Skip to main content

Posts

Showing posts from October, 2023

आत्मचिंतन भाग ७

आत्मचिंतन भाग ७    सहाव्या लेखात म्हटलं त्याप्रमाणे, देह गेल्यावर, आत्म तत्त्व हे आपला हिशोब मांडून घेण्यासाठी,त्या व्यवस्थेपुढे जाते.किंबहुना तिला बळजबरीने नेलं जातं.याचं महत्वाचं कारण म्हणजे, देहात मनाची झालेली गुंतवणूक आणि ही गुंतवणूक आत्म्याला,अनेक कारणां साठी,मागे खेचण्याचा प्रयत्न करते. म्हणजे, काही राहिलेले हिशोब, काही करावयाच्या गोष्टी, काही करत असलेल्या, पण अर्धवट राहिलेल्या गोष्टी.  याव्यतिरिक्त, मोहाचे, लोभाचे, वासनेचे, कुसंस्करांचे, व्यक्तिगत हेवेदावे यांचे, अहंकार,अहंगंड, दुराभिमान, दंभ, दुर्भावना, दुराग्रह, काही मनात योजलेल्या, तिरस्कार, राग, क्रोध यांच्या आठवणी, मान अपमान, दुःख, सुख यांच्या आठवणी, ठरवलेल्या पण साध्य न होऊ शकलेल्या योजनांचे आलेख इत्यादी बरंच काही, मन साठवून ठेवतं आणि ज्ञात वा अज्ञात कोणत्याही अवस्थेत देह त्याग घडल्यानंतर, मन देहाला आणि आत्मा मनाला घट्ट चिकटून राहतात आणि देह न सोडण्याच्या वासना व भावना, अंतकाळी तीव्र असतात.  म्हणजे आधीच, देह न सोडण्याची तीव्र भावना, त्यात आपल्या आत्म्याला म्हणजेच खरतर आपल्याला, घडलेला हिशोब, ईश्वरी व्यवस...

आत्मचिंतन भाग ६

आत्मचिंतन भाग ६    या पाच लेखात एक गोष्ट मनावर बिंबवली गेली असेल ती म्हणजे, आपला खरा हिशोब हा मृत्यू पश्चात होणार आहे आणि या देहात असताना, जे काही कमावलं आहे किंवा गमावलं आहे, त्याचा संबंध फक्त देहापुरता आहे आणि तो इथेच सोडून जायचं आहे. देह असताना, तो चालावा, नीट सुस्थितीत ठेवता यावा व शेवटपर्यंत तो सुस्थित रहावा, यासाठी जे आवश्यक आहे, ते केलं गेलं पाहिजे. म्हणजे देह उत्तम रहावा आणि उत्तम शरीर स्वास्थ्य व मन:स्वास्थ्य असावं, हा उद्देश असण्यात काही गैर नाही. पण त्यासाठी ज्या तडजोडी करायच्या आहेत तितक्याच केल्या जाव्यात, जेणेकरून, कधीही पश्चात्ताप करावा लागता कामा नये. तसही जो ताप नंतर अर्थात पश्चात बुद्धीने येतो आणि मनाला, बुद्धीला व आत्म्याला न्यून अथवा ताप देतो, त्याला आपल्या संचित गाठोड्यात बांधून घेऊ नये. यदाकदाचित अशी गोष्ट अनावधानाने, अनिच्छेने, मनाविरुद्ध तडजोड म्हणून करावी लागली, तर तो आपल्या पूर्वकर्म दोष होता, असे जाणावे आणि लक्षात आल्या पश्चात, त्याबद्दल ईश्वराकडे क्षमेची व करुणेची याचना करावी.  आपण वाचलं किंवा ऐकलं असेल तर, अनेक संत महंत कळत वा नकळत काही अपराध...

