Skip to main content

Posts

Showing posts from May, 2015

बेकरारी

बेकरारी   तुम्हारे इन आँखोंकी नमी मांगता हूँ तुम्हारी  खुशी   न कम हो यहीं माँगता हूँ मुझे बस ये खुशी   तुम सदा मुस्कुराओ मुझे गम तुम्हारे मिले  मैं यहीं मांगता हूँ||   तुम्हे देखकर ये खिले चाँद तारे ये नज़ारे ये गुलशन ये सारे के सारे जीऊँ बस इन्हें देखकर ये समझू इन्हिमें  मैं तुम्हारी हंसी ढूंढता हूँ ||   सलामत रहे ये रोशन सितारे ये जलवे तुम्हारे तभी देख पाये यहाँ जिंदगी में इक अजीबो सी हसरत तुम्हारी मैं सदा जिंदगी मांगता हूँ ||   मेरा घर है आँखों मे सजता तुम्हारे यहाँ दिन और रातें है काजल तूम्हारे ये बिंदी ये गज़रा ये कंगन की खनखन इन्हें देखकर मैं तुम्हे मांगता हूँ || शायर : खुशमीजाज आशिक

तुम

तुम  तुम्हारे होठोंकी मुस्कान भी मिल जाए  तो काफी है || तुम्हारे आँखोंकी नमी भी मिल जाए तो काफी है || तुम्हारे पलकोंकी छावमे रहूँ बस ये काफी है || तुम्हारे जुल्फोंका साया हो बस ये काफी है || आजाद न करना मुझे इन सबसे कभी || ज़िंदा न रह पाउँगा बीन इनके कभीभी || बस  तुम ये  करना मेरेलीये इतनासा की || मिल जाए   तेरी एक सांस भी मुझे काफी है ||  जानता  हू रह  पाउंगा  बिन महफ़िल के ऐ कातिल || मिल जाए बस तेरे आँखोंकी शराब ही काफी है || शायर : खुशमीजाज आशिक 

गझल - ऎ यार

ऎ यार    जरासी जिंदगी और दोस्त साथमे|| चाहिये क्या और है भी क्या हाथ में||   गुजरे जो पल तन्हाइमे फिजूल थे || यार तेरे साथ बीते लम्हे एक फूल थे || गुजारिश है एकही उप्परवालेसे यही ख्वाब दे || पर इतना करना की हर फूल गुलाब दे ||   मुझे कांटे ही भले देना पर तू इतना कर || कमल के फूल ज़रूर उन्हें देना इतना कर ||   मैं तो यारो का वो यार हूँ ऐ दोस्त|| जो जिंदगी भर तेरा साथ दू ऐ दोस्त ||   मुझपे बस तू एतबार कर सदा के लिए || के खाली न रहे तेरा दामन किसीकी दुवाओं के लिए |

कवडसा 13

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …१३…… शीतल खुप वेळ झोपूनच होती आणि आशाताई तिच्या जाग होण्याची वाट बघत होत्या .  तासाभराने डॉक्टर साठे पुन्हा,  येऊन बघून गेले आणि आशाताईना म्हणाले,  डॉ : तिला अजून तासा दीड तासाने जाग येईल त्यावेळी नर्सला बोलवा.  मी येतो आता.   आशाताई : हो डॉक्टर तुम्ही आहात हा  खूप आधार आहे आम्हाला .   डॉ फ़क्त हसतात आणि आपल  एक बोट वर दाखवातात . जाताना नर्सना आवश्यक सूचना देतात आणि निघतात.   आशाताई एक्ट्याच् खोलीत असतात आणि शीतल शांत निजलेली. किती गोड दिसताय माझ लेकरु आणि किती निरागस. इतके आघात सोसूनही ही इतकी निरागस आणि निष्पाप कशी काय हे एक आश्चर्य आहे. एवढ्या कमी वयात इतका मोठा आघात पचवून पुन्हा उभ रहाण सोप्पी गोष्ट  नक्कीच नाही.    हीचं  पूर्व सुकृत म्हणून हे घडणार होत आणि म्हणून देवाने असा स्वभाव दिला हिला . कारण भोग पचवायला सुद्धा तस काळीज ...

