Skip to main content

नारदपुराणातील देवर्षी नारदकृत श्रीविष्णूस्तुती भाग २

नारदपुराणातील देवर्षी नारदकृत श्रीविष्णूस्तुती भाग २

ज्यांच्या नामाच्या संकीर्तनाने गजराज काळाच्या कराल दाढेच्या बंधनातून मुक्त झाला,  जे प्रकाशस्वरूप भगवान आपल्या परम पदी  नित्य विराजमान असतात, अश्या आदीपुरुष भगवान विष्णूंना मी शरण जातो. जे शिवाची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी शिवस्वरूप आणि विष्णूचं ध्यान करणाऱ्यांसाठी विष्णूस्वरूप आहेत, जे संकल्पपूर्वक आपल्या देहधारणेचे स्वतःच हेतू आहेत अश्या नित्य परमात्म्याला मी शरण जातो.

ज्यांनी हिरण्यकेशी तथा  नरकासुर यांचा नाश केला आहे, ज्यांनी बाल्यावस्थेत आपल्या हाताच्या अग्रभागाने गिरीराज गोवर्धन धारण केला होता, वसुंधरेचा भार वाहण ज्यांचा स्वाभाविक धर्म आहे, अश्या दिव्यशक्तीसंपन्न भगवान वासुदेवांना माझा नित्य प्रणाम आहे. ज्यांनी खांबातून नरसिंह रुपात प्रकट होऊन पर्वतावरील खडकासमान कठोर असलेल्या दैत्य हिरण्यकश्यपूच्या छातीचा वेध घेऊन भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं, अश्या अजन्मा परमेश्वराला मी वंदन करतो.

जे आकाशादी तत्त्वांनी विभूषित आहेत, जे परमात्मा नामाभिधानाने प्रसिद्ध आहेत , जे निरंजन , नित्य, अमेयतत्वी तथा कर्मरहीत आहेत अश्या विश्वविधाता पुराणपुरुष परामात्म्यांना मी नमस्कार करतो. जे ब्रम्हा , इंद्र , अग्नी, वायू,  मनुष्य , यक्ष , गंधर्व, असुर तथा देवता या आपल्या विभिन्न स्वरूपात नित्य स्थित आहेत, जे एकमेवाद्वितीय परमेश्वर आहेत अश्या आदीपुरुष परमेश्वराला मी नित्य भजतो.

हे भेदयुक्त जगत ज्यांच्यामुळे उत्पन्न झालं, ज्यांच्यामध्ये  स्थित आहे आणि कल्पांती संहारकाली ज्यांच्या मधेच विलीन होईल अश्या परम ईश्वराला मी शरण आहे.  जे विश्वारूपात प्रकट आणि स्थित असल्यामुळे आसक्त प्रतीत होतात, पण वास्तवात जे असंग ( इथे असंग याचा अर्थ जे सर्व संगाच्या पार आहेत व ज्यांचा कोणाशीही वास्तवात संग नाही म्हणजेच जे स्वयं सर्वकाही आहेत असा घ्यायचा, अन्यथा असंगाचा आपला अर्थ वेगळा आहे)  आणि परिपूर्ण आहेत अश्या परमेश्वराला मी शरण जात आहे.

क्रमशः भाग २ समाप्त

© संकल्पना संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१०/०२/२०१९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...