आत्मचिंतन भाग ५

आत्मचिंतन भाग ५   मृत्यू पश्चात आपला हिशोब कसा असावा, याचा विचार माणूस तोपर्यंत करत नाही, जोपर्यंत मृत्यू साक्षात समोर येत नाही. कदाचित त्याही वेळी, हाच विचार मनात येत असावा की,मी काय कमावलं किंवा काय गमावलं म्हणजे पुन्हा बेरीज वा वजाबाकी. म्हणजे पुन्हा व्यापारी हिशोब. पण हा व्यापारी हिशोब वरती किंवा जिथे कुठे ही कर्माच्या हिशोबांची उजळणी होते, त्या ठिकाणी होत नाही. तर तिथे किंवा त्या व्यवस्थेत, कर्म, ज्ञान आणि भक्ती, या तीनच मोजमापात आत्म्याच्या त्या देहातील जन्माचा हिशोब होतो.  त्यावर आधीच्या संचीतातील किती ठेव वा देणी शिल्लक आहे, ते मिळवून, एकूण ताळेबंद मापला जाऊन, त्यातून पुढे या जीवाला काय भोगायचे किंवा उपभोगायचे आहे ते काढले किंवा ठरवले जाते. म्हणजे आपण एखाद्या जन्मात मौज मजा आणि नुसती धमाल केली असेल तर, त्यानुसार आधीच्या संचीतातील ठेवीमधे घट होऊन, पुढील जन्मी फक्त आणि फक्त भोग अर्थात देणी शिल्लक राहू शकतात.  नक्कीच आपल्यासमोर, आत्मा देह सोडून गेल्यावर, हा हिशोब, होत असणार. म्हणजे तिथे आपल्याला नक्कीच आपल्या त्या आणि आधीच्या जन्मांची शिलकी समजत असेल. चैतन्य रुपात अस...

आत्मचिंतन भाग ४

आत्मचिंतन भाग ४    मागच्या भागातील मुद्दा जरा विस्ताराने अभ्यासून पुढे जाऊ. माणसाने गेल्या पन्नास ते पंचाहत्तर वर्षात जी वैज्ञानिक प्रगती केली आहे.त्यातील एक महत्वाची प्रगती म्हणजे या आकाशगंगेत असलेल्या इतर ग्रह, इतर विश्व आणि त्याही पुढे असलेल्या इतर आकाशगंगा यांचा शोध घेण्यासाठी अनेक यांनं पाठवली आहेत. या सर्वांचा मुख्य आदर हा प्रकाशाची गती आणि ध्वनीची गती हाच आहे. म्हणजे सरतेशेवटी या दोन गोष्टी, या विश्वाला भेदून पुढे जाऊ शकतात हे विज्ञानाने मान्य केलं आहे. म्हणजेच प्रकाश आणि ध्वनी यांच्या लहरी अमर किंवा अमर्त्य आहेत. अर्थात त्यांच्या लहरी या आपलं स्वरूप बदलू शकतात आणि आसमंतात विरून जातात, पण अस्तित्व टिकवून असतात. असं वाचण्यात आलेलं आहे की, कदाचित याच तत्वाचा आधार घेऊन, काही जर्मन शास्त्रज्ञ, या आधी घडून गेलेल्या भगवदगीता कथनाचा प्रभूंच्या आवाजाचा वेध घेऊन,त्यांना पुन्हा साठवण्याच्या प्रयोगाचा अभ्यास करत आहेत.  पण एक नक्की की, कोणत्याही लहरी या एकदा निर्माण झाल्या की, नष्ट होत नाहीत. मर्त्य जगतात सुद्धा अनेक गोष्टीतून आणि अनेक कारणांनी निर्माण झालेल्या लहरी, अमर्त्य अ...

आत्मचिंतन भाग ३

आत्मचिंतन भाग ३   या जगात आणि जगताबाहेरील ब्रम्हांडात किंवा ज्ञात वा अज्ञात जगतात, वैकुंठात कुठेही, जे काही आहे, त्यामागे कार्यकारण भाव तर आहेच. पण प्रत्येक अणू मागे, काही वैज्ञानिक, शास्त्रीय कारण आणि पद्धती, व्यवस्था किंवा इंग्रजीत ज्याला system म्हणतात,ती या सर्वांचा आधार आहे.म्हणजे व्यवस्थेने चालत नाही,अशी गोष्ट अस्तित्वात नाही. इथेही नाही किंवा कोणत्याही लोकात नाही. याचं आधारावर नक्कीच हे म्हणता येईल की, मृत्यूपश्चात सुद्धा हिशोबाची काही पद्धत अस्तित्वात असणार. पण आता जर आपल्या कर्माच्या हिशोबाचा विचार केला तर, या जगतात अस्तित्वात असलेली आणि मृत्यूपश्चात पुढे जाणारी गोष्ट म्हणजे आत्मा. आपल्या हातून काया, वाचा मन व बुद्धी या चारही माध्यमाने घडलेली, घडणारी सर्व कर्म, आत्म्याच्या द्वारे एकतर, हिशोबासाठी पुढे पाठवली जात असतील, अगदी घडते वेळी. म्हणजे आत्म्यामध्ये सूक्ष्मातील सूक्ष्म रुपात, त्यांना साठवण्याची कुठलीतरी व्यवस्था असली पाहिजे.  किंवा आत्म्याला अश्या कुठल्यातरी व्यवस्थेने वा व्यवस्थेला जोडलेलं असणार, जी व्यवस्था या सर्वांचा हिशोब ठेवते. त्या व्यवस्थेपर्यंत पोचणारी ए...