कवडसा 12

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …१२…… काकू गेल्या आणि आशाताई लगेच आत गेल्या. आत शीतल असह्य  वेदनेने व्याकुळ होऊन रडत होती.  आशाताईनी तिचा हात हातात घेतला  केस सारखे केले आणि शीतलला बांध  आवरता आला नाही आशाताई : अग शीतल थोड़ सहन कर अस काय लहान मुलासारख  करतेस. मला माहिती आहे की खुप दुखतय पण एक्सरे येइपर्यंत  थांबावाच लागेल थोड़ धीरान घे बेटा.  (खरतर आशाताईना सुद्धा, शीतलकडे बघुन, आपल्याला रडू येईल अस वाटत होत,  पण मोठ्या  धीरान त्यांनी ते सावरलं  होत) तेवढ्यात एक्सरे रिपोर्ट घेऊन अवि आणि डॉक्टर साठे दोघेही आले . डॉक्टर: (रिपोर्ट पहात) दोन ठिकाणी फ्रैक्चर आहे. प्लास्टर शिवायपर्याय  नाही.  कमीत कमीत सहा आठवडे कंपल्सरी बेड . मी तयारी करतो बर  सकाळपासून काही खाल्लय का काही शीतल: (प्रचंड वेदनेतच बोलते) नाही फ़क्त चहा घेतलाय ६ वाजता डॉक्टर : ठीक आहे आता १० वाजलेत आपण साधारण ...

कवडसा 11

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …११…… क्लास संपवून शीतल कामं  आवरायला निघाली आणि त्याआधी हातात मोबाइल घेऊन चार्जिंगला लावायला. मोबाइल चार्जिंगला लावून टेबलावर ठेवून शीतल वळली आणि खाली पडलेल्या हेयर पिन वर तिचा  पडला. तो चुकवण्यासाठी तिने एक उडी मारली आणि अचानक पाय ट्विस्ट होऊन ती जमिनीवर पडली.  त्यात डावा पायावर सर्व शरीराचा भार पडला आणि एक जीवघेणी कळ तिच्या  मस्तकात गेली.  काही कळायच्या आत,  इतक्या वेगात सर्व घडल कि  सावरण्याची संधीच तिला मिळाली नाही. भानावर येऊन उठण्याचा प्रयत्न करत असताना,  तिला जाणवल की डावा   पाय  प्रचंड वेदना देतोय आणि  आपण उठूच   शकत  नाही.  पण प्रसंगावधान राखत, तिने मोठ्या कष्टाने, जमिनीवरुन  सरकत सरकत,  टेबला पर्यन्त जाऊन चार्जरची  वायर खेचून मोबाइल खाली ओढला.  त्या प्रयत्नात  मोबाईल...

मनोगत - दामोदर राव पुत्र राणी झाशी यांचे

मनोगत - दामोदर राव पुत्र राणी झाशी यांचे  नमस्कार, आज मी खास तुमच्याशी बोलायला आलो आहे. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि मी कोण . तर सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देतो . तर आम्ही दामोदर राव . आम्ही म्हणजे मी . काय जुन्या सवयी लवकर जात नाहीत . आता या काळात स्वतःला आम्ही म्हणणारे कोणीही नसतील.  पण पूर्वी खास करून राजे आणि त्यांच्या परिवारातील सर्व  स्वतःला आम्हीच म्हणत असत.  असो. काळ बदललाय म्हणून आम्ही मी ने सुरवात केली . तर आता प्रश्न पुढचा दामोदर राव कोण. आपल्या पैकी काही जणांनी नक्कीच ओळखल असेल. दामोदर राव म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा दत्तक पुत्र. तुम्हाला हासुद्धा प्रश्न पडेल की आता इतक्या वर्षानंतर काय बोलायचं  आहे .  ऐका म्हणजे कळेल .  मी मूळ  आनंदराव.  पण राणीसाहेबांनी मला दत्तक घेतल आणि माझ नाव दामोदरराव झाल . आपण इतिहासाच्या पुस्तकात माझा संदर्भ राणी लक्ष्मीबाई यांच्या धड्यात वाचला असेल. बरोबर तोच मी. आता नमनाला घडाभर तेल झाल्यानंतर मूळ विषयाला हात घालतो .    आज इतक्या वर्षानि सुद्धा...

