१४ फेब्रुवारी २०१९ च्या पुलवामा येथील घटनेनंतर जनमानसातील संतप्त प्रतिक्रियेची प्रातिनिधिक शब्दोत्पत्ती कवितेतून :
रक्ताला फक्त रक्ताचा अभिषेक हवा
शत्रूच्या काळजात बाणाचा घाव हवा
किती सांडले रक्त
किती पातले वीर
किती किती मातांनी
गमवले पुत्र नरवीर
त्या मातांना न्याय आता तरी हवा
रक्ताला फक्त रक्ताचा अभिषेक हवा
नामविलेत शत्रू किती
इतिहासही साक्ष देत
राम कृष्ण छत्रपती
मर्दानी झाशी येथ
त्यांच्या शौर्याचा आता मान राखावा
रक्ताला फक्त रक्ताचा अभिषेक हवा
माता ही मूक उभी
कलेवर बघत पुत्रांचे
मोलची जे दिले तिने
आम्हास लाभल्या छत्राचे
त्यांच्या त्यागाचा अभिमान जागवा
रक्ताला फक्त रक्ताचा अभिषेक हवा
© कवी : प्रसन्न आठवले; १५/०२/२०१९
Comments
Post a Comment