आत्मचिंतन भाग २

आत्मचिंतन भाग २ मानवी देहात असताना आपण फक्त आणि फक्त देहाचा विचार केला, या गोष्टीला आठवून आत्मा, पश्र्चाताप पावतो. हा प्रत्येक क्षण होणारा पश्र्चाताप, खरतर आत्म्याला दाह देतो. हा दाह वा याचा अग्नी, वास्तविक अग्नी सारखा नसला तरीही, तो आत्म्याला नित्य जाळणारा असतो. आपण नैनं छिंदंती शस्त्राणी..... हे वचन वाचलं, ऐकलं आणि जाणलं आहे. पण तरीही मी, आत्म्याचा दाह होतो,असं का म्हणतोय, याचा विचार करूया. भुलोकीच्या पंचतत्वातील अग्नी, जल, वायू, आकाश हे नक्कीच आत्म्याला काहीही करू शकत नाहीत. अगदी भुलोकीच्या गुरुत्वाकर्षण सारख्या कोणत्याही शक्तीचा सुद्धा त्यावर परिणाम होत नाही. कारण त्यांचा अधिकार फक्त पंचमहाभूतरूप देहापुरता आहे. देह संपला की, त्यांचं कार्य, अधिकार आणि उद्देश तिन्ही समाप्त होतं आणि ते पुन्हा आपल्या स्थानी विलीन होतात. त्यामुळे भगवंत जे सांगतात ते संपूर्ण सत्य आहे, ते या अर्थाने.  याचं विषयावर चिंतन करतांना, एक प्रश्न नेहमी मनात यायचा की, नरकात आत्म्याला ज्या यातना दिल्या जातात असं आपण वाचतो, त्या आत्म्याला कश्या काय, स्पर्शू शकत असतील, किंवा त्रास देऊ शकत असतील. कारण श्रीमद् भ...

आत्मचिंतन भाग १

आत्मचिंतन भाग १ (नवीन मालिका)  खरतर मृत्यू आणि त्या पलिकडील जगत हा अनंत कल्पनांचा विषय आहे. ज्याची कल्पना मानवी मनाच्या उद्दाणा पलीकडे आहे. मानवाचा प्रवास हा सप्तलोकां तून स्वर्ग लोकाकडे होतो. पण कर्माच्या गतीनुसार तो, सप्त पाताळ या कडे सुद्धा होऊ शकतो.भुलोकीचं जीवन हा या अनंत प्रवासातील, मात्र एक टप्पा आहे. पण त्यातच अनेक जीव इतके गुरफटून गेलेले असतात की, त्यांना पुढच्या प्रवासासाठी, वेळ, विचार आणि कर्म, तीनही, असाध्य असतं.  मानवी देहातील जन्मात इंद्रिय, अवयव, बुद्धी, देह, वाचा जिव्हा इत्यादी कर्म इंद्रिय आणि ज्ञान इंद्रिय प्राप्त असतात. त्याचा उपयोग जास्तीतजास्त ग्रहण करून, जतन करत, कर्माचा आलेख पुढे पुढे न्यायचा असतो. हा कर्माचा आलेख जितका चढता असेल (अर्थात उच्च पातळीवर जाण्यासाठी) तितका त्या देहातील आत्मा, पुढच्या पायरीकडे जाण्याची शक्यता आणि शाश्वती अत्याधिक असते. मानवी जन्मात. दिलेली कर्म, ज्ञान इंद्रिये, बुद्धी, मन ही विस्तारित इंद्रिये, पुढील कोणत्याही स्थितीत वा अवस्थेत असतं नाहीत. म्हणजेच याचा दुसरा अर्थ हा की, मानवी देहाच्या सहाय्याने, मानवी देहातील मन व त्याला जोडल...

मंगल पर्व नवरात्री मतितार्थ !! जसं सुचलं तसं.

