईश्वराने किती खुबीने, व्यवस्थित स्थापित करून, काळाच्या कोणत्याही पटलावर स्थिर व टक्कर देऊन राहण्यासाठी निर्माण केली आहे. या व्यवस्थेची निर्मिती करताना, ईश्वराला फक्त एकच विचार ज्ञात असेल असं म्हणता येणार नाही. याच मनाने, योग्य व अयोग्य, चुकीचे व बरोबर, सकारात्मक व नकारात्मक असे परस्पर भिन्न भाव प्रकट करून, त्या भावा नुसार वागण्याची मुभा दिली. खरतर यातूनच लोक शाहीची कल्पना येऊ शकते. कुठेही कसलीही घटना नाही, कायदा नाही की न्याय नाह...

अध्यात्म विराम १८१

अध्यात्म विराम १८१ गुणातीत ईश्वर, केवळ आणि केवळ आपल्या संकल्पने तील विश्वाला, आपल्या स्वरूपाचं ज्ञान व्हावं आणि उत्तम गुण प्रकृतीच्या लोकांना, आधार वाटावा आणि अधम व नीच अव गुण प्रवृत्ती धारण करून वावरणाऱ्या पापी जनांना धाक वाटावा, यासाठी गुणात किंवा सगुणात प्रकट होऊन, आपली लीला दाखवतो. तो एक प्रकारचा खेळ असतो. ज्याप्रमाणे आपण आपल्या लहान मुलांना काही बाबतीत आपल्या प्रेमाचा आधार देतो आणि काही बाबतीत बागुलबुवाचां धाक दाखवतो, त्याचप्रमाणे ही ईश्वरी लीला, या विश्वात असणाऱ्या सर्व जडजीवात अती प्रगत व मन,बुद्धी, अनेक इंद्रिये व अवयव असलेल्या आपल्या मानवी लेकरांना गुणात प्रकटून आपली शक्ती व ऊर्जा यांचा प्रत्यय तो ईश्वर देतो.  हा प्रत्यय आणि प्रचिती नित्य निरंतर आणि श्वासा श्वासाला आपल्याला प्रत्ययास येते किंवा येऊ शकते.मात्र त्यासाठी दृष्टीची नितांत आवश्यकता असते. ती दृष्टी, ईश्वराच्या व सद्गुरूंच्या कृपेने व प्रेरणेनेच प्राप्त होते. अशी कृपा व प्रेरणा तेंव्हाच प्राप्त होते, जेंव्हा आपण नित्य त्या लहरी व संकेत यांच्या सानिध्यात आणि संपर्कात राहू. अशी स्थिती येण्यासाठी आपण नित्य आपल्या मना...

अध्यात्म विराम १७८

अध्यात्म विराम १७८ सनातन धर्मच नव्हे तर जगातील कोणत्याही धर्मात, जर असं सांगितलं गेलं असेल किंवा सांगितलं जात असेल की, आमचा देव तुम्हाला समस्या मुक्ती देईल आणि तुम्ही सुखी व समस्या मुक्त जीवन जगाल, ते हे थोतांड आहे, याचा बोध मनात धरून ठेवा. कारण जगरहाटी अशी आहे की, समस्या, दुःख, चिंता नाहीत अशी एकही जागा या जगतात नाही. आपण याच जगताचा हिस्सा आहोत आणि असणार. जर आपण असा विचार केला तकी, खूप पैसा आला की, खूप सुख येतं किंवा मिळतं, तर ही भ्रामक कल्पना आहे. कारण जो पैसा जसा येतो, तसेच त्याचे परिणाम सोबत घेऊनच येतो.हे विश्वातील कोणत्याही धर्माचा तारक, प्रचारक वा ईश्वराचा तथा कथित प्रतिनिधी सुद्धा बदलू वा टाळू शकत नाही. यावर उपाय काही असेल तर, त्यासाठी आपली मानसिकता बदलणे आणि आपली साधना, श्रद्धा व भक्ती वाढवत नेणे. विश्वाला संचालित करणाऱ्या त्या शक्तीने आपल्या पद्धतीत, तत्वात व नियमात, काळाच्या इतक्या मोठ्या परिघात एका अंशाचा सुद्धा बदल केलेला नाही. जे अश्या प्रकारच्या विशिष्ट धर्माच्या प्रचाराला सहजी बळी पडतात, त्यांनी हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पूर्णावतारी प्रत्यक्ष श्रीकृष्ण भुलोकि असताना ...

