Skip to main content

नारदपुराणातील देवर्षी नारदकृत श्रीविष्णूस्तुती भाग ३

नारदपुराणातील देवर्षी नारदकृत श्रीविष्णूस्तुती भाग ३

जे भगवंत सर्वांच्या हृदयात वास करत असूनसुद्धा मायेने मोहित असलेल्याना दिसून येत नाहीत तथा जे परमशुद्ध स्वरूप आहेत त्यांना मी शरण जातो. जे योगी सर्व प्रकारच्या आसक्तीपासून दूर राहून ध्यानयोगात आपलं मन एकाग्र करतात आणि ज्यांना सर्वत्र तेच ज्ञानस्वरूप प्रतीत होतात त्या परमात्म्याला मी शरण जातो. 

क्षीरसागरात अमृतमंथनाच्या वेळी ज्यांनी देवांच्या हितार्थ मंदराचल पर्वताला आपल्या पाठीवर धारण केलं त्या कूर्मरुपधारी भगवान विष्णूंना मी शरण जातो. ज्या अनंत परमात्माने आपल्या दाढेच्या अग्रावर प्रलयकाळी पृथ्वीला धारण करून या जगताची पुनर्स्थापना केली त्या वराहरुप धारी भगवान विष्णूंना मी नमस्कार करतो.

आपला भक्त प्रल्हाद यांच्या रक्षणार्थ पर्वताच्या शिळेसमान वक्ष असलेल्या हिरण्यकश्यपू या दैत्याच्या छातीला विदीर्ण करून वध केला त्या भगवान नृसिंहांना मी वंदन करतो. विरोचनकुमार बलीकडून तीन पावलं जमीन मागून फक्त दोन पावलात समस्त ब्रह्मांड व्यापुन ते ब्रह्मांड पुन्हा देवतांना समर्पित केलेल्या अपराजित भगवान वामन यांना मी नमन करतो.

हैहयराज सहस्त्रार्जुनाच्या अपराधांमुळे ज्यांनी या पृथ्वीला एकवीस वेळा निःक्षत्रिय केलं त्या जमदग्नीनंदन परशुराम यांना मी नमस्कार करतो. ज्यांनी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या चार रुपात प्रकट होऊन वानरसेना जमवून राक्षसांचा निःपात केला त्या प्रभुरामचंद्राना मी वंदन करतो.
ज्यांनी बलराम व श्रीकृष्ण या दोन रुपात प्रकट होऊन पृथ्वीचा भार हलका केला आणि सरतेशेवटी यादवकुळाचा नाश केला त्या भगवान श्रीकृष्णांचं मी भजन करतो.

भु: भुव: स्व: या तिन्ही लोकांना आपल्या हृदयात स्थिर करणाऱ्या निर्मल बुद्धरुप परमेश्वराला मी भजतो. कलियुगाच्या अंती अशुद्ध चित्त असलेल्या पापी लोकांना तलवारीच्या तीक्ष्ण धारेने विनाश करून सत्ययुगाच्या प्रारंभी धर्माची पुनर्स्थापना केली त्या कल्कीस्वरूप भगवान विष्णूंना मी प्रणाम करतो.

क्रमशः भाग ३ समाप्त

© संकल्पना संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
११/०२/२०१९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...