मंगल पर्व नवरात्री मतितार्थ !! जसं सुचलं तसं.  अस्थिरतेकडून स्थिरतेकडे, द्वैतातून अद्वैताकडे, अज्ञाना कडून ज्ञानाकडे, तीमिराकडून प्रकाशाकडे जातानाचा प्रवास हा शिवाकडून पुन्हा शिवाकडे जाण्याचा प्रवास. हा प्रवास अनंत जन्मांचा असतो. म्हणूनच हा अनंताकडे जाणारा प्रवास आहे. शिवतत्व हे अगम्य आणि गूढ आहे. तो एक अग्निरुप ब्रम्हांड आहे.जीवाला तिथे जाण्यासाठी अनेक दिव्य पार करून जावं लागतं. यामधे आपले भोग व उपभोग संपवून किंवा त्यांचा मोह टाळून, पुढे जाणं अपेक्षित आहे.  यातील शून्यातून शिवाकडे जाण्यात,चुका, प्रमाद, अज्ञान वश अनेक चुकीची कर्म घडतात. हा प्रवास म्हणजे एक यज्ञ आहे आणि यज्ञ म्हटलं की आहुती अपेक्षित आहे. ही आहुती, मोह, लोभ, माया, अज्ञान, दुष्कर्म यांची असावी लागते. पण या सर्वातून निर्माण झालेले व होणारे भोग व उपभोग हे या अहुतीला अपूर्ण ठेवतात. कारण प्रत्येक क्षणी आहुती अपेक्षित असते. पण प्रत्येक क्षणी भोग आणि उपभोग सुद्धा येतच असतात.  या सर्वांना टाळून जाणं अशक्य आहे. या सर्वांना भोगून जाणं कष्टप्रद आणि ऊर्जा, शक्ती व वेळ यांचा अपव्यय करणारं आहे. पण द्वैत, अस्थिरता, अज्ञान...

भोग आणि ईश्वर ६३०

भोग आणि ईश्वर  ६३०   ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले    आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांना प्राप्त संदेश लहरी व संवेदना, त्यांच्या मार्फत, त्यांना मेंदूत नेमून दिलेल्या पेशी समुहा कडे पाठवण्याची जबाबदारी, त्या त्या ज्ञानेंद्रियांना देण्यात आलेली असते. त्यांना त्याच मार्गाचा अवलंब करावा लागतो. असं कधी झाल्याचं वाचलय का की, कानांनी काही धोक्याचा इशारा ऐकल्यावर, त्यांनी तिथूनच तो इशारा डोळे, हात, पाय वा इतर कुठल्याही इन्द्रियाला परस्पर पाठवून, कार्याला जुंपलं आहे.  असं क्वचितही घडलेलं आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळत नाही. याचं कारण म्हणजे त्यांना नेमून दिलेला मार्ग किंवा चॅनल न मोडण्याचे संस्कार त्यांना उपजतच, विधात्याने केलेले आहेत. हे देह निर्मितीच्या प्रक्रियेत, देह घडताना, केले जाणारे, विधात्याचे संस्कार आहेत. त्यांना अपवाद नाही. त्यांचा संदेश पाठवण्याचा मार्ग निश्चित आहे. त्यानुसार ते कार्य करणार. पुढील जबाबदारी ही, मेंदू या अवयवायचं कार्य आहे. सहसा सर्वसाधारण घटना, प्रसंग, कार्य, संदेश इत्यादीं मध्ये, शरीर शास्त्रानुसार मेंदूचा डावा भाग कार्य करतो. म्हणजे आ...

भोग आणि ईश्वर ६२९

भोग आणि ईश्वर ६२९   ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले    आतापर्यंतच्या दोन भागातील विस्तृत कथनावरून एक गोष्ट लक्षात येते की, बुद्धीच्या सवयी, या संस्काराशी निगडित असतात. बुद्धी ही मनाच्या अत्यंत निकट मानली जाते किंवा तशी ती असते. म्हणूनच मनाच्या लहरी व संवेदना यांचां जलद किंवा कधीकधी अती जलद प्रभाव, सर्वात प्रथम मेंदू अर्थात बुद्धी यावर होतो. कारण कोणत्याही लहरी, स्पंदनं यांचा त्वरित परिणाम स्त्राव अर्थात हार्मोन्स यावर होतो. त्याचप्रमाणे मनाला देहा कडून कार्य करवून घ्यायला बुद्धी या माध्यमाची आवश्यकता किंवा माध्यम म्हणून निकड असते.  त्यावर आधारित विचार किंवा अविचार हे,या हार्मोन्सच्या स्त्रवण्यामुके येतात, जे बुद्धी आणि मन दोन्हींना भारून टाकतात. म्हणजे बुद्धीच्या अविचार किंवा विचार करण्या मागे, मनाच्या लहरींचं प्रसारित होणं आणि बुद्धीचं त्या दिशेने जाणं, या परस्पर सबंधित घटना आहेत. पण या प्रकारे बुद्धीचं झेपावणं किंवा कार्यरत होणं, हे सवयीचा परिणाम आहे. कारण एखादी स्थिती किंवा परिस्थिती अथवा घटना घडते, त्यावेळी त्यावर आपली क्रिया किंवा प्रतिक्रिया ही, आपल्या ब...

भोग आणि ईश्वर ६२८

भोग आणि ईश्वर ६२८   ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले    विवेकाचा विचार करण्याआधी, बुद्धी म्हणजे काय, यावर जरा विचार करूया. बुद्धी म्हणजे जड तत्वाचं अर्थात पृथ्वी तत्वाचं प्रतीक. मेंदूत असलेल्या पेशींमध्ये, विशिष्ट प्रकारची हार्मोन्स निर्माण करून, त्यातून उत्पन्न लहरी वा संदेश कोणत्याही गोष्टीचं पृथक्करण करण्याची देहात स्थित मेंदू या इंद्रियाची क्षमता. यामध्ये मनाच्या जाणिवा, संवेदना यांचा उपयोग सुद्धा केला जातो. पण तरीही बुद्धी ही कार्यरुपात आणि अस्तित्व स्वरूपात देहाचा भाग गणला जातो. विज्ञान, जीवशास्त्र, शरीर शास्त्र या सर्वांच्या इतक्या वर्षांच्या अभ्यासाने, सिद्ध झालेली आणि आज माहीत असलेली गोष्ट म्हणजे मेंदूवर जितक्या वळ्या, सुरकुत्या या जास्त, त्यानुसार बुध्दीची क्षमता जास्त असते. बुद्धी म्हणजे संकलन, आकलन, पृथक्करण करण्याची क्षणात. मेंदूची उजवी व डावी अशी विभागणी असून, दोन्ही भागात काही विशिष्ट पेशी समूह, विशिष्ट कार्य करण्या साठी बनवलेला किंवा घडवलेला असतो. त्यामुळे त्या त्या विशिष्ट पेशी समुहांवर, ज्ञानेंद्रियां कडून प्राप्त, त्या त्या विशिष्ट, दृश्य, ध्वनी, ...

भोग आणि ईश्वर ६२७

भोग आणि ईश्वर ६२७   ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले   आज जवळजवळ तेरा महिन्यांच्या अंतरा नंतर, पुन्हा हा विषय सुरू करताना, कशी सुरुवात होईल, काय लिहिलं जाईल, असे अनेक विचार येत होते. पण दुसरा एक विचार या सर्वांना छेद देऊन पुढे आला. तो म्हणजे एवढे ६२६ भाग सलग ६२६ दिवस, ज्या सद्गुरूंनी लिहून घेतले. तेच माझे श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज, इथून पुढचे भाग, लिहून घेतील. कारण आधीचे ६२६ भाग त्यांनीच, कोणत्याही अभ्यासाशिवाय, माझ्याकडून लीलया लिहून घेतले. म्हणजे हे एक वर्षांपेक्षा जास्त काळ न लिहिण्याची आणि आता पुन्हा लिहिण्याची प्रेरणा तेच आहेत.  म्हणून नव्या दमाने, भाग ६२७ पासून पुन्हा लिहायला घेण्याची सद्बुद्धी,त्यांनीच दिली,हे जाणून आणि समजून लगेच बसलो. फक्त एक आहे विषय कुठे होता आणि पुन्हा कुठून सुरू करायचां, हा विचार करण्या पेक्षा, जे, जसं जमेल तसं आणि तिथून सुरू करुया. जे योग्य आणि सर्वांना गरजेचं आहे, तेच महाराज मांडून घेतील. त्यामुळे आता श्रीगणेश करूया आणि पुन्हा एकदा भोग आणि ईश्वर या विषयाला सुरुवात करुया. जय श्रीराम खरतर भोग आणि उपभोग या आपल्या जीवनातील दोन अश...