कवडसा 10

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …९…… मी बराच वेळ योगेंद्रच्या मेसेजचाच विचार करत होते. मेसेज वरून योगेन्द्रचा स्वभाव लक्षात येत होता. सरळ, प्रत्येक गोष्ट सुस्पष्ट पणे उलगडून सांगणारा, कोणतीही गोष्ट आडपडदा न ठेवता मांडणारा, आणि त्याच वेळी समोरच्याची काही अडचण असू शकते हे लक्षात घेणारा . खरच माणूस म्हणून तरी हा खूपच सभ्य, सरळ आणि सुस्वभावी वाटतो. बाकी प्रत्यक्ष भेट झालीच तर कळेलही.  पण एकूण मेसेज वरून निदान एकदा तरी भेटावा अस वाटतंय. एक होत त्याने लिहिलेल्या प्रत्येक वाक्यावरून त्याने खूप विचारपूर्वक मेसेज लिहिलाय किंवा विचारपूर्वक लिहिणं हा त्याच्या स्वभावाचा भागच असावा अस वाटतंय .  एकूणच ह्याचा स्वभाव खुपसा समरच्या स्वभावाशी बर्याच प्रमाणात मिळता जुळता, प्रथम दर्शनी तरी, वाटतोय. अर्थांत हे प्राथमिक मत आहे .  असो खूप दिवसांनी एखाद्या चांगल्या स्वभावाच्या माणसाशी गाठ पडल्ये. नाहीतर समर गेल्या पासून माणसांचे वाईट अनुभवच जास्त आलेत. त्यात आप...

कवडसा 9

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …८…… योगेन्द्रच्या  फोनची वाट पाहून मी आत कामाला गेले.  बराच वेळ फ़ोन का आला नाही म्हणून मी सहज फोन उचलला, तर चार्जिंग संपल होत आणि  फ़ोन बंद झाला  होता. पटकन फोन चार्जिंगला लावला आणि थोडासा चार्ज झाल्यावर फोन ऑन केला. आणि मी आत जाऊन कामाला लागले . मला सारखी  खुप रुख रुख लागली होती, की योगेंद्रचा गैरसमज झाला असेल , हीने मुद्दामच फोन बंद ठेवला असावा . बऱ्याच वेळानंतर फोन का आला नाही, की येऊन गेला , हे बघण्यासाठी म्हणून मी सहज फोन उचलला तर, परत एक मेसेज येऊन पडला होता,  व्हाट्सएप्प नंबर वर.      " आपल्या ग्रुप मधून तुझा नंबर मिळाला . आणि  तीनदा फोन  केला .    तू उचलला नाहीस,  कदाचित कामात असशील अस समजून मी मेसेज पाठवला होता तुला. तो  कदाचित मिळाला असेल ,  पण त्या नंतर तूझा  फोनच  बंद .  कदाचित चार्जिंग संपल असेल,  असही  अ...

देवळातून देव केंव्हाच पळालाय

।। देवळातून देव केंव्हाच पळालाय ।। देवळातून देव केंव्हाच पळालाय  गाभार्याचा ताबा पुजार्यांनी घेतला, तेंव्हाच  तो पळालाय पूजेचा ताबा उपचारांनी घेतला ,  भक्तीचा ताबा व्यवहाराने घेतला, तेंव्हाच तो पळालाय  श्रद्धेचा ताबा अंध आणि अपंग श्रद्धेने घेतला, मंत्रांचा ताबा पठणाने   घेतला ,तेंव्हाच तो पळालाय  भावनेचा ताबा ढोंन्गाने घेतला  भावाचा  ताबा देवळा पुढील रांगेने घेतला, तेंव्हाच तो पळालाय तीर्थाचा ताबा पाण्याने घेतला   प्रसादाचा ताबा तबकाच्या किमतीने घेतला, तेंव्हाच तो पळालाय  मुमुक्षु आणि ज्ञानी  गेले कुठे  त्यांचा ताबा दक्षिणाधारिणी घेतला, तेंव्हाच तो पळालाय मग हा देव आहे तरी कुठे  अजूनही तो गरिबांच्या झोपडीत असतो  रिकाम् ताट आणि पोट असलेल्या   अनाथ अपंग यांच्या नजरेत  कष्ट करून पोट भरत असलेल्या  तो  अजूनही वृद्धाश्रमात असतो  वृद्धांच्यात , आपल्याच  मुलांनी टाकलेल्या  तो अजूनही असतो ठाण मांडून  निरागस निष्पाप हास्यात ,...

