Skip to main content

गीत विश्लेषण : गीत ॥ श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणम ॥भाग ४

गीत विश्लेषण :  गीत  ॥ श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणम ॥भाग ४

श्री रामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणं ।
नव कञ्ज लोचन कञ्ज मुख कर कञ्ज पद कञ्जारुणं ॥१॥

कन्दर्प अगणित अमित छबी नव नील नीरद सुन्दरं ।
पटपीत मानहुँ तडित रुचि शुचि नौमि जनक सुतावरं ॥२॥

भज दीनबन्धु दिनेश दानव दैत्य वंश निकन्दनं ।
रघुनन्द आनन्द कन्द कोसल​ चन्द दशरथ नन्दनं ॥३॥

सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अङ्ग विभूषणं ।
अजानु भुज शर चाप धर संग्राम जीत खरदूषणं ॥४॥

इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंजनं ।
मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलदल गंजनं ॥५॥

इथे भजणे याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. 

भ शब्दापासून भगवंत आणि त्याची प्रेमाने आळवणी करणारा भक्त हे शब्द तयार झाले. ज्या क्षणी कल्पनेने परम आत्म्याने  मायारूप जग उत्पन्न केले त्याच क्षणी त्या मायेच्या आधीन राहून आपल्या भक्तीने भगवंतापासून भिन्न झालेला, परम आत्म्याचाच अंश,, भक्तरूपात त्या अभिन्न अंगाकडे अर्थात पूर्ण स्वरूपाकडे जाण्यासाठी आतुर असा भक्तदेखील निर्माण झाला. मुळात फक्त ईश्वर प्राप्ती ही मूळ संकल्पना आणि उद्देश आत्म्याचा आहे. परंतु पंचमहाभूतरुप
 देहात येऊन पंचतत्वरुप जगतात आल्यावर मायापाशात अडकून चक्रात सापडतो.

त्याला त्यापासून मुक्तीचा मार्ग म्हणजे भगवंताला जतन करून ठेवणे, भगवंताला शरण जाणे, भगवंतांला जपणे अर्थात त्याचे नाव घेणे. म्हणजेच भजणे. म्हणूनच अश्या चक्रात अडकलेल्या मनाला गोस्वामी तुलसीदास सांगतात की हे मना अश्या या कृपाळू प्रेमस्वरूप श्रीरामाला भज. 

भज म्हणजे भक्तीपूर्वक जतन करणे. श्रुतीद्वारे त्या भगवंतांचंच नाम ऐकणे, दृष्टीने त्याच्या सगुण रुपाचं दर्शन घेणे, वाचेने फक्त त्याचेच नाम घेणे, मनाद्वारे त्याच्या समीप असल्याची म्हणजेच तो आपल्या समीप असल्याची जाणीव जागृत ठेवणे, सतत त्याचं चिंतन करणे, सर्व चिंता, देहभाव त्याच्या स्वाधीन करणे आणि आपण निश्चीन्त राहणे म्हणजे भजन करणे. 

 मन हे चंचल आहे. सतत चिंता हा मनाचा स्थायी भाव आहे. वाऱ्याचा आवेग, विजेची चपळता आणि चंचलता असलेल्या मनात परिस्थितीनुरूप भय, अस्थिरतेची धास्ती, प्रमादांची आणि त्यांच्या परिणामांची चिंता या सर्व लहरी मनाची अस्थिरता अजून वाढवतात. या सर्व व्यावहारिक चिंता असतात, परंतु या सर्व कर्माधिष्टीत असूनही मन त्याचे परिणाम स्वीकारत नाही. 

याचं महत्वाचं कारण म्हणजे कर्मफल सांगड प्रत्येक कर्मात घालता येतेच असं नाही. किंबहुना आपली चुक असू शकेल हे मन स्वीकारत नाही, ते स्वीकारलं तरी बरे वाईट परिणाम भोगण्याची तयारी नसते. मनुष्य स्वभावाचं वैशिष्ट्य की चांगलं ते माझ्यामुळे आणि वाईट वा मनाविरुद्ध घडल्यास देवाचं लक्ष नाही. 

हा स्वभाव विशेष माणसाला जन्ममृत्युच्या गर्तेत फिरवत ठेवतो. याच बऱ्यावाईट परिणामांची मनाला असलेली भीती, अस्थिर भविष्याची चिंता, सांसारिक विवंचना, मुलाबाळांची काळजी अश्या अनेक चिंता मनाला कमकुवत बनवत असतात. अश्या सर्व चिंतांपासून मुक्त होण्याचा, त्या चिंताचं हरण होण्याचा मार्ग म्हणजेच हे मना कृपाळू, कनवाळु प्रभू श्रीराम यांचं भजन अर्थात स्मरण, चिंतन कर. ते तुझ्या सर्व चिंता हरण करून भवसागरात अर्थात जन्ममृत्युच्या फेऱ्यात सापडलेल्या तुला निश्चित बाहेर काढतील, हा विश्वास ठेव. 

।। श्रीराम जयराम जय जयराम ।।

क्रमशः 

©® संकल्पना आणि लेखक : प्रसन्न आठवले. 
२४/०९/२०२०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...