Skip to main content

१४ फेब्रुवारीच्या यातनामय दिवसानंतरचं चिंतन

१४ फेब्रुवारीच्या यातनामय दिवसानंतरचं चिंतन

प्रत्येक वेळी जे matured आहेत,  ते याच गोष्टी समजाव तात की, आपण चूक करावी म्हणून हा हल्ला झाला. प्रत्येक वेळी आपण हो असच आहे, असं म्हणून गप्प बसायचं आणि वा आपण किती मुत्सद्दी आहोत म्हणून आपलीच पाठ थोपटायची. तिकडे पाक आणि त्यांचे हस्तक व दहशतवादी दर वेळी मस्तपैकी त्यांचा गेम करून व आपला वाजवून जातात. आपण म्हणायचं की, आपण काही चुकावं म्हणून केलं, मुस्तद्दी बोलले आणि आम्ही गप्प पुन्हा पुढच्या हल्ल्यापर्यंत.

आज ६९ , ७० वर्ष याच मुत्सद्देगिरीवर काढले, काढलेच ना. आपली ताकद समोरच्याला आठ कानाखाली वाजवायची आहे ना , मग समोरचा चार मारेल आणि माझं नुकसान होईल वा माझी maturity disturb होईल असं काहीही न करता फक्त मुत्सद्देगिरीचं कौतुक करायचं.

इकडे हे चित्र असताना तिकडे साधारण १९४५ लाच जन्माला आलेला देश इस्राईल ९ मुस्लिम देशांच्या छाताडावर उभा आहे, टक्कर देऊन, त्यांची मान मोडून आणि आपला आत्मसम्मान टिकवून, आपल्याच बहिर्जी नाईक आणि छत्रपती शिवरायांचा अभ्यास करून, त्यांच्या धोरणांचा वापर करून.

मुत्सद्देगिरी छत्रपतीनी सुद्धा दाखवली होती, पण स्वतःचा स्वाभिमान , आत्मसम्मान यांचं भान ठेवून आणि आपल्या ताकदीचा अंदाज बांधून. पण कमी ताकद असतानासुद्धा अफजलखानासारख्या बलाढ्य सरदाराला धूळ चारली आणि शक्ती वाढल्यावर अगदी औरंगजेबालादेखील भीक घातली नाही. जी गोष्ट छत्रपतींची तीच पेशव्यांची, ताकद असताना दिल्लीचं तख्त सुद्धा फोडलं होतं. सचिनने सुद्धा शोएब अख्तरला बॅटने उत्तर दिलं होतं, तेंव्हाच त्याची ताकद शोएबला आणि जगाला समजली. 

मोठा भाऊ म्हणून चालत नाही, कधी तरी लहान भावाला कानाखाली जाळ काढून दाखवावा लागतोच तरच धाक राहतो. नाहीतर उंदरासारखा प्राणीसुद्धा सिंहाच्या अंगावर नाचायला कमी करणार नाही, हे लक्षात ठेवा.

ताकद असताना संयम हा काही काळ तुमची maturity तुमची ओळख सिद्ध करते. पण ७० वर्ष संयम हा भ्याडपणा वा भित्रेपणा दर्शवतो. तेंव्हा एकदा तरी समोरच्या शत्रूला, ( जेंव्हा समोरचा आपल्याला तहहयात शत्रूच मानतो त्यावेळी आपण गांधीगिरीने त्याला अनाठायी मित्रत्वाचा दर्जा देणं हा मूर्खपणा आहे), एकदा तरी कळू द्या की, तुमच्यात अशी ताकद आहे ज्यामध्ये त्याचं अस्तित्व नष्ट करण्याची हिम्मत, रग, जोश आणि जिगर तुमच्यात आहेच आहे.  कारण अकारण आणि अनंत काळ सांडलेल्या रक्ताची किम्मत नसेल तर रक्त सांडणाऱ्याचं बलिदान निरर्थक आहे.

© विचारप्रवृत्त :  प्रसन्न आठवले
१६/०२/२०१९
जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...