कवडसा 8

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु … ७ …… शीतल अशीच एकटक आकाशाकडे कितीतरी वेळ बघत होती…     आणि अचानक टेबलावर वाजत असलेल्या मोबाइलच्या रिंगने  भानावर आलेल्या शीतलने मोबाइल उचलून पाहिला.  तीन मिस कॉल्स आले होते एका अननोन नंबर वरून. शीतल शक्यतो माहिती नसलेल्या  नंबर वरुन आलेले फ़ोन   घेत नसे.   हां सुद्धा   कॉल तिने घेतला नाही.   पण लगेचच त्याच नंबर वरुन  मेसेज आला  "मॅडम महत्वाच् बोलायचय, फ़ोन घ्यायला हरकत नाही , मी परत फोन करतोय - योगेन्द्र पुरोहित" . शीतलला  नाव ओळखीच वाटत होत  आणि  लगेचच तिच्या लक्षात आल की योगेन्द्र तिच्याच  बरोबर कॉलेज मध्ये होता. थोडासा लाजरा , गोरा , साधा, सरळ, पण मुलींशी फार न बोलणारा. आणि आपण तर कधी त्याच्याशी बोलल्याच आठवत नाही.  पण आज आता इतक्या वर्षानी  याच काय काम असेल आपल्याकडे. मधल्या चार वर्षात कोणा  कोणाला समरबददल कळलय काही कळायला मार्ग ...

कवडसा 7

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …6…… कॉलेज चे दिवस संपले कधी, समरन आपल्याला पाहिल कधी , मी आवडले काय  आणि मागणी घालून त्याने माझ्याशी लग्न ठरवल हे इतक्या लगेच घडल की विचार करायला काही उसन्त सुद्धा  मिळाली नाही. अक्षरशः एखाद्या सिनेमातील कथे प्रमाणे भासतय अजूनही .लग्ना नंतरचे ते ऊटी - कोडाई चे दिवस, अजुन सुद्धा विसरु शकले नाहिये .   अर्थात ते दिवस विसरण्या सारखे नव्हतेही.  कोणीच विसरु शकत नसेल आयुष्यभर . त्यानंतर कित्येक वेळेला फिरायला जाऊन देखील हनीमूनचे दिवस कधीच विसरणार नाही मी .  "संसार मांडते मी, संसार मांडते " आशा ताईचा आवाज आणि आपल सर्वात आवडत गाण त्यावेळच् .....हो  .. आता त्यावेळच असंच .......... (आलेला हुंदका अथक प्रयत्नाने परतवतत आणि मुठ लोखंडी कठड्यावर घट्ट दाबत आणि  हुंदका पुन्हा पुन्हा परतवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत  ) ……  म्हणाव ..... लागेल ....किती उत्साहाने आपण संसाराची घडी या गाण्यातल्या प्रमाण...

।। नामस्मरण ।। २

।। नामस्मरण ।। २ सकाळी सुखाच्या स्वरूपातील नामस्मरण या वर आपण विचार केला. आता दुःख उपभोगत असताना नामाच महत्व विशद करतो दुःख हे सुखापेक्षा खोलवर परिणाम करणारे, जास्त हानी पोहोचविणारे,  पण सर्वात जास्त अन्तर्मुख व्हावयास लावणारे असते,  हा माझाच नाही तर आपल्या पैकी प्रत्येकाचा  अनुभव असणार, नव्हे आहेच. याच कारण सर्वश्रुत आहे की अश्या प्रसंगातच स्वकीय आणि इतर  यातील सीमा स्पष्ट होतात किंवा  तश्या त्या व्हाव्यात असा आपल्याच कर्मांचा नियतिरूपि संकेत असतो .   फक्त तो उमगणे जरूर असते अन्यथा विचार निराशावादी होऊन भरकटण्याची शक्यता अधिक असते आणि पुन्हा वाटचाल त्याच कर्मगतीकडे म्हणजेच पुन्हा चुकाच  आणि जन्मोजन्मीचा फेरा, तोही   न चुकणारा . आता इतके उमगल्यावर अश्या दु:खप्रसंगात मनाचा समतोल राखूंन नियति संकेतांचा योग्य अर्थ लागून इच्छित मार्गी म्हणजेच कर्मगतीच्या पलीकडे जाण्याचा उत्तम सोप्पा सुटसुतीत मार्ग म्हणजेच नामस्मरण याचे अश्या प्रसंगातील अधोरेखित करता येण्या सारखे फायदे  १ मनाचा समतोल राखणे २ दु:खप्रसंगातून उ...

