Skip to main content

आध्यात्म विराम ५

आध्यात्म विराम ५ (नवीन लेखमाला)

कालच्या विषयात पुढे जाताना, अजून थोडं खोलात जाऊया. काही जीव, हे आत्ममार्गात, अग्रेसर आहेत, हे ईश्वर किंवा ईश्वरी अंश जाणत असतात. अश्या जीवांच्या मार्गात आलेली, दुःखे, संकटं, अडथळे, अडचणी हे त्यांच्या आत्मिक प्रगतीतील पायऱ्या आहेत, हे ईश्वरी व्यवस्था जाणून असते. असे देहधारी जीव, त्यातून यशस्वी पणे जाण्यास सक्षम असतात. म्हणून अश्या जीवांना,सहाय्याची आवश्यकता नाही, याची जाण सद्गुरुना असते. 

म्हणूनच, सद्गुरू त्यांना सहाय्यार्थ क्वचित येतात. असे जीव अनेकदा म्हणताना आढळतात की, मला कधीही देव सहाय्य करायला येत नाही. पण हे अर्धसत्य आहे, याची त्यांना त्यावेळी, जाण नसते. उरलेलं अर्धसत्य हे आहे की ईश्वर, ब्रम्हांडातील प्रत्येक जीवाप्रमाणेच, यांच्याही पाठीशी असतोच. पण फक्त साक्षी असतो. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत त्यांना आवश्यक तितकेच सहाय्य, ईश्वर आपल्या अंशरुपात करतोच करतो, हे निर्विवाद सत्य आहे . 

पण आपण स्वतः आत्म् मार्गात नक्की कोणत्या स्थितीला व स्थानावर आहोत, हे असे जीव जाणत नसल्यामुळे, त्यांना, या क्वचित सहाय्याची कल्पना येत नाही. परंतु तरीही, त्यांची आत्मिक मार्गातील प्रगती ही होतच असते, जाणते वा अजाणतेपणी. ईश्वरी कृपेचा झरा ठराविक लोकांनाच प्राप्त होतो की सरसकट सर्वांना, यावर आता विचार करुया. 

यामधे मानव निर्मित व्यवस्था आणि ईश्वरी व्यवस्था यात, मूलतः भेद स्वार्थ आणि निस्वार्थ इतका प्रचंड आहे. उदाहरणार्थ मानवी व्यवस्थेत, ऐंशी, पंच्याएंशी वा नव्वद टक्क्यांच्यावर मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना, आपण विशेष वर्ग वा व्यवस्था करतो, जेणेकरून, त्यांना, त्याची टक्केवारी टिकवून, करियर मधे पुढे जाता येईल. पण यात सहाय्य करणाऱ्यांचा वैयक्तिक व व्यावसायिक स्वार्थ असतो. 

याउलट, ईश्वराची व्यवस्था असते. जे जीव, आत्मिक उद्धार मार्गात, प्रगत आहेत आणि योग्य दिशेने, पुरेश्या गतीने मार्गस्थ आहेत, असे जीव ईश्वरी व्यवस्थेत merited students असतात. अश्या जीवांना अपवाद म्हणून क्वचित सहाय्य, ईश्वर वा ईश्वरी व्यवस्थेकडून होतं. फक्त अश्या वेळी, जेंव्हा अश्या जीवांचा आत्मविश्वास ढळण्याची शक्यता आहे, तिथेच असे सहाय्य केले जाते. 

पण जे जन परिस्थितीवश, प्रारब्धवश, संचीतामुळे, कर्मगतीमुळे, मागे आहेत, अश्या कच्च्या किंवा व्यावहारिक भाषेत कमी टक्केवारीच्या विद्यार्थ्यांना, ईश्वरी व्यवस्थेकडून, विशेष सहाय्य दिले जाते. जेणेकरून, त्यांना आहे त्या परिस्थितीशी झुंज देऊन, पुढील पायऱ्यांवर मार्गक्रमण करत येइल. 

हाच विषय उद्या पुढे नेऊया, पण त्या ईश्वरी व्यवस्थेचा सन्मान म्हणून, त्या ईश्वराच्या नामाचा उद्घोष करत करत. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...