अध्यात्म विराम १८०

अध्यात्म विराम १८० सद्गुरू म्हणजे ईश्वराचं प्रतिरूप किंवा इंग्लिशमधे ज्याला reflection म्हणतात ते असतं. ईश्वर हा कृपेचा, दयेचा, करुणेचा महासागर असतो. म्हणूनच अनेक संत महंत, ऋषीमुनी यांनी त्या ईश्वराला करुणा सिंधू किंवा करूणार्णव म्हटलं आहे. पण हे फक्त म्हणण्यासाठी आहे की याचा काही दाखला आहे, असा प्रश्न पडू शकतो. याची दोन विरुद्ध टोकाची उदाहरणं देता येतील. एक म्हणजे प्रत्यक्ष आपल्या पत्नीला अशोकवनात, कैदेत ठेवणाऱ्या रावणालासुद्धा, ज्यांनी शेवटची संधी देतो, सीतेला परत पाठव, मी तुला क्षमा करतो, असा निरोप पाठवला, ते श्रीराम दयेचा महासागर होते म्हणून. दुर्बल किंवा भित्रे होते म्हणून नाही.  अन्यथा त्याचं अविजेय रावणाला नंतर, युद्धात सहजी मारून, विजय प्राप्त करते झाले नसते. म्हणजेच आपण सर्वशक्तीमान ईश्वर आहोत आणि आपल्याकडे समस्त जगताचं बल, शक्ती, ऊर्जा, ज्ञान आहे, हे ज्ञात असूनही, त्याचा मद न होता,प्रत्येक जीवाला मनाप्रमाणे जगण्याचा नैतिक अधिकार आहे, हे धर्म तत्व सिध्द करण्यासाठी ईश्वराने आपल्या दयारुप सागराचा,करुणेच्या महा सागराचा आपला अवतार, जगताला दाखवला आहे. म्हणजे खलातील खल पुरुषाला ...

अध्यात्म विराम १७८

अध्यात्म विराम १७८ सनातन धर्मच नव्हे तर जगातील कोणत्याही धर्मात, जर असं सांगितलं गेलं असेल किंवा सांगितलं जात असेल की, आमचा देव तुम्हाला समस्या मुक्ती देईल आणि तुम्ही सुखी व समस्या मुक्त जीवन जगाल, ते हे थोतांड आहे, याचा बोध मनात धरून ठेवा. कारण जगरहाटी अशी आहे की, समस्या, दुःख, चिंता नाहीत अशी एकही जागा या जगतात नाही. आपण याच जगताचा हिस्सा आहोत आणि असणार. जर आपण असा विचार केला तकी, खूप पैसा आला की, खूप सुख येतं किंवा मिळतं, तर ही भ्रामक कल्पना आहे. कारण जो पैसा जसा येतो, तसेच त्याचे परिणाम सोबत घेऊनच येतो.हे विश्वातील कोणत्याही धर्माचा तारक, प्रचारक वा ईश्वराचा तथा कथित प्रतिनिधी सुद्धा बदलू वा टाळू शकत नाही. यावर उपाय काही असेल तर, त्यासाठी आपली मानसिकता बदलणे आणि आपली साधना, श्रद्धा व भक्ती वाढवत नेणे. विश्वाला संचालित करणाऱ्या त्या शक्तीने आपल्या पद्धतीत, तत्वात व नियमात, काळाच्या इतक्या मोठ्या परिघात एका अंशाचा सुद्धा बदल केलेला नाही. जे अश्या प्रकारच्या विशिष्ट धर्माच्या प्रचाराला सहजी बळी पडतात, त्यांनी हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पूर्णावतारी प्रत्यक्ष श्रीकृष्ण भुलोकि असताना ...

