Skip to main content

जानकी पुनःवनवास १०३

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास १०३

अर्थात राजा निमी निद्रेतून जागा झाल्यावर त्याला ब्रम्हर्षी वसिष्ठांनी दिलेल्या शापाचा वृत्तांत समजला.  ते ऐकून  राजा निमीदेखील क्रोधीत झाला आणि अनायासे त्याच्या मुखातून क्रोधातून ब्रह्मर्षींसाठी शाप निघाला कि, आपण  सत्य परिस्थिती आणि माझी निद्रा यांचं कारण न जाणताच मला शाप दिलात त्यामुळे मीदेखील आपणाला शाप देतो कि, आपणही शरीरहीन व्हाल अर्थात आपणासही मृत्यू प्राप्त होईल.

अर्थातच राजेंद्र आणि द्विजेंद्र दोघेही समान शापाच्या प्रभावाने त्वरित शरीरहीन झाले.

त्यानंतर देहहीन अवस्थेत ब्रम्हर्षी वसिष्ठ पिताश्री ब्रह्मदेव यांच्याकडे गेले. ब्रह्मदेवांनी त्यांना विचारलं कि, काय प्रयोजनार्थ येथे आपलं आगमन झाले. यावर ब्रम्हर्षी त्यांना म्हणाले कि, राजा निमी यांच्या शापामुळे मी शरीरहीन अवस्थेत आलो आहे. अर्थात आपण जाणता कि, पंचमहाभूत शरीर, हेच सर्व प्राप्त  करण्याचं साधन आहे आणि तेच नसल्यामुळे या शरीरविहीन अवस्थेत काहीही करणं अशक्य आहे. म्हणून आपल्याला विनंती करायला आलो आहे. कि, आपण मला काही उपाय सुचवा जेणेकरून मला पुन्हा देह प्राप्त होईल.

यावर ब्रम्हदेव म्हणाले कि, तू इथून वरुणाच्या शरीरात प्रवेश कर आणि त्याच्या माध्यमातून तुझा  पुनर्जन्म होऊन तूला पुन्हा देह प्राप्त होईल. ब्रह्मदेवांच्या  कथनानुसार ब्रम्हर्षी वसिष्ठ उत्पन्न झाले आणि त्याना पाहून आपल्या वंशाचे आद्य महाराज इकश्वाकु अतिहर्षीत होऊन ब्रम्हर्षी वसिष्ठ यांना म्हणाले कि, आपण माझ्या व माझ्या कुलाचे कुलगुरू पद स्वीकारा अशी मी आपल्याला विनंती करतो. हे लक्ष्मणा अश्या प्रकारे ब्रम्हर्षी वसिष्ठ नवीन शरीर प्राप्त करते झाले.

आता राजा निमीबद्दल सांगतो ऐक. राजा निमीला मृत पाहून सुद्धा ऋषीगणांनी त्याच मृत शरीराकडून यज्ञ पूर्ण करून घेण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी प्रजाजन आणि राजाचे नोकर चाकर यांना सांगून त्या मृत शरीराला गंध , फुल लावून  आणि विविध वस्त्र परिधान करून त्याच रक्षण केलं. जेंव्हा यज्ञ पूर्ण झाला, यज्ञ विधीचे पूर्णाधिकारी भृगु ऋषी  राजा निमीच्या मृत देहाला पाहून म्हणाले. हे राजन मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे आणि आता मी तुझ्या या मृत शरीरात चैतन्य प्रस्थापित करून त्याला पुनः जिवंत करतो.

तिकडे समस्त देवतागण सुद्धा महाराज निमीच्या आत्म्याला म्हणाले हे राजर्षे वर मागा आम्ही तुम्हाला कुठे स्थापित करू. हे वचन ऐकून राजा निमी अत्यन्त आनंदित म्हणाले कि, हे देवतागण मला समस्त प्राणिमात्रांच्या नेत्रात राहायचं आहे त्यामुळे माझी तिथे स्थापना करा. यावर समस्त देवता म्हणाले कि, हे निमी तुझ्या इच्छेनुसार तू  वायुरूप होऊन समस्त प्राणिमात्रांच्या नेत्रात वास करशील, ज्या योगे त्यांचे नेत्र शुष्क पडून ते आपली नेत्रकवाडे म्हणजेच पापण्या सतत उघड झाप करून आपले नेत्र पाण्याने भरत राहतील ज्यायोगे त्यांच्या नेत्रांचा शुष्कपणा जात राहील. हे राजन अश्या तऱ्हेने तू सदैव या जगात जीवित राहशील.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...