आत्मचिंतन भाग ७ सहाव्या लेखात म्हटलं त्याप्रमाणे, देह गेल्यावर, आत्म तत्त्व हे आपला हिशोब मांडून घेण्यासाठी,त्या व्यवस्थेपुढे जाते.किंबहुना तिला बळजबरीने नेलं जातं.याचं महत्वाचं कारण म्हणजे, देहात मनाची झालेली गुंतवणूक आणि ही गुंतवणूक आत्म्याला,अनेक कारणां साठी,मागे खेचण्याचा प्रयत्न करते. म्हणजे, काही राहिलेले हिशोब, काही करावयाच्या गोष्टी, काही करत असलेल्या, पण अर्धवट राहिलेल्या गोष्टी. याव्यतिरिक्त, मोहाचे, लोभाचे, वासनेचे, कुसंस्करांचे, व्यक्तिगत हेवेदावे यांचे, अहंकार,अहंगंड, दुराभिमान, दंभ, दुर्भावना, दुराग्रह, काही मनात योजलेल्या, तिरस्कार, राग, क्रोध यांच्या आठवणी, मान अपमान, दुःख, सुख यांच्या आठवणी, ठरवलेल्या पण साध्य न होऊ शकलेल्या योजनांचे आलेख इत्यादी बरंच काही, मन साठवून ठेवतं आणि ज्ञात वा अज्ञात कोणत्याही अवस्थेत देह त्याग घडल्यानंतर, मन देहाला आणि आत्मा मनाला घट्ट चिकटून राहतात आणि देह न सोडण्याच्या वासना व भावना, अंतकाळी तीव्र असतात. म्हणजे आधीच, देह न सोडण्याची तीव्र भावना, त्यात आपल्या आत्म्याला म्हणजेच खरतर आपल्याला, घडलेला हिशोब, ईश्वरी व्यवस...