।। नामस्मरण ।।

।। नामस्मरण ।। आपण सकाळी कोणालाही अनेक प्रकारांनी सुप्रभात  संदेश पाठवतो त्याला अनुसरून सुचलेल्या चार ओळी .  एक चांगला संदेश  जणू देवाचा आदेश  करो सुख प्रवेश  घरी तुमच्या स्ववेश  सुख हे अनेक प्रकारांनी आपल्या घरात , बुद्धीमध्ये ,  मनात,  हृदयात , अंतरात्म्यात प्रवेश करत. सुख म्हणजेच एक प्रकारे आनंदाचा झालेला मूर्त अविष्कार . या आनंदाचे अनेक प्रकार आहेत. जे एखाद्या प्रसंग रूपाने , व्यक्तीरूपाने , वा अन्य मार्गाने आपल्या आत मध्ये प्रवेश करतात आणि एक नाद उत्पन्न करतात आपल्या मनामध्ये . तो नाद किती काळ टिकतो हे त्या आनंदाच्या प्रकारावर अवलंबून असत.  आनंद कोणत्या स्वरूपातून प्रकट झालाय यावर त्याचा नाद किती काळ टिकणार हे ठरत . जस ऐहिक गोष्टीं  पासून मिळणारा आनंद हा काही काळ  टिकणारा असतो . एखादी आलेली आनंदाची बातमी , एखादी नवीन घेतलेली वस्तू  , नवीन घेतलेली गाडी , जागा , पर्यटन स्थळाला देलेली भेट, घरातल्यांच्या शैक्षणिक यशा  संबंधातील छान बातमी, एखाद  छान संगीत , इत्यादी सर्व एक ठराविक काळ आनं...

कवडसा 6

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …5…… समर विश्वास लहानपणापासून शांत, मृदु भाषी, हुशार असल्यामुळे विचारांची प्रचंड खोली असलेला, खेळापेक्षा अभ्यास, वाचन, मनन, या गोष्टींमध्येच रमलेला, सतत कसल्यातरि चिंतनात स्वतःला गढून् घेणारा, बालिशपणा, पोरकटपणा , उतश्रृंखल वागण, या पासून स्वतःला कायम दूर ठेवणारा, फार कमी पण मार्मिक बोलणारा ,असा होता. समुद्राच  पाणी वरुन जीतक शांत दिसत शांत दिसत त्याच्या कित्येक पट मंथन हे त्या पाण्या खाली चाललेल असत, या न्यायाने प्रत्येक निर्णय सखोल विचार करुनच घेणारा .  मुद्द्यांचीच् नव्हे तर गुद्द्यांची सुद्धा लढाई मुद्द्यांनी  सोडवता येते या विचारांवर पूर्ण श्रद्धा असलेला. बेताचीच परिस्थिति असलेल्या घरातून स्वकर्तुत्वावर सर्व उभ करण्याची उमेद असलेला,  पूर्ण होकारात्मक विचारसरणीचा , अतिशय खडतर परिस्थितीत देखील कधीही निराश न होणारा , शेवटच्या श्वासापर्यंत जगण्यातील जिद्द न सोडणारा. त्याच्या वागणया बोलण्या तील समतोल...

