Skip to main content

आध्यात्म विराम २

आध्यात्म विराम २ (नवीन लेखमाला)

अंतराळातून किंवा ब्रम्हांडातून येणाऱ्या ईश्वरी किंवा सर्व प्रकारच्या संदेशांच्या प्राप्तीची व्यवस्था अर्थात reception system, त्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था अर्थात processing mechanism, त्यानंतर पृथक्करणाची व्यवस्था अर्थात analysing methods आणि निष्कर्ष, अनुमान व निर्णय घेण्याची व्यवस्था अर्थात conclusion and decision making abilities ही सर्व व्यवस्था, या एका देहात इंद्रिय, बुद्धी व मनरुपात निर्माण करणारा ईश्वर, खरतर किती महान वैज्ञानिक, सर्वज्ञ, शक्तिमान असला पाहिजे, याची कल्पना व जाणीव, काही असाधारण जीवांना, संत सज्जन, ऋषीमुनी यांच्या देहात प्राप्त होते. कारण शेवटी मानवी देह हाच शेवटचा टप्पा आणि एकमेव आशास्थान आहे. 

खरतर हे सर्व विज्ञान आहे आणि ही सर्व व्यवस्था आधुनिक विज्ञानातील वेगवेगळ्या आविष्कारात आपण आता पाहतो. पण मग त्या विधात्याला प्राप्त करण्याची काय गरज आहे. हे जन्मोजन्मीची कर्म व्यवस्था सांभाळत मनुष्य जगतात ये जा करत राहू शकतो. भक्तिमार्ग, योगयागमार्ग, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, या सर्व मार्गांचं ज्ञान स्वतः नियंत्याने, जगाला का दिलं.

या प्रश्नाच्या उत्तरात गेलो की, सर्व गोष्टींचा उलगडा होईल. त्याचा आधी शोध घेऊया. असं समजा की, आपल्याला एका मुक्कामी जाण्याचं कार्य सोपवण्यात आलं आहे. त्या कार्यार्थ आपल्याला कोणत्याही मार्गाने जाण्याची मुभा किंवा मोकळीक किंवा सुट देण्यात आली आहे. अनेक मार्ग जाण्यासाठी, उपलब्ध आहेत. प्रत्येक मार्गात भिन्न भिन्न दृश्य, गोष्टी, अडथळे अडचणी, सुलभता, दुर्लभता, इत्यादी प्रावधानं योजण्यात किंवा निर्माण करण्यात आली आहे. 

असं समजुया की, आपण ह्यापैकी कोणत्याही मार्गाने जाताना, या सर्व किंवा यापैकी काही वा अनेक गोष्टी अस्तित्वात आहेत. त्या सर्व गोष्टी, दृश्ये का आहेत, याचा विचार केला तर हे लक्षात येईल की, त्या मार्गांच्या निर्मितीत, माणसानेच त्या गोष्टी आपल्याच उपयोगा साठी, निर्माण केल्या. निर्माण करणारा, या सर्व गोष्टी, दृश्य इत्यादी निर्माण करून त्यात रमला, स्थिरावला आणि प्रलोभनांना बळी पडून, मार्ग विसरला.

वाटेत जाताना, त्यानेच निर्माण केलेल्या, गोष्टी हा त्याचा प्रपंच झाला. रस्त्याने जात असताना,वाटेत आपल्याला, अनेक गोष्टी दिसतात आणि त्या पाहण्यासाठी, त्यांचा आस्वाद घेण्यासाठी, त्यात आपल्या सोयीसाठी भर घालत घालत मार्गस्थ होतो. आता हे प्रपंचात रमणं, त्यात हरवून जाणं, तिथेच स्थिरावणं, यामधे मुख्य मार्ग, मुख्य उद्देश पांथस्थ विसरून जातो. प्रजोत्पादन नियमां नुसार पुढल्या पिढ्या निर्माण होत जातात. 

विषय गहन आहे, थोडा किचकट आहे. म्हणून उद्या हेच उदाहरण पुढे नेऊ. पण ज्या परम निर्मात्याने ही व्यवस्था निर्माण करून, ब्रम्हांडाची योजना केली, त्याला कृतार्थ भावाने, स्मरुया. 
 
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...