अध्यात्म विराम १७७

अध्यात्म विराम १७७ एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा की, जे खरे सद्गुरू आहेत आणि ज्यांना हे पद साधनेने आणि त्यांच्या त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेले आहे, त्यांनी कधीही कोणत्याही गोष्टीसाठी साधक किंवा जनसामान्य यांच्या कडे जाहिरात केली नाही किंवा कोणत्याही प्रकारे प्रसिद्धीसाठी काहीही केलं नाही. हाच खऱ्या सद्गुरुंचा महिमा आहे की, त्यांना मी सद्गुरू आहे, असा कुठेही बोलबाला करावा लागला नाही.त्यांच्या सिद्धिने, साधनेने, तपोबलाने जन सामान्यांना जे अनुभव आले,जी अनुभूती प्राप्त झाली आणि जी प्रचिती मिळाली,त्याद्वारे, लोकां नीच त्यांच्या कार्याची प्रसिद्धी करून, भक्तांची मांदियाळी त्यांच्या मागे आली. म्हणूनच कालचा प्रश्न की सद्गुरू हे करावे लागत नाहीत, तर ते आपल्या सिद्धीने, आपल्या भक्तांना आपल्याकडे खेचून आणतात. म्हणजेच ज्याप्रमाणे डब्यामध्ये गूळ वा साखर आहे, हे मुग्यांना सांगावे लागत नाही, त्याप्रमाणे खऱ्या सद्गुरुंचा पुण्यप्रभाव, भक्तांना आपल्याकडे खेचून घेतो. अनेक सद्गुरू आपल्या सिध्दीने आपल्या भक्तांना आपल्याकडे आणतात. त्यांना कोणाच्या प्रारब्धात भक्तीचा योग, मुक्तीच्या मार्गाची वाट...

अध्यात्म विराम १७९

अध्यात्म विराम १७९   कालच्या भागावर थोडं बोलून मग पुढे जाऊ. काही काही धर्म सध्या आपला प्रसार करण्यासाठी या एका नीतीचा अवलंब करून आकर्षित करतात. पण हा पळपुटा मार्ग आहे. उलट अश्या कोणत्याही धर्मात जाऊन आपला उद्धार झाला असता तर, त्या धर्मातील नव्वद टक्के लोकांना खोटे धंदे करुन, गैरमार्ग वापरून आपला चरितार्थ चालवत बसावं लागलं नसतं.  हे विश्वातील कोणत्याही देशातील त्यांच्या प्रजेकडे पाहिलं की लक्षात येईल.  त्यामुळे अश्या कोणत्याही भूलथापा मारणाऱ्या धर्मातील कोणत्याही व्यक्तीच्या बातांना, बळी पडत असला तर त्याला बळी पडू नका आणि पडू देऊ नका.  कारण कोणताही ईश्वर वा सदगुरू किंवा त्यांचे प्रेषित वा पुत्र हे तुमचा भोग टाळू शकणार नाहीत. त्यामुळे या भ्रमात राहण्याची चूक करू नका. ते पैसा वा जबरदस्ती या जोरावर काही काळासाठी जगाला भ्रमित करू शकतील. पण अंतिम सत्यापासून, तुम्हाला फार लांब नेऊ शकणार नाहीत. ते अंतिम सत्य म्हणजे कर्म भोग श्रद्धा व निष्ठा आणि अंती मोक्ष. त्यांच्या मार्गाने मिळते ती तात्पुरती सुटका. म्हणजेच तात्पुरता भ्रम. यावर उपाय तुमची ईश्वराप्रप्ती साधना, नाम इत्यादी नि...

कैकयी, श्रीराम आणि वनवसाचा फास ! एक चिंतन -२

कैकयी, श्रीराम आणि वनवसाचा फास ! एक चिंतन -२ प्रत्यक्ष श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त काढण्यापर्यंत आणि त्याच्या तयारीपर्यंत गोष्टी आल्या, पण जर हे घडून आलं तर ज्या कार्यार्थ श्रीराम आले, ते कसं घडणारं, हे नियतीच्या लक्षात आलं.एक लक्षात घ्या ही नियती, प्रारब्ध किंवा संचित, हे कधीही अज्ञातात किंवा अदृश्य राहून कार्य करत नाही आणि करू शकत नाही. तर असे नशिबाचे फासे फिरणं किंवा विधीला जे घडावयच आहे, ते घडवायला कोणीतरी देहात असलेली व्यक्तीचं वापरली जाते किंवा वापरावी लागते. अगदी मायासुद्धा एखाद्या देहाच्या वापरातूनच आपले कार्य साध्य करते. किंबहुना अदृश्यात किंवा निर्गुण स्थितीत काहीही होत नाही किंवा होऊ शकत नाही. म्हणजेच श्रीराम, रावणाला मारण्यासाठी घेतलेल्या जन्मात, तीच गोष्ट कशी शक्य आहे, याची जाणीव नियातीला राज्या भिषेकाच्या तयारीच्या वेळीच लक्षात आलं असेल का आणि अशी ही नियती कुणाच्या तरी बुद्धीने, मनाने, देहानेच कार्य करते किंवा करू शकते.  हे जर गृहीत धरलं तर, मी आधी म्हटल्याप्रमाणे अशी व्यक्ती फक्त आणि फक्त कैकयीच असू शकते. एकदा हे मान्य झाल्या नंतर,त्या व्यक्तीला ते कार्य घडव...

