Skip to main content

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ६ व अंतिम

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ६ व अंतिम

संपूर्ण गीत

कैवल्याच्या
चांदण्याला भुकेला
चकोर
चंद्र व्हा हो
पांडुरंगा, मन करा थोर

बालवयी खेळी रमलो,
तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता दिसे
पैलतीर

जन्ममरण नको आता, नको
येरझार
नको ऐहिकाचा नाथा
व्यर्थ बडिवार

चराचरा पार न्या हो
जाहला उशीर
'पांडुरंग' 'पांडुरंग'.
मन करा थोर

गीत : अशोकजी परांजपे
संगीत आणि स्वर : पंडित जितेंद्र अभिषेकी

हे ऐहिकाचं अवडंबर दूर करा पांडुरंगा , पंढरीराया. इतकं तरी निदान मान्य करा , या पामराचं.

हे पांडुरंगा विठ्ठला या जगताच्या, दृश्यमान भूमीच्या, या चराचराच्या , या विश्वाच्या , लौकिक व भौतिक जगाच्या पार जिथे विश्वनियंता म्हणजेच परमात्मा आणि आत्मा यांचं मिलन होतं अश्या कैवल्यधामी मला न्या दयाळा. अजून किती वाट पहायची आधीच उशीर झालाय. सर्व जन्म व्यर्थ घालवून जगरहाटीच्या प्रवाहात वहात जाऊन आधीच तुझ्यापर्यंत येण्यास उशीर केलाय मी.

जगतचालक आपण महान आहात , थोर आहात.  हे पांडुरंगा पंढरीराया आपण आपल्या विशाल व उदार अंतःकरणाचा प्रत्यय देऊन या पामराला जन्म मृत्यू फेऱ्याच्या पार नेऊन मोक्ष, मुक्ती, कैवल्य याचा प्रत्यय द्यावा आणि भक्तवत्सल हे ब्रीद सार्थ करा विठ्ठला.

समाप्त

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२८ /०१/२०१९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...