कवडसा 5

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …4…… शीतल समर एक निरागस अल्लड आणि निष्पाप स्वभाव असलेली साधी सरळ मुलगी. आता वयामुळे अल्लड़पणा कमी झाला असला तरी निरागसपणा तसाच टिकून होता .  सश्याच काळीज, जिभेवर साखरेचा गोडवा , बोलण्यातील मार्दव्य , वागण्यातील शालीनता , सोशिकपणा , समरच्या स्वभावाला सजेसा सुस्वभाव हे कळीचे गुण होते  लहानपणी काहिशी अबोल आणि छोट्या छोट्या गोष्टीत बराच वेळ मन रमवणारी, घरातल्यांच्यापेक्षा आपल्याच विश्वात हरवलेली , फूल , फुलपाखर, पान, वेली यांच्याशी सुद्धा तासनतास गप्पा मारणारी  हे तिचे खास स्वभाव विशेष मोठेपणी टिकून होते.  म्हणूनच मृदुला आणि साक्षी या खास दोनच मैत्रिणी ज्यांच्या जवळ ती आपली मनातील सर्व बोलत असे.  फुलांमध्ये ह्रुदय असत या विश्वासाने ती केसात फूल माळताना अत्यंत हळूवार पणे माळत असे, किंवा वाहत्या पाण्यात हात घालताना पाण्याच्या प्रत्येक अणूत जणू जीव असतो या जाणीवेने जपून हात घालत असे. आपल्या केसात...

कवडसा 4

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …3…… समरला जाऊन दोन तीन महिने होतील आता, पण त्या काळात आलेले लोकांचे  अनुभव विलक्षण होते. एका घटनेने लोकांच्या विचारांचा कमकूवतपणा  आणि वृत्तीचा फोलपणा  प्रकर्षाने जाणवू लागला होता. पण मलाही आता उभ राहण गरजेच असल्यामुळे या अश्या वृत्ती आणि प्रवृत्ती समोर येणार हे ध्यानात घेऊनच पुढच्या  आयुष्याला समोर जायचं मी ठरवलं.  पण चंद्रकांत, समरचा मित्र , जो पूर्वी सहा महिन्यातून एकदा यायचा तो आता एक दिवसाआड यायला लागल्या मुळे मनात शंकेची पाल चुकचुकली . कारण एकटी स्त्री म्हणजे वापरायला मिळालेली वस्तुच जणू हा एकूणच पुरुषी समाजाचा विकृत दृष्टीकोन आणि वृत्ती यांच दर्शन पदोपदी पुरुष्यांच्या नजरेतून जाणवत होत . चंद्रकांत तरी वेगळा कसा असेल. पण एक ना एक दिवस त्याला जागा दाखवण गरजेचच होत.  एक दिवस तो सकाळीच आला "वाहिनी काही हव असल्यास निःसंकोच पणे सांगा मी कधीही कोणत्याही मदतीला धावून येईन. " मी म्हणाले "भाऊजी तुम्ही नका...

कवडसा 3

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …२……  कालच शर्वरीला आई सोडून चार दिवस राहून गेली तिच्या कडे बघवत नव्हत. आपल्या लेकीच्या पदरी आलेलं हे दान ती कसा पेलणार हा प्रश्न सतत तिच्या नजरेत मला जाणवत होता. या वयात तिला लेकीच वैधव्य बघण्याचा योग आला होता. ती बोलत नव्हती पण तिच्या नजरेतील सुन्न पणा काळीज पिळवटून टाकत होता. कारण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ती मला सावरण्याला मदत करू शकत होती. पण त्या पलीकडे हि माझीच लढाई होती आणि ती लढण माझ्याच नशिबात होत .  खरच नशीब या शब्दावर या आघातापर्यंत आपण खरच विश्वास ठेवत नव्हतो. पण आता अस वाटत कि खरच नियती नावाची कुणी एक अज्ञात शक्ती  आपली परीक्षा पाहायला  समोर येऊन ठाकली होती. आणि आता तिला समोर जाण मला क्रमप्राप्त होत. कारण  वेळ हातपाय गळून बसण्याची नव्हती, तर उठून उभ राहून समोर आलेल्या परिस्थितीला हिमतीने तोंड देणे गरजेच होत.  सर्वात प्रथम आर्थिक बाजूचा विचार, आणि शर्वरीच शिक्षण पूर्ण करून समरच स्वप्न वास...