कैकयी, श्रीराम आणि वनवसाचा फास ! एक चिंतन -१

कैकयी, श्रीराम आणि वनवसाचा फास ! एक चिंतन -१  माता कैकयी, जिने श्रीराम यांच्यावर पुत्रापेक्षा जास्त माया केली, स्नेह दिला, त्याचं मातेने, प्रभूंना वनवास आणि भरताला राज्य मागितलं. हा खरतर खूप चर्चिला गेलेला भाग आहे. तरीही या विषयात चिंतनातून काही प्रकाश टाकता आला तर बघुया. निव्वळ या विचाराने, आज या विषयावर लिहायला घेतलं.  मुळात एक लक्षात घ्या की, रघुकुल, ज्या कुळात राजा दशरथ, राम यांसह अनेक तत्वशील, विचारशील, आचार शील आणि वचनशील राजे झाले, त्या घराण्यात कैकयी सारखी स्वार्थी आप मतलबी राणी होईल, हे सकृतदर्शनी कोणालाही मान्य होऊ शकणार नाही. इतकी क्षुद्र विचार असणारी आणि जी गोष्ट प्रत्यक्ष आपला पुत्र भरत याला सुद्धा मान्य नसेल, हे जाणणारी व तीच गोष्ट आपण घडवून आणली तरी भरत ती गोष्ट मान्य करणार नाही, याची राणी कैकयी हिला नक्कीच खात्री असणार. राजा दशरथ यांच्या तीनही राण्यांमध्ये विचारी, राज्य कारभार, त्याची तंत्र, बुद्धी व समज जास्त असलेली, राजकारणातील अनेक गोष्टी, बारकावे ज्ञात असलेली अशी एकमेव राणी म्हणजे कैकयी होती. महर्षी वसिष्ठ आणि महर्षी विश्वामित्र यांनी वेळोवेळी या गोष्टीची ज...

अध्यात्म विराम १७६

अध्यात्म विराम १७६   अनेकदा मला प्रश्न विचारला जातो किंवा अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो, ज्याच निश्चित उत्तर सापडत नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळत नाही. जरा यावर चिंतन करूया. सदुगुरू करणं हा मुळातच चुकीचं समज आहे आणि अत्यंत अहं जागृत असल्याचं लक्षण आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. कदाचित कोणाला आश्चर्य वाटेल वा रागसुद्धा येऊ शकेल. पण हे आपल्यातील अहं, ग आणि स्व ज्यावेळी शिल्लक असतो, त्यावेळी माणूस मी हे केलं आणि माझ्याकडून हे झालं अशी भाषा वापरतो. हे कदाचित प्रपंचात खरं असेल, अस एकवेळ गृहीत धरलं तरीही, परमार्थात केलं आणि नाही केलं या अहं मिश्रित भाषेला काहीही अर्थ नाही.  याचं महत्वाचं कारण म्हणजे परमार्थात आपण काहीच करत नाही आणि करू शकत नाही. अन्यथा परम शक्तिवान अर्जुनाला विषाद झाला नसता आणि इतक्या मोठ्या कठीण आणि धर्माची परीक्षा घेणाऱ्या क्षणी, सखा श्रीकृष्ण भगवंतांना, सद्गुरू रूप घेऊन, गीता सांगून, अर्जुनाचा मोह, विषाद व अहं दूर करावा लागला नसता. मुळात अर्जुनाला, भगवंतांनी हे दाखवून दिलं की, तू काहीच करत नाहीस, तर मीच अनेक रुपात प्रकट होऊन, पत्येका कडून, त्याचं त्याचं...

अध्यात्म विराम १७५

अध्यात्म विराम १७५ कालचा विषय पुढे नेताना आपण विचार करूया की, एकदा एक क्षण घेतलेल्या मन:शांतीचा अनुभव नित्य, निरंतर येण्यासाठी काय साधन व सहाय्य आवश्यक आहे. इथे एक लक्षात घ्या मी साधन व सहाय्य असं जोडून म्हटलंय. याचाच अर्थ असा आहे की, साधन आणि सहाय्य हे दोन्हीसुद्धा अत्यंत गरजेचे आहेत आणि परस्पर पूरक आहेत. आता ते साधन म्हणजे नित्य ईश्वर स्मरण अर्थात नामाचं सतत, नित्य आणि अविरत उच्चारण करणं. आता नित्य अविरत म्हणजे काय, तर अक्षरशः श्वासागणीक स्मरण.याचं कारण म्हणजे कोणत्या क्षणी आपल्याला बेसावध गाठून,माया आपल्या मनाचा ताबा घेईल आणि आपल्याला मार्ग भ्रष्ट करेल हे, ईश्वर सुद्धा सांगू शकणार नाही.  म्हणून हे नित्य आणि श्वासासह अविरत स्मरण करत राहणं, याला कोणताही दुसरा पर्याय नाही. मी नाम घेणं या शब्दापेक्षा नामाचं स्मरण करणं हा शब्द योग्य मानतो. याचं कारण म्हणजे, घेणं या शब्दात आणि क्रियेत देहाचा संबंध जास्त येतो. पण याउलट स्मरणात मनाचा संबंध, मनाची एकाग्रता आणि मनाच्या लहरींची एकात्मता ही अपेक्षित आहे आणि तिचाच सहभाग कार्यास येतो. आपण स्मरणात आणा की एखादा जुना मित्र, मागील आठवण किंवा विसर...

अध्यात्म विराम १७५

अध्यात्म विराम १७५ कालचा विषय पुढे नेताना आपण विचार करूया की, एकदा एक क्षण घेतलेल्या मन:शांतीचा अनुभव नित्य, निरंतर येण्यासाठी काय साधन व सहाय्य आवश्यक आहे. इथे एक लक्षात घ्या मी साधन व सहाय्य असं जोडून म्हटलंय. याचाच अर्थ असा आहे की, साधन आणि सहाय्य हे दोन्हीसुद्धा अत्यंत गरजेचे आहेत आणि परस्पर पूरक आहेत. आता ते साधन म्हणजे नित्य ईश्वर स्मरण अर्थात नामाचं सतत, नित्य आणि अविरत उच्चारण करणं. आता नित्य अविरत म्हणजे काय, तर अक्षरशः श्वासागणीक स्मरण.याचं कारण म्हणजे कोणत्या क्षणी आपल्याला बेसावध गाठून,माया आपल्या मनाचा ताबा घेईल आणि आपल्याला मार्ग भ्रष्ट करेल हे, ईश्वर सुद्धा सांगू शकणार नाही.  म्हणून हे नित्य आणि श्वासासह अविरत स्मरण करत राहणं, याला कोणताही दुसरा पर्याय नाही. मी नाम घेणं या शब्दापेक्षा नामाचं स्मरण करणं हा शब्द योग्य मानतो. याचं कारण म्हणजे, घेणं या शब्दात आणि क्रियेत देहाचा संबंध जास्त येतो. पण याउलट स्मरणात मनाचा संबंध, मनाची एकाग्रता आणि मनाच्या लहरींची एकात्मता ही अपेक्षित आहे आणि तिचाच सहभाग कार्यास येतो. आपण स्मरणात आणा की एखादा जुना मित्र, मागील आठवण किंवा विसर...

अध्यात्म विराम १७४

अध्यात्म विराम १७४ आत्ममंदिरात असलेल्या शांत शीतल गाभाऱ्याचा अनुभव, अनुभूती आणि प्रचिती, गाभाऱ्यातील त्या ईश्वराच्या समोर, एक क्षण उभ राहून घेता येते, हे माऊलींनी एका ओवीत सांगितलं आहे. पण भक्ती हा आत्मयज्ञ आहे आणि यज्ञ म्हटला की त्यात आहुती आली आणि आहुतीसाठी समिधा पण आल्याचं. आता या दोन गोष्टींवर चिंतन करूया, म्हणजे माऊलींच्या एका ओवीचा अर्थ किती गहन आहे आणि आपल्याला काय करणं अपेक्षित आहे, हे देखील लक्षात येईल. मुळात यज्ञात अग्नी हा अध्याहृत आहे. हा अग्नी इश्वरावरील प्रेमाचा, आपुलकीचा, स्नेहाचा, श्रद्धेचा, भावाचा आणि विश्वासाचा असावा लागतो.  कारण भक्तीचा पायाच मुळात ईश्वरावर पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण विश्वास हा आहे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वास तेंव्हाच होऊ शकतो, ज्यावेळी आपण आपल्यातील मी, स्व आणि अहं यांचा पूर्ण त्याग करतो किंवा करू शकतो. म्हणजे या आत्मयज्ञात पाहिली समिधा आणि आहुती ही मनातील मूळ स्थित अहं, ग, स्व यांची द्यावी लागते. देवाचीये द्वारी जाणं म्हणजे चित्तशुद्धी आणि आत्मशुद्धी ही प्रथम अपेक्षित आहे. म्हणजे या आत्मयज्ञात आधी आपल्या मनातील अहं, स्व आणि ग यांची आहुती दिल्यानंतर...

अध्यात्म विराम १७३

अध्यात्म विराम १७३ अश्या सततच्या स्मरणाच्या लहरींमुळे,त्या मनात, हृदयात प्रभू स्मरणाची ओढ जागृत होते आणि ती आपलं कार्य करत राहते. ईश्वराच्या स्मरणात प्रचंड शक्ती असते. ती शक्ती प्राणिमात्रांच्या आत्मशक्तीला जागृत करते. या जागृतीमुळे पुढे घडणारं स्मरण हे पूर्ण जाणीवेने, जागृती तून आणि आत्मयज्ञ घडवून आणणारं असतं. या स्मरण यज्ञाने, चुकीच्या कर्मांचे पर्वत नष्ट होतात. जाणिवांची जागृती घडून येते आणि त्यानंतर प्राणी कोणतीही अनिष्ट कृती वा कर्म जाणीवपूर्वक करत नाही आणि अनाव धानाने घडलेल्या कर्मांना ईश्वरी स्मरणाच्या लहरींची शक्ती जाळून नष्ट करते. चित्त शुद्ध होण्याकडे वाटचाल होते आणि चित्तशुद्धी नंतर आत्मशुद्धी घडते आणि आत्मतेज जागृत होतं. अश्या सतत नित्य घडणाऱ्या स्मरणाने, प्राणी एका वेगळ्या सुखाचा, शांतीचा अनुभव घेतो. या शांतीची सवय लागली की, आत्म्याला आलेली जागृती, फक्त स्मरण काळा पुरती न राहता ती नित्य जागृतीत परिवर्तित होते. याचा परिणाम म्हणजे देहाची ओढ, देहाचे चोचले आणि मायेचा भ्रम हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते. जिथे माया हळूहळू पातळ होत जाते तिथे, अनेक दिव्यानुभव येतात.  मनाची श...

अध्यात्म विराम १७२

अध्यात्म विराम १७२ ईश्वरी कृपा इतकी असीम आणि अनंत आहे की, माणसाने क्षणमात्र केलेल्या स्मरणाच्या मोबदल्यात ईश्वर अनंत काळाचं पुण्य प्रदान करतो. पण त्याचं स्वरूप कसं असतं, याचा जरा खोलात जाऊन विचार करूया म्हणजे माऊलींच्या त्या ओवीचा खरा अर्थ ध्यानात येईल. ईश्वर, एक क्षण मनापासून, आत्म्याच्या अंतरंगातून केलेल्या स्मरणाने सुद्धा, जागृत होतो. अर्थात, एखाद्या माणसाने मनापासून घातलेली साद, ईश्वराच्या हृदयात पोचते. याचाच प्रत्यय, द्रौपदी शील रक्षण प्रसंगानंतर श्रीकृष्णाने द्रौपदीला आणून दिला.  या प्रसंगानंतर द्रौपदीने श्रीहरीला प्रश्न केला की अगदी अखेरच्या क्षणी तू धाऊन का आलास, आधीच का नाही येऊ शकलास.यावर एक मंद स्मित करत श्रीकृष्ण म्हणाला की, कृष्णे, माझी तीव्र इच्छा, सुरवातीला येण्याची होती. परंतु, पांडवांनी माझी आठवण सुद्धा काढली नाही. दुर्योधन सुरवातीलाच म्हणाला की माझ्या वतीने फासे शकुनी मामा फेकेल. भ्राता युधिष्ठिर का नाही त्याचवेळी म्हणाले की, मग आमच्या वतीने श्रीकृष्ण फासे फेकेलं. त्याचा अहं असं करण्याच्या आड आला. कारण जर मी फासे फेकले असते तर कृष्णे, चुकीचं दान पडलच नसतं.  त...