नशीब वा प्रारब्ध, कर्म आणि नामस्मरण !!! काल बाल्कनीत उभा होतो. वरुन एका पक्ष्याचं पीस पडताना पाहिलं थोडं खाली गेलं आणि तेवढ्यात वारा आला. त्याबरोबर ते पीस ज्या जागी पडणार होतं त्या जागेपासून खुप लांब अंतरावर जाऊन पडलं. ते पाहून एक विचार चमकून गेला. वर वर पाहता फक्त पडणं आपल्या हातात आहे. पण कुठे आणि कसं हे त्या वार्याच्या हातात आहे. हा वारा म्हणजे कर्म आणि त्या कर्माचं योग्य वेळी मिळणारं फलित. अर्थात ती वेळ योग्य आहे हे आपण नाही तर आपलं कर्म ठरवतं. म्हणजेच खरतर आपणच. पण आपण केलेलं कोणतं कर्मं आपल्याला कधी फल देईल हे पुन्हा आपल्या हातात नाही. इथेच खरतर गीतेचं कर्माबद्दलचं सर्वात महान तत्व लागू होतं. तू कर्म करत जा. फलाची अपेक्षा करु नकोस. त्याचा गर्भीत अर्थ हाच आहे कि, कोणतं कर्म कधी फळेल हे इश्वर सुद्धा नियंत्रित करु शकत नाही. हीच जीवनाची अशाश्वत गोष्ट आहे. म्हणुनच जीवन हे या अर्थाने पराधीन आहे. जे भगवंतानी वेळोवेळी येऊन सांगितलं. जे खरं गुह्य आहे. म्हणुन कर्म करुन सोडुन देणं इतकचं मानवाच्या हातात आहे. एखादी गोष्ट आपण योजणं आणि त्याचवेळी एखादं संकट आपली वाट अडवून उभ राहाणं हा फक्त योगा...