Skip to main content

खरी श्रद्धा !! (बोधकथा) - १

खरी श्रद्धा !!  (बोधकथा) - १

श्रद्धा जर 100% असेल तर शंका  मनात येणारच नाही
जिथे शंका आहे तिथे श्रद्धा अशक्त असते.

मला एक वाचलेली गोष्ट आठवते. त्यानंतर माझा मुद्दा कळेल.

एकदा एका दुष्काळग्रस्त गावात, एक साधू आले. त्यांनी सांगितलं की, उद्या देवळात आपण प्रार्थना करूया. त्या प्रार्थनेनंतर या गावात मुसळधार पाऊस पडेल. गावा तील सर्व लोक देवळात, रात्री, जमा झाले. त्या साधूने सुरवातीला एकच प्रश्न केला की, आपल्यापैकी  कोणी कोणी छत्री आणली आहे?. कारण प्रार्थनेनंतर पडणाऱ्या मुसळधार पावसात छत्री नसेल तर, घरी कसं जाणार. यावर गर्दीतून फक्त एकच हात वर आला. त्या एकाच माणसाने छत्री आणली होती. 

त्यावर साधू म्हणाला की, या गावात एकच खरा श्रद्धाळू आहे. कारण त्याला पूर्ण विश्वास वाटतो आहे की, प्रार्थने नंतर पाऊस येणारच. पण तुम्ही बाकी सर्वजण, या विचारानेच आला आहात की, जाऊन तर बघू. अश्या शंकेखोर वृत्तीने, फक्त बघायला आला आहात, प्रार्थनेसाठी नाही.

मला विश्वास आहे या गोष्टी नंतर, तुम्हाला एकतर शंका येतील किंवा श्रद्धा. कारण शंका आणि श्रद्धा एकत्र राहू शकत नाहीत.

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१३/